शहरं
Join us  
Trending Stories
1
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं?
2
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 
3
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
4
"दिल्लीत ठाकरेंचा मान काय ते लक्षात आलं, आमच्यासोबत असताना ते..."; CM देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंवर बाण
5
'माझे मित्र पुतिन...', ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान PM मोदींनी रशियन राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला; भारत भेटीचे आमंत्रण दिले
6
"...नाहीतर भारताने अमेरिकेला गुड बाय म्हणावं"; शशी थरूर यांचा मोदी सरकारला मोलाचा सल्ला
7
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
8
Nashik: पती-पत्नीने एक्स्प्रेस ट्रेनसमोर उडी मारत आयुष्य संपवले, लग्नाला झाली होती ११ वर्ष
9
Donald Trump Tariff News : ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात भारत 'अ‍ॅक्शन'मोडवर ! अमेरिकेकडून शस्त्र खरेदी थांबवली, राजनाथ सिंह यांचा USA दौराही पुढे ढकलला
10
'महादेवी हत्तीणीवर उपचार करण्यासाठी महाराष्ट्रात एकही केंद्र नाही', 'पेटा'ने जाहीर केली भूमिका
11
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
12
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
13
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
14
DPL 2025 च्या नव्या हंगामात प्रितीच्या 'हिरो'नं केली हवा! १९८ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या १११ धावा
15
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
16
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
17
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
18
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
19
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
20
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी

पंचांगाचा चुकला अंदाज

By admin | Updated: August 27, 2014 00:43 IST

उदगीर : पावसाअभावी उदगीर तालुक्यातील खरीप हंगाम धोक्यात सापडलेला आहे़ पेरणीनंतर हुलकावणी दिलेल्या पावसामुळे जवळपास ३० ते ४० टक्के पिकाचे नुकसान झाले आहे़

उदगीर : पावसाअभावी उदगीर तालुक्यातील खरीप हंगाम धोक्यात सापडलेला आहे़ पेरणीनंतर हुलकावणी दिलेल्या पावसामुळे जवळपास ३० ते ४० टक्के पिकाचे नुकसान झाले आहे़ उर्वरित पिकेही वाळून जात असतानाच मघा नक्षत्राचा उत्तरार्ध बळीराजाला पावला़ ऐन पोळ्यातच पावसाने हजेरी लावल्यामुळे उरल्या-सुरल्या पिकांना जीवदान मिळण्याची आशा शेतकरी बाळगून आहेत़ दरम्यान, पंचागकर्त्यांनी मघा नक्षत्राबद्दलचा वर्तविलेला अंदाजही ‘लहरी’ वरुणराजाने चुकविला आहे़यंदाच्या हंगामात उदगीर तालुक्यात आजतागायत केवळ ३० टक्के इतकाच पाऊस झाला आहे़ त्यामुळे जलसाठे अजूनही कोरडेठाक आहेत़ पावसाच्या पाच नक्षत्रात जेमतेम पाऊस झाल्यानंतर शेतकऱ्यांनी महागडी बियाणे, खते, औषधे खरेदी करुन पेरणी केली़ मात्र त्यानंतर पाऊस गायब झाल्याने कुठे दुसऱ्यांदा तर कुठे तिसऱ्यांदा पेरणी करावी लागली़ तरीही पावसाने ओढ दिल्यामुळे शेतकऱ्यांची नगदी समजली जाणारे उडीद, मूग ही पिके पूर्णत: वाया गेली़ सोयाबीन व अन्य पिके वाळून जाण्याच्या मार्गावर असतानाच ‘मघा’ नक्षत्राने बळीराजाला मदतीचा हात दिला़ ‘तुझ्या अपार कष्टानं, बहरते सारी भुई़़़’ या काव्यपंक्तीप्रमाणे मघाच्या उत्तरार्धात झालेल्या या पावसामुळे भुई नवतेजाने बहरु लागली आहे़सोमवार व मंगळवार अशा दोन्ही दिवशी उदगीर तालुक्यात पाऊस झाला़ सोमवारी उदगीर तालुक्यात सर्वाधिक पाऊस नागलगाव मंडळात ९० मिमी इतका झाला आहे़ पाठोपाठ मोघा मंडळात ६९, नळगीर भागात ३५, उदगीर १३, वाढवणा २१, देवर्जन व हेर भागात प्रत्येकी ५ मिमी इतका पाऊस झाला आहे़(वार्ताहर)कोल्ह्यास साधारणत: धूर्त अशी उपाधी मानवानेच दिली आहे़ परंतु, याच कोल्ह्याने मानवाला काही अंशी दिलासा दिला आहे़ मघा नक्षत्राचे वाहन कोल्हा असून, या नक्षत्राच्या अखेरीस होत असलेल्या समाधानकारक पावसाने मदतीचा हात मिळाला आहे़ तत्पूर्वीच्या मृग, आर्द्रा, पुनर्वसू, पुष्य व अश्लेषा नक्षत्रात केवळ ३० टक्के इतकाच पाऊस झाला होता़४मघा नक्षत्राच्या पूर्वार्धात चांगला पाऊस होइल, नंतर हुलकावण्या देईल, ओढ धरेल, असा अंदाज पंचागकर्त्यांकडून वर्तविण्यात येत होता़ परंतु, मघाचा पूर्वाधच कोरडा जाऊन उत्तरार्ध मात्र चांगल्या पावसाचा जात असल्याने वरुणराजांनी आपल्या लहरी स्वभावाद्वारे पंचागकर्त्यांचाही अंदाज चुकविला असल्याची चर्चा सुरु आहे़गेल्या दोन दिवसांपासून जळकोट व देवणी तालुक्यातही पावसाला सुरुवात झाली आहे़ अतनूर व परिसरातही मंगळवारी पाऊस झाला़ मात्र, खरीपाचे झालेले नुकसान या पावसाने भरुन येणार नाही़ संभाव्य नुकसान मात्र टळेल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहे़