शहरं
Join us  
Trending Stories
1
Sandhya Shantaram Death: नृत्याच्या 'बिजली'च्या पैंजणांचा आवाज थांबला..! ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचं निधन
2
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
3
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
4
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
5
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
6
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
7
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला लक्ष्मी योगात 'या' राशींवर बरसणार सुख-संपत्तीचे चांदणे!
8
"त्यांचा आशीर्वादच मिळाल्याची भावना होती...", संध्या शांताराम यांच्या निधनानंतर प्रिया बेर्डेंनी दिला आठवणींना उजाळा
9
“आम्ही युती-आघाडीचे बळी ठरलो, आता स्थानिकांच्या भावना लक्षात घेणार”; उद्धव ठाकरे थेट बोलले
10
"गौतमी पाटील तू महाराष्ट्राचा बिहार केलास, तुझी कार..."; मराठी अभिनेत्याने व्यक्त केला संताप
11
वनडेतही नवे पर्व! रोहित शर्माचं मोठं स्वप्न भंगलं; गिलच्या कॅप्टन्सीत किंग कोहलीसमोरही असेल चॅलेंज
12
"अरे बिट्टू, मी तुझ्यासाठी काय केलं नाही, तरीही तू..."  मुलीचा ब्रेकअपनंतरचा व्हिडीओ व्हायरल!
13
'जननायक' पदवीची चोरी होतेय , बिहारी वाले सावधान! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधी आणि 'राजद'वर निशाणा साधला
14
Uddhav Thackeray : बाळासाहेबांच्या पार्थिवावरुन रामदास कदम यांनी केलेल्या आरोपावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
15
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला १ रुपयांचा शिक्का करेल कमाल, नशीब उजळेल, व्हाल मालामाल 
16
धक्कादायक घटना ; 'कफ सिरप' घेतल्याने आठ बालकांचा मृत्यू ! जीव जाण्याला काय ठरले कारणीभूत ?
17
हृदयद्रावक! बॉयफ्रेंडसोबत पळून गेली बायको; ढसाढसा रडत नवऱ्याने ४ मुलांसह नदीत मारली उडी
18
IND vs AUS: ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; रोहित शर्माला ठेंगा! शुबमन गिल वनडेचा नवा कॅप्टन
19
"हात पाय सलामत ठेवायचे असतील तर…", आमदार संतोष बांगर यांची अधिकाऱ्यांना धमकी, कॉल रेकॉर्डिंग व्हायरल
20
IND vs WI: मोहम्मद सिराज, रवींद्र जडेजाची कमाल; सामन्याच्या तिसऱ्याच दिवशी वेस्ट इंडीजचा खेळ खल्लास!

यशश्री बाखरिया यांचे नगरसेवकपद रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2016 23:43 IST

औरंगाबाद : नगरसेविका म्हणून निवडून आलेल्या यशश्री लक्ष्मीनारायण बाखरिया यांचे नगरसेवकपद रद्द करण्याचा धाडसी निर्णय शुक्रवारी मनपा आयुक्तओम प्रकाश बकोरिया यांनी घेतला.

औरंगाबाद : महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये सर्वात कमी वयाच्या नगरसेविका म्हणून निवडून आलेल्या यशश्री लक्ष्मीनारायण बाखरिया यांचे नगरसेवकपद रद्द करण्याचा धाडसी निर्णय शुक्रवारी मनपा आयुक्तओम प्रकाश बकोरिया यांनी घेतला. मागील एक महिन्यात आयुक्तांनी नगरसेवकपद रद्द करण्याची ही दुसरी कारवाई केली. यापूर्वी बेगमपुऱ्याचे नगरसेवक ज्ञानोबा जाधव यांचे नगरसेवकपद त्यांनी रद्द केले होते.मागील महिन्यात वॉर्ड क्र. १२ पहाडसिंगपुरा-बेगमपुरा येथील अपक्ष नगरसेवक ज्ञानोबा जाधव यांचे जात प्रमाणपत्र जातपडताळणी समितीने रद्द ठरविले होते. समितीच्या अहवालावरून आयुक्त बकोरिया यांनी त्यांचे पद रद्द केले होते. त्यानंतर वॉर्ड क्र. ४७ राजाबाजार या महिला ओबीसी वॉर्डातून अपक्ष उमेदवार यशश्री लक्ष्मीनारायण बाखरिया निवडून आल्या होत्या. बाखरिया यांचे वय कमी असून, त्यांनी खोटे जन्म प्रमाणपत्र देऊन निवडणूक लढविण्याचा आरोप गजेंद्र सिद्ध यांनी केला होता.या प्रकरणात मनपा आयुक्तांसह निवडणूक आयोगापर्यंत तक्रारी करण्यात आल्या होत्या. शासन निर्देशानुसार महापालिकेने या प्रकरणाची सखोल चौकशी केली. महाराष्ट्र शासनाचे आरोग्य सेवा संचालक जन्म-मृत्यू निबंधक यांनी बाखरिया यांचे जन्म प्रमाणपत्र रद्द ठरविले होते. २५ मे १९९८ मध्ये बाखरिया यांना वितरित करण्यात आलेले जन्म प्रमाणपत्र रद्द ठरविण्यात आले. यशश्री यांची खरी जन्मतारीख १५ मे १९९५ आहे. मनपा निवडणुकीत त्यांनी १५ जानेवारी १९९४ अशी जन्मतारीख सादर केली होती.मनपा आयुक्त बकोरिया यांनी शुक्रवारी रात्री नगरसेविका यशश्री बाखरिया यांचे नगरसेवकपद रद्द करण्याचा निर्णय घेतला. जन्माचे खोटे प्रमाणपत्र देऊन निवडून आल्यापासून आजपर्यंत मनपाकडून घेतलेले सर्व आर्थिक लाभ परत करावेत, असे आदेशात म्हटले आहे. मनपा आयुक्तांच्या या कारवाईने पुन्हा एकदा मनपा वर्तुळात खळबळ उडाली आहे. १६ जण रडारवरबोगस जात प्रमाणपत्र, वयाचा खोटा दाखला, तीन अपत्ये आदी प्रकरणांमध्ये १६ पेक्षा अधिक नगरसेवक कारवाईच्या रडारवर आहेत. काही प्रकरणे न्यायप्रविष्ट असल्याने कारवाईस विलंब होत आहे. मनपा आयुक्तांनी आतापर्यंत दोन अपक्षांवर कारवाई केली आहे. एमआयएम व इतर पक्षांकडून निवडून आलेल्या नगरसेवकांवरही गंभीर आरोप आहेत. ज्या नगरसेवकांची प्रकरणे आयुक्तांकडे प्रलंबित आहेत, त्यांचे धाबे दणाणले आहेत.