शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलने सीझफायर तोडले, ट्रम्प प्रचंड नाराज; म्हणाले, तातडीने पायलटना माघारी बोलवा...
2
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
3
तुर्कीला धडा शिकवण्याची तयारी सुरू?; सर्वात मोठ्या शत्रूच्या देशात पोहचले भारतीय हवाई दल प्रमुख
4
“झूठ बोले कौवा काटे”; राहुल गांधींच्या आरोपांना CM फडणवीसांचे उत्तर, सगळी आकेडवारीच दिली
5
Nuclear Weapon : कोणता देश अणुबॉम्ब बनवतोय अन् कोणता नाही? कसं आणि कोण ठेवतं लक्ष? जाणून घ्या...
6
“भास्कर जाधवांनी शिंदेंचे नेतृत्व स्वीकारले तर आनंद, मातोश्रीवरचा राग...”; कुणी दिला सल्ला?
7
दिलजीत दोसांझच्या सिनेमात पाकिस्तानी अभिनेत्रीची भूमिका, टीका झाल्यावर म्हणाला...
8
Rahul Gandhi :'निवडणुका नियमांनुसार होतात', राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाचे उत्तर; चर्चेसाठी बोलावले
9
अपघाताच्या एक दिवस आधी एअर इंडियाच्या सीईओंचा पगार ४६% वाढवला; आता किती पैसे मिळतात?
10
विहिरीत पडलेल्या वासराला वाचवण्यासाठी उतरलेले तरुण एका पाठोपाठ एक बेशुद्ध पडले, पाच जणांचा मृत्यू, संपूर्ण गावावर शोककळा  
11
प्रेक्षकांची प्रतीक्षा आज संपणार; काही तासात सुबोध भावे-तेजश्रीच्या मालिकेचा प्रोमो येणार; पाहा झलक
12
"हात लावशील तर ३५ तुकडे करेन"; मधुचंद्राच्या रात्रीच नवरीने दिली थेट धमकी! म्हणाली...
13
केदारनाथला देवाकडे काय मागितलं? चाहत्याचा प्रश्न, अमृताचं मन जिंकणारं उत्तर, म्हणाली- "खरं सांगू..."
14
अहमदाबाद विमान अपघात: ब्लॅक बॉक्सची माहिती कधीपर्यंत मिळेल? केंद्रीय मंत्री नायडू म्हणाले...
15
हिंदी मोफत शिकवत असतील तर त्यात गैर काय?; राष्ट्रवादी आमदार संग्राम जगतापांचा सवाल
16
ज्या कतारवर हल्ला केला, त्याच कतारच्या शेखने फोन केला...; अन् इराण सीझफायरसाठी तयारही झाला...
17
"अमेरिकेला गुडघे टेकायला लावले, इराण बनला मुस्लिम जगताचा नेता’’, महबूबा मुफ्ती यांनी केलं कौतुक  
18
यंदा जूनमध्येच 'अलमट्टी' ६१ टक्के भरले; कृष्णा नदीकाठच्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
19
युद्धबंदीच्या बातमीनंतर सेन्सेक्स-निफ्टी वधारले, पण 'या' कंपन्यांचे शेअर्स धडाधड कोसळले; काय आहे कारण?
20
लग्नानंतर दरमहा १०,००० फिक्स! पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत फक्त एकदाच करा गुंतवणूक!

सिल्लोड तालुक्यात यंदा मिरचीची विक्रमी लागवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2018 00:54 IST

