शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

यंदा विठ्ठलाच्या दर्शनासाठी राहणार एकच रांग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2019 22:33 IST

पंढरपूर येथील विठ्ठल मंदिरात दर्शनासाठी येणा-या महिला व पुरुष भाविकांची एकच रांग ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.

वाळूज महानगर : पंढरपूर येथील विठ्ठल मंदिरात दर्शनासाठी येणा-या महिला व पुरुष भाविकांची एकच रांग ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. दिंडीद्वारे दर्शनासाठी येणा-या भाविकांसाठी दर्शनाची खास व्यवस्था करण्यात आली असून, त्यांना मंदिरात थेट प्रवेश देण्याचा निर्णय आढावा बैठकीत घेण्यात आला.

आषाढी यात्रेच्या नियोजनासाठी श्री विठ्ठल-रुख्मिणी मंदिरात मंगळवारी पोलीस प्रशासन व संस्थान पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत संयुक्त बैठक घेण्यात आली. बैठकीला एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्याचे निरीक्षक अनिल गायकवाड, वाहतुक शाखेचे निरीक्षक शेषराव उदार, विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र पवार, सचिव भिकाजी खोतकर, माजी अध्यक्ष रत्नाकर पा.शिंदे, माजी जि.प.सदस्य अनिल चोरडिया,पंढरपूचे सरपंच शेख अख्तर, उपसरपंच महेंद्र खोतकर, वळदगावचे सरपंच कांतराव पा.नवले, अप्पासाहेब झळके आदींची प्रमुख उपस्थिती होती.

१२ जुलै रोजी आषाढी यात्रेनिमित्त छोट्या पंढरपुरात जवळपास १० लाख भाविकांंची गर्दी होत असते. कामगार चौक व तिरंगा चौकापासून दुकाने थाटण्यास बंदी घालण्यात आली आहे. यात्रेत चोºया रोखण्यासाठी साध्या वेशातील पोलिसांबरोबर व संस्थानचे स्वंयसेवक तैनात राहणार आहेत. भाविकांना शुद्ध पिण्याचे पाणी, आरोग्य सेवा आणि फिरत्या स्वच्छतागृहाची व्यवस्थाही उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेण्यात आला.

या प्रसंगी माजी पं. स. सदस्य गणेश नवले, कल्याण नवले, देवीदास आदमाने, प्रकाश झळके, सुभाष साबळे, शेख जावेद, राधाकिसन नवले, दीपक कानडे, सहायक फौजदार राजेंद्र मोरे, राजेश वाघ, पोहेकॉ.रामदास गाडेकर, पोना. संजय हंबीर आदीसह वळदगाव व पंढरपूरच्या ग्रामस्थांची उपस्थिती होती.

टॅग्स :Walujवाळूज