शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

सिल्लोड तालुक्यात यंदा मिरचीची विक्रमी लागवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2018 00:54 IST

कापसाचे क्षेत्र घटणार : गतवर्षी भाव स्थिर राहिल्याने कल वाढला

श्यामकुमार पुरेसिल्लोड : गतवर्षी मिरचीचे भाव स्थिर राहिल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांना चांगला नफा झाला, यामुळे यंदा तालुक्यात उन्हाळी मिरचीची लागवड वाढली असून मागील चार वर्षांच्या तुलनेत यावर्षी दुप्पट म्हणजे जवळपास अडीच हजार हेक्टर क्षेत्रात मिरचीची लागवड होईल, असा अंदाज व्यापारी, नर्सरीचालक व शेतकºयांनी व्यक्त केला. परिणामी, कापसाचे क्षेत्र कमालीचे घटणार आहे.२०१७ मध्ये तालुक्यात १ हजार ३८२ हेक्टर क्षेत्रावर मिरची लागवड करण्यात आली होती. त्या तुलनेत २०१६ मध्ये केवळ १७४ हेक्टर, २०१५ मध्ये २४६ हेक्टर, तर २०१४ मध्ये केवळ ५० हेक्टर क्षेत्रावर मिरची लागवड करण्यात आली होती. त्या तुलनेत यावर्षी विक्रमी म्हणजे अडीच हजार हेक्टर क्षेत्रावर उन्हाळी मिरचीची लागवड होताना दिसत आहे.सुरुवातीला चांगला भाव मिळावा म्हणून पानवडोद शिवार व सिल्लोड तालुक्यात काही शेतकºयांनी २५ मार्चपासून मिरची लागवड केली आहे; पण वातावरण ‘सूट’ न झाल्याने काही शेतकºयांच्या रोपांवर रोग पडला आहे. यामुळे २५ टक्के रोपे नष्ट होताना दिसत आहेत. ५ एप्रिलपासून मिरची लागवडीचा वेग वाढला आहे. सुरुवातीला भाव मिळविण्यासाठी शेतकरी धावपळ करीत आहेत.पाच नर्सरीमधून ८० लाख रोपांची विक्रीतालुक्यात शिवना येथे २, जळकी येथे २, पानवडोद येथे १ अशा पाच मिरची रोपांच्या नर्सरीमधून एप्रिलअखेर ८० लाख मिरची रोपांची विक्री झाली असून अजून बुकिंग सुरू आहे. याशिवाय फर्दापूर, हिंगणा, खान्देश, विदर्भ, मराठवाड्यातून लागवडीसाठी शेतकरी रोपांची बुकिंग करीत आहेत. माझ्या शिवना येथील नर्सरीमधूनच ८ लाख ५० हजार रोपांची विक्री झाली आहे. अजूनही मागणी सुरूच आहे, असे नर्सरीचालक संजय काळे यांनी सांगितले.शेततळ्यांचा होणार फायदाकाही शेतकºयांनी रबी पिके न पेरता मिरचीसाठी विहिरीत पाणी साठवून ठेवले आहे. तर बहुतेक शेतकºयांनी नियोजन करून मागील दोन वर्षांत शेततळी केली आहेत. ज्या शेतकºयांकडे पाणी आहे ते मिरची लागवड करीत आहेत, तर काही शेतकरी टँकरने विहिरीत पाणी टाकून मिरची लागवड करीत आहेत.अर्धा एकरमध्ये तीन लाख निव्वळ नफामागील वर्षी मी २० गुंठे जमिनीत ४ हजार रोपे लावली होती. भाव स्थिर राहिल्याने अखेरपर्यंत खर्च वजा जाता ३ लाख रुपये निव्वळ नफा झाला, असे अनाड येथील शेतकरी हरिभाऊ रामचंद्र पवार यांनी सांगितले.दरम्यान, गतवर्षी अनेक संकटे आल्याने यंदा कापसाचे क्षेत्र घटणार असून सध्या मिरची लागवड सुरू असली तरी २५ टक्के मिरचीवर रोग पडत असल्याने शिवना येथील शेतकरी चंदन गुप्ता यांनी सांगितले.मिरची लागवडीवर होणारा खर्चसध्या ‘मल्चिंग’वर मिरची लागवड करण्याकडे शेतक-यांचा कल वाढला आहे. १ एकरसाठी मल्चिंग २० हजार रुपये, ठिबक २० हजार, रोप खर्च ८ हजार रुपये, १० हजार रुपये खत असा खर्च येत आहे. असा ५५ ते ६० हजार रुपये खर्च येत आहे.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी