शहरं
Join us  
Trending Stories
1
मान्सून एक्स्प्रेसला ‘बॅड पॅच’; १३ जूनपासून पुन्हा धो-धो..., शेतकरी सक्रिय मोसमी पावसाच्या प्रतीक्षेत
2
आजचे राशीभविष्य : ०९ जून २०२५; आजचा दिवस व्यावसायिकांसाठी लाभदायी, नोकरीत बढती संभवते
3
...तर गुप्ता, सुपेकरांची चौकशी होणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
4
अमेरिकेतील हॉलीवूडचे शहर पेटले; पोलिसांवर फेकले दगड अन् फटाके, अवैध प्रवाशांविरुद्धच्या मोहिमेला प्रचंड विरोध
5
मोबाइल, लॅपटॉपमधून येणाऱ्या प्रकाशामुळेही तुम्हाला होऊ शकतो कॅन्सर; डॉक्टर म्हणतात, मोबाइल पाहणे थांबवाच
6
लाचखोर उपजिल्हाधिकारी, डीवायएसपी, तहसीलदार यांना अभय कोणाचे?; ३६६ प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत
7
पारंपरिक पदवी अभ्यासक्रमांमध्ये ५० टक्के कौशल्याधारित शिक्षण, युजीसीकडून लवकरच मार्गदर्शक सूचना; विद्यार्थ्यांच्या रोजगार क्षमतेत होणार वाढ
8
यूपीपाठोपाठ दिल्लीत एन्काउंटरमध्ये वाढ, जूनच्या पहिल्या पाच दिवसांत पाच एन्काउंटर
9
नेपाळच्या ७ हजार लोकांना अमेरिका सोडावी लागणार, अमेरिकेने विशेष देशाचा दर्जा काढून घेतला
10
अंध वकिलाकडून सुप्रीम कोर्टात प्रथमच युक्तिवाद, भारतीय न्यायव्यवस्थेत ऐतिहासिक क्षण
11
जळक्या नोटा : न्या. वर्मांपुढे आता राजीनाम्याचाच पर्याय
12
मणिपूर पेटले, निदर्शकांनी अंगावर घेतले पेट्रोल ओतून
13
घातपात की आणखी काही? योगी आदित्यनाथांच्या दौऱ्यापूर्वी ५०० किलो स्फोटके सापडली; 20 किमीपर्यंत पेरली...
14
गोव्यात चाललेय काय? आरोग्य मंत्र्यांकडून सीएमओचे काल निलंबन, आज मुख्यमंत्र्यांनी केले रद्द
15
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  
16
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
17
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
18
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
19
जळगाव: लग्नाच्या वाढदिवसासाठी माहेरावरून आली अन् घरात पाय ठेवताच दिसला पतीचा मृतदेह
20
इंजिनिअरिंगच्या 'त्या' विद्यार्थिनीचा खून प्रेम प्रकरणातून, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय? मित्राविरुद्ध गुन्हा दाखल

यंदा बदल्यांसाठी दबावनीती ‘फेल’

By admin | Updated: June 9, 2016 23:53 IST

औरंगाबाद : जिल्ह्यात कधी बिंदू नामावली अद्ययावत नसल्यामुळे, तर आता सहशिक्षकांच्या जागाच रिक्त नसल्यामुळे आंतरजिल्हा बदलीने येणाऱ्या शिक्षकांना सामावून घेण्याची शक्यता मावळली आहे.

औरंगाबाद : जिल्ह्यात कधी बिंदू नामावली अद्ययावत नसल्यामुळे, तर आता सहशिक्षकांच्या जागाच रिक्त नसल्यामुळे आंतरजिल्हा बदलीने येणाऱ्या शिक्षकांना सामावून घेण्याची शक्यता मावळली आहे. आंतरजिल्हा बदलीपात्र शिक्षकांनी अनेकदा निवेदने देऊन, उपोषण करून प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. आंतरजिल्हा बदलीपात्र शिक्षकांनी नवीन संघटनाही स्थापन केली. त्या माध्यमातून दबावाचे राजकारण केले; पण ते सारे व्यर्थ गेल्याची भावना आता शिक्षकांची झाली आहे. ३० मे ते ७ जूनदरम्यान जिल्हा परिषद मुख्यालयासमोर आंतरजिल्हा बदलीपात्र शिक्षकांनी उपोषण केले. आंतरजिल्हा बदलीने येणाऱ्या शिक्षकांना पदस्थापना द्या, या एकाच मागणीसाठी आंतरजिल्हा बदलीपात्र शिक्षकांनी उपोषणाला गर्दी केली. तेव्हा प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी आर. एस. मोगल यांनी जिल्हा परिषद शाळांमध्ये सहशिक्षकांची पदे रिक्त नसल्यामुळे सद्य:स्थितीत तरी आंतरजिल्हा बदलीने येणाऱ्या शिक्षकांना पदस्थापना देणे शक्य नाही, असे कळविले. तरीदेखील शिक्षकांनी उपोषण सुरूच ठेवले. अखेर ६ जून रोजी शिक्षणाधिकाऱ्यांनी उपोषणार्थी शिक्षकांना एका पत्राद्वारे कळविले की, जून महिन्यात पदोन्नतीची प्रक्रिया राबविली जाईल. त्यानुसार काही पदे रिक्त झालीच तर त्यावर किंवा बिंदू नामावलीनुसार रिक्त बिंदूचा ताळमेळ घालून आंतरजिल्हा बदलीपात्र शिक्षकांना पदस्थापना दिल्या जातील. येथून दुसऱ्या जिल्ह्यात जाणारे जवळपास ५०० ते ७०० शिक्षक आहेत. त्यांना शिक्षणाधिकारी कार्यालयाने नाहरकत प्रमाणपत्रसुद्धा दिलेले आहे; पण राज्यातील अनेक जिल्हा परिषदांनी औरंगाबाद जिल्ह्यातून जाणाऱ्या शिक्षकांना सामावून घेण्यास असमर्थता दर्शविली आहे. त्यामुळे आंतरजिल्हा बदलीने जाणारे शिक्षक येथेच कार्यरत राहिले. दुसरीकडे राज्यातील अनेक जिल्ह्यांतून औरंगाबाद जिल्हा परिषद शाळांमध्ये येणाऱ्या शिक्षकांची संख्या जवळपास ५०० आहे. जिल्ह्यात सहशिक्षकांची ६ हजार ८९७ एवढी पदे मंजूर असून, सध्या ६ हजार ७३१ सहशिक्षक कार्यरत आहेत. मंजूर पदांच्या प्रमाणात रिक्त पदे शिल्लक नाहीत. अलीकडेच जिल्हा परिषद शिक्षण विभागाने शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया राबविली. आता १५ जूनपर्यंत पदोन्नतीची प्रक्रिया प्रस्तावित आहे. पदोन्नतीमुळे रिक्त होणाऱ्या पदांचा बिंदू नामावलीनुसार ताळमेळ घालून रिक्त होणाऱ्या बिंदूवर नियमानुसार आंतरजिल्हा बदलीपात्र शिक्षकांना सामावून घेण्याची कार्यवाही करण्यास शिक्षण विभागाने अनुकूलता दर्शवली आहे.एकीकडे जिल्ह्यात शिक्षकांच्या जागाच रिक्त नाहीत. पदोन्नतीमुळे काही जागा रिक्त होतील, पण रिक्त होणाऱ्या जागांवर बिंदू नामावलीनुसार शिक्षकांना सामावून घेतल्यास बोटावर मोजण्याएवढ्याच शिक्षकांना आंतरजिल्हा बदलीची संधी मिळू शकेल.