शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
4
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
5
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
6
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
7
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
8
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
9
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
10
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
11
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
12
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
13
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
16
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
17
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
18
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
19
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
20
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?

सिल्लोड तालुक्यात यंदा मिरचीची विक्रमी लागवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2018 00:54 IST

कापसाचे क्षेत्र घटणार : गतवर्षी भाव स्थिर राहिल्याने कल वाढला

श्यामकुमार पुरेसिल्लोड : गतवर्षी मिरचीचे भाव स्थिर राहिल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांना चांगला नफा झाला, यामुळे यंदा तालुक्यात उन्हाळी मिरचीची लागवड वाढली असून मागील चार वर्षांच्या तुलनेत यावर्षी दुप्पट म्हणजे जवळपास अडीच हजार हेक्टर क्षेत्रात मिरचीची लागवड होईल, असा अंदाज व्यापारी, नर्सरीचालक व शेतकºयांनी व्यक्त केला. परिणामी, कापसाचे क्षेत्र कमालीचे घटणार आहे.२०१७ मध्ये तालुक्यात १ हजार ३८२ हेक्टर क्षेत्रावर मिरची लागवड करण्यात आली होती. त्या तुलनेत २०१६ मध्ये केवळ १७४ हेक्टर, २०१५ मध्ये २४६ हेक्टर, तर २०१४ मध्ये केवळ ५० हेक्टर क्षेत्रावर मिरची लागवड करण्यात आली होती. त्या तुलनेत यावर्षी विक्रमी म्हणजे अडीच हजार हेक्टर क्षेत्रावर उन्हाळी मिरचीची लागवड होताना दिसत आहे.सुरुवातीला चांगला भाव मिळावा म्हणून पानवडोद शिवार व सिल्लोड तालुक्यात काही शेतकºयांनी २५ मार्चपासून मिरची लागवड केली आहे; पण वातावरण ‘सूट’ न झाल्याने काही शेतकºयांच्या रोपांवर रोग पडला आहे. यामुळे २५ टक्के रोपे नष्ट होताना दिसत आहेत. ५ एप्रिलपासून मिरची लागवडीचा वेग वाढला आहे. सुरुवातीला भाव मिळविण्यासाठी शेतकरी धावपळ करीत आहेत.पाच नर्सरीमधून ८० लाख रोपांची विक्रीतालुक्यात शिवना येथे २, जळकी येथे २, पानवडोद येथे १ अशा पाच मिरची रोपांच्या नर्सरीमधून एप्रिलअखेर ८० लाख मिरची रोपांची विक्री झाली असून अजून बुकिंग सुरू आहे. याशिवाय फर्दापूर, हिंगणा, खान्देश, विदर्भ, मराठवाड्यातून लागवडीसाठी शेतकरी रोपांची बुकिंग करीत आहेत. माझ्या शिवना येथील नर्सरीमधूनच ८ लाख ५० हजार रोपांची विक्री झाली आहे. अजूनही मागणी सुरूच आहे, असे नर्सरीचालक संजय काळे यांनी सांगितले.शेततळ्यांचा होणार फायदाकाही शेतकºयांनी रबी पिके न पेरता मिरचीसाठी विहिरीत पाणी साठवून ठेवले आहे. तर बहुतेक शेतकºयांनी नियोजन करून मागील दोन वर्षांत शेततळी केली आहेत. ज्या शेतकºयांकडे पाणी आहे ते मिरची लागवड करीत आहेत, तर काही शेतकरी टँकरने विहिरीत पाणी टाकून मिरची लागवड करीत आहेत.अर्धा एकरमध्ये तीन लाख निव्वळ नफामागील वर्षी मी २० गुंठे जमिनीत ४ हजार रोपे लावली होती. भाव स्थिर राहिल्याने अखेरपर्यंत खर्च वजा जाता ३ लाख रुपये निव्वळ नफा झाला, असे अनाड येथील शेतकरी हरिभाऊ रामचंद्र पवार यांनी सांगितले.दरम्यान, गतवर्षी अनेक संकटे आल्याने यंदा कापसाचे क्षेत्र घटणार असून सध्या मिरची लागवड सुरू असली तरी २५ टक्के मिरचीवर रोग पडत असल्याने शिवना येथील शेतकरी चंदन गुप्ता यांनी सांगितले.मिरची लागवडीवर होणारा खर्चसध्या ‘मल्चिंग’वर मिरची लागवड करण्याकडे शेतक-यांचा कल वाढला आहे. १ एकरसाठी मल्चिंग २० हजार रुपये, ठिबक २० हजार, रोप खर्च ८ हजार रुपये, १० हजार रुपये खत असा खर्च येत आहे. असा ५५ ते ६० हजार रुपये खर्च येत आहे.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी