शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: अंबरनाथच्या उड्डाण पुलावर भीषण अपघात; कारने बाईकस्वार तिघांना उडवले, चौघांचा मृत्यू
2
पत्नीही हवाई दलात पायलट, दुबई एअर शोमधील तेजसच्या शहीद पायलटचे लग्नही दुबईलाच झालेले...
3
IT कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! आता दर महिन्याच्या ७ तारखेपर्यंत पगार करावाच लागणार; नव्या कायद्यात काय काय...
4
नवा कामगार कायदा...! आता १ वर्षानंतर मिळणार ग्रॅच्युइटी; ५ वर्षांची अट बदलली...
5
पायलट 'निगेटिव्ह-जी ॲक्रोबॅटिक' युद्धाभ्यास करायला गेला अन्...; दुबई एअर शोमध्ये 'तेजस' विमान अपघाताचे कारण समोर आले...
6
भारतीय ज्युनियर महिला हॉकी संघाच्या प्रशिक्षकावर लैंगिक छळाचा आरोप; क्रीडा मंत्रालयाने चौकशीचे दिले आदेश
7
“भाजपाच्या रविंद्र चव्हाणांमुळे इथे युती तुटली, कोणता राग आहे माहिती नाही”: निलेश राणे
8
हिडमाचा खात्मा बनावट चकमकीत ? माओवाद्यांचा पत्रकातून गंभीर आरोप
9
वर्षाच्या अखेरीस आणखी एक महामारी येणार! नॉस्ट्राडेमसचे भाकित काय? जाणून घ्या
10
ऐतिहासिक निर्णय! देशात चार नवे कामगार कायदे तात्काळ लागू; २९ जुने कायदे रद्द, श्रम धोरणाला आधुनिक स्वरूप
11
धक्कादायक! पत्नीने प्रियकरासाठी लग्नाच्या सातव्या दिवशी पतीची हत्या केली
12
उद्धव ठाकरेंचा भाजपाला मोठा धक्का; ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत बडा नेत्याच्या हाती शिवबंधन
13
IND A vs BAN A : 'सुपर ओव्हर'मध्ये भारताचा फ्लॉप शो! एकही चेंडू न खेळता बांगलादेशनं गाठली फायनल
14
“मालेगाव प्रकरणी आरोपीला फाशी द्या, राज्यात महिला मुलींची सुरक्षा रामभरोसे”: हर्षवर्धन सपकाळ
15
बिहारमध्ये भाजपाचा डाव! नितीश कुमारांना मुख्यमंत्रीपद दिलं पण, गृहमंत्रीपद स्वतः कडे ठेवले, २० वर्षांनंतर खाते सोडले
16
कर्नाटकच्या राजकारणात खळबळ! "सर्व १४० आमदार माझ्यासोबत", डी. के. शिवकुमार यांचे थेट विधान
17
तुम्हाला तुमची गाडी खूपच प्यारी आहे...! २० वर्षांहून जुन्या वाहनांच्या फिटनेस टेस्ट शुल्कात १५ पट वाढ
18
स्लीपर वंदे भारत देशभर फिरवली, ट्रायलनंतर परत पाठवली; ५ फॉल्ट समोर आले, लोकार्पण लांबणार?
19
फेस्टीव्ह संपला नाही तोच...! फ्लिपकार्ट 'ब्लॅक फ्रायडे सेल २०२५' ची तारीख ठरली, अमेझॉन थांबतेय होय...
20
'G-20 मध्ये सामील होणार नाही', डोनाल्ड ट्रम्प दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्राध्यक्षांवर नाराज, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

सिल्लोड तालुक्यात यंदा मिरचीची विक्रमी लागवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2018 00:54 IST

कापसाचे क्षेत्र घटणार : गतवर्षी भाव स्थिर राहिल्याने कल वाढला

श्यामकुमार पुरेसिल्लोड : गतवर्षी मिरचीचे भाव स्थिर राहिल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांना चांगला नफा झाला, यामुळे यंदा तालुक्यात उन्हाळी मिरचीची लागवड वाढली असून मागील चार वर्षांच्या तुलनेत यावर्षी दुप्पट म्हणजे जवळपास अडीच हजार हेक्टर क्षेत्रात मिरचीची लागवड होईल, असा अंदाज व्यापारी, नर्सरीचालक व शेतकºयांनी व्यक्त केला. परिणामी, कापसाचे क्षेत्र कमालीचे घटणार आहे.२०१७ मध्ये तालुक्यात १ हजार ३८२ हेक्टर क्षेत्रावर मिरची लागवड करण्यात आली होती. त्या तुलनेत २०१६ मध्ये केवळ १७४ हेक्टर, २०१५ मध्ये २४६ हेक्टर, तर २०१४ मध्ये केवळ ५० हेक्टर क्षेत्रावर मिरची लागवड करण्यात आली होती. त्या तुलनेत यावर्षी विक्रमी म्हणजे अडीच हजार हेक्टर क्षेत्रावर उन्हाळी मिरचीची लागवड होताना दिसत आहे.सुरुवातीला चांगला भाव मिळावा म्हणून पानवडोद शिवार व सिल्लोड तालुक्यात काही शेतकºयांनी २५ मार्चपासून मिरची लागवड केली आहे; पण वातावरण ‘सूट’ न झाल्याने काही शेतकºयांच्या रोपांवर रोग पडला आहे. यामुळे २५ टक्के रोपे नष्ट होताना दिसत आहेत. ५ एप्रिलपासून मिरची लागवडीचा वेग वाढला आहे. सुरुवातीला भाव मिळविण्यासाठी शेतकरी धावपळ करीत आहेत.पाच नर्सरीमधून ८० लाख रोपांची विक्रीतालुक्यात शिवना येथे २, जळकी येथे २, पानवडोद येथे १ अशा पाच मिरची रोपांच्या नर्सरीमधून एप्रिलअखेर ८० लाख मिरची रोपांची विक्री झाली असून अजून बुकिंग सुरू आहे. याशिवाय फर्दापूर, हिंगणा, खान्देश, विदर्भ, मराठवाड्यातून लागवडीसाठी शेतकरी रोपांची बुकिंग करीत आहेत. माझ्या शिवना येथील नर्सरीमधूनच ८ लाख ५० हजार रोपांची विक्री झाली आहे. अजूनही मागणी सुरूच आहे, असे नर्सरीचालक संजय काळे यांनी सांगितले.शेततळ्यांचा होणार फायदाकाही शेतकºयांनी रबी पिके न पेरता मिरचीसाठी विहिरीत पाणी साठवून ठेवले आहे. तर बहुतेक शेतकºयांनी नियोजन करून मागील दोन वर्षांत शेततळी केली आहेत. ज्या शेतकºयांकडे पाणी आहे ते मिरची लागवड करीत आहेत, तर काही शेतकरी टँकरने विहिरीत पाणी टाकून मिरची लागवड करीत आहेत.अर्धा एकरमध्ये तीन लाख निव्वळ नफामागील वर्षी मी २० गुंठे जमिनीत ४ हजार रोपे लावली होती. भाव स्थिर राहिल्याने अखेरपर्यंत खर्च वजा जाता ३ लाख रुपये निव्वळ नफा झाला, असे अनाड येथील शेतकरी हरिभाऊ रामचंद्र पवार यांनी सांगितले.दरम्यान, गतवर्षी अनेक संकटे आल्याने यंदा कापसाचे क्षेत्र घटणार असून सध्या मिरची लागवड सुरू असली तरी २५ टक्के मिरचीवर रोग पडत असल्याने शिवना येथील शेतकरी चंदन गुप्ता यांनी सांगितले.मिरची लागवडीवर होणारा खर्चसध्या ‘मल्चिंग’वर मिरची लागवड करण्याकडे शेतक-यांचा कल वाढला आहे. १ एकरसाठी मल्चिंग २० हजार रुपये, ठिबक २० हजार, रोप खर्च ८ हजार रुपये, १० हजार रुपये खत असा खर्च येत आहे. असा ५५ ते ६० हजार रुपये खर्च येत आहे.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी