शहरं
Join us  
Trending Stories
1
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
2
पाकिस्तानच्या गोळीबारात भारतीय जवान शहीद; डॉक्टरांनी वाचविण्याचा खूप प्रयत्न केला...
3
नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून आगळीक, भारतीय नागरिकांच्या मृत्यूनंतर चोख प्रत्युत्तर देण्याचे लष्कराला आदेश 
4
पॉवरप्लेमध्ये अर्धा संघ तंबूत परतल्यावरही CSK नं काढली मॅच; प्लेऑफ्स शर्यतीत KKR तळ्यात मळ्यात
5
Operation Sindoor 2.0: पाकिस्तानला सहजासहजी सोडणार नाही भारत, आणखी काय-काय घडणार?
6
Thank You Rohit Sharma! हिटमॅनच्या कसोटी निवृत्तीनंतर कोण काय म्हणाले? वाचा सविस्तर
7
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे अवसान गळाले, आता म्हणतात, "आम्ही संयम पाळू, तणाव आणखी वाढता नये’’  
8
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
9
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
10
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
11
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
12
Operation Sindoor Live Updates: रक्ताच्या एकेक थेंबाचा बदला घेऊन, शाहबाज शरीफ यांची भारताला धमकी
13
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
14
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
15
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
16
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
17
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
18
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
19
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
20
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त

यशश्री मुंडेंचीही राजकारणात ‘एन्ट्री’ !

By admin | Updated: March 30, 2015 00:43 IST

परळी : तालुक्याच्या राजकारणावर शेवटपर्यंत मजबूत पकड ठेवणाऱ्या गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर सत्तास्थाने अबाधित ठेवण्याचे मोठे आव्हान पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्यावर येऊन ठेपले होते

परळी : तालुक्याच्या राजकारणावर शेवटपर्यंत मजबूत पकड ठेवणाऱ्या गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर सत्तास्थाने अबाधित ठेवण्याचे मोठे आव्हान पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्यावर येऊन ठेपले होते. डॉ. प्रीतम खाडे यांना अनपेक्षितपणे राजकारणात उतरावे लागले. वैद्यनाथ कारखाना निवडणुकीच्या निमित्ताने स्व. मुंडे यांच्या धाकट्या कन्या अ‍ॅड. यशश्री मुंडे यांचीही राजकीय कारकीर्द सुरू झाली आहे.२१ जागांसाठी १२१ उमेदवार रिंगणात आहेत. स्थापनेपासून कारखान्यावर गोपीनाथराव मुंडे यांचा रुबाब होता. मात्र आता कारखान्याची सत्ता खेचून घेण्यासाठी विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी कंबर कसली आहे. जेष्ठ संचालक व धनंजय यांचे वडील पंडितराव मुंडे यांनीही जोर लावला आहे. त्यामुळे पंकजाविरूद्ध धनंजय अशी थेट लढत पुन्हा एकदा पहायला मिळत आहे. धनंजय मुंडे, पंडितराव मुंडे हे पिता-पुत्र एकीकडून तर पंकजा मुंडे, अ‍ॅड. यशश्री मुंडे या भगिनी दुसरीकडून झुंज देत आहेत. अस्तित्व, प्रतिष्ठा आणि नेतृत्वाचा या निमित्ताने कस लागत आहे.पंकजा यांच्याकडे राजकारणाचा अनुभव आहे. मात्र, अ‍ॅड. यशश्री मुंडे पहिल्यांदाच निवडणूक लढत आहेत. वकिलीचे शिक्षण घेऊन बॅरिस्टर होण्याचे स्वप्न रंगविणाऱ्या यशश्री यांना वडिलांच्या निधनानंतर अचानक राजकारणात यावे लागले आहे. विधानसभा व लोकसभा पोटनिवडणुकीवेळी त्या प्रचारात सक्रिय होत्या.वैद्यनाथ कारखान्याचा कारभार मागील काही दिवसांपासून यशश्री याच पाहत आहेत. त्यामुळे त्यांचा गृहपाठ झाला आहे. मोठ्या भगिनी पंकजा यांच्यासाठी त्या धावल्या आहेत. राजकारणाच्या डावपेचात विरोधकांना त्या कशा सामोरे जातात? यावरच त्यांचे भवितव्य अवलंबून आहे. (वार्ताहर)विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. हे आव्हान पेलवताना त्यांच्या मदतीला अ‍ॅड. यशश्री मुंडे धावल्या होत्या.४मतदारसंघातील विविध गावांमध्ये भेटीगाठी घेऊन त्यांनी प्रचार केला होता.४गोपीनाथ मुंडे यांनी केलेल्या कार्याचा लेखाजोखा त्यांनी मोठ्या खुबीने मतदारांपुढे ठेवला होता.४गोपीनाथराव मुंडे यांच्यानंतर कारखान्याची धुरा यशश्री यांच्याकडे होती.४पहिल्याच निवडणुकीत त्यांच्या नेतृत्वाचा कस लागणार आहे.