कापसाचे क्षेत्र घटणार : गतवर्षी भाव स्थिर राहिल्याने कल वाढला

श्यामकुमार पुरेसिल्लोड : गतवर्षी मिरचीचे भाव स्थिर राहिल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांना चांगला नफा झाला, यामुळे यंदा तालुक्यात उन्हाळी मिरचीची लागवड वाढली असून मागील चार वर्षांच्या तुलनेत यावर्षी दुप्पट म्हणजे जवळपास अडीच हजार हेक्टर क्षेत्रात मिरचीची लागवड होईल, असा अंदाज व्यापारी, नर्सरीचालक व शेतकºयांनी व्यक्त केला. परिणामी, कापसाचे क्षेत्र कमालीचे घटणार आहे.२०१७ मध्ये तालुक्यात १ हजार ३८२ हेक्टर क्षेत्रावर मिरची लागवड करण्यात आली होती. त्या तुलनेत २०१६ मध्ये केवळ १७४ हेक्टर, २०१५ मध्ये २४६ हेक्टर, तर २०१४ मध्ये केवळ ५० हेक्टर क्षेत्रावर मिरची लागवड करण्यात आली होती. त्या तुलनेत यावर्षी विक्रमी म्हणजे अडीच हजार हेक्टर क्षेत्रावर उन्हाळी मिरचीची लागवड होताना दिसत आहे.सुरुवातीला चांगला भाव मिळावा म्हणून पानवडोद शिवार व सिल्लोड तालुक्यात काही शेतकºयांनी २५ मार्चपासून मिरची लागवड केली आहे; पण वातावरण ‘सूट’ न झाल्याने काही शेतकºयांच्या रोपांवर रोग पडला आहे. यामुळे २५ टक्के रोपे नष्ट होताना दिसत आहेत. ५ एप्रिलपासून मिरची लागवडीचा वेग वाढला आहे. सुरुवातीला भाव मिळविण्यासाठी शेतकरी धावपळ करीत आहेत.पाच नर्सरीमधून ८० लाख रोपांची विक्रीतालुक्यात शिवना येथे २, जळकी येथे २, पानवडोद येथे १ अशा पाच मिरची रोपांच्या नर्सरीमधून एप्रिलअखेर ८० लाख मिरची रोपांची विक्री झाली असून अजून बुकिंग सुरू आहे. याशिवाय फर्दापूर, हिंगणा, खान्देश, विदर्भ, मराठवाड्यातून लागवडीसाठी शेतकरी रोपांची बुकिंग करीत आहेत. माझ्या शिवना येथील नर्सरीमधूनच ८ लाख ५० हजार रोपांची विक्री झाली आहे. अजूनही मागणी सुरूच आहे, असे नर्सरीचालक संजय काळे यांनी सांगितले.शेततळ्यांचा होणार फायदाकाही शेतकºयांनी रबी पिके न पेरता मिरचीसाठी विहिरीत पाणी साठवून ठेवले आहे. तर बहुतेक शेतकºयांनी नियोजन करून मागील दोन वर्षांत शेततळी केली आहेत. ज्या शेतकºयांकडे पाणी आहे ते मिरची लागवड करीत आहेत, तर काही शेतकरी टँकरने विहिरीत पाणी टाकून मिरची लागवड करीत आहेत.अर्धा एकरमध्ये तीन लाख निव्वळ नफामागील वर्षी मी २० गुंठे जमिनीत ४ हजार रोपे लावली होती. भाव स्थिर राहिल्याने अखेरपर्यंत खर्च वजा जाता ३ लाख रुपये निव्वळ नफा झाला, असे अनाड येथील शेतकरी हरिभाऊ रामचंद्र पवार यांनी सांगितले.दरम्यान, गतवर्षी अनेक संकटे आल्याने यंदा कापसाचे क्षेत्र घटणार असून सध्या मिरची लागवड सुरू असली तरी २५ टक्के मिरचीवर रोग पडत असल्याने शिवना येथील शेतकरी चंदन गुप्ता यांनी सांगितले.मिरची लागवडीवर होणारा खर्चसध्या ‘मल्चिंग’वर मिरची लागवड करण्याकडे शेतक-यांचा कल वाढला आहे. १ एकरसाठी मल्चिंग २० हजार रुपये, ठिबक २० हजार, रोप खर्च ८ हजार रुपये, १० हजार रुपये खत असा खर्च येत आहे. असा ५५ ते ६० हजार रुपये खर्च येत आहे.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी