शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

पंचांगाचा चुकला अंदाज

By admin | Updated: August 27, 2014 00:43 IST

उदगीर : पावसाअभावी उदगीर तालुक्यातील खरीप हंगाम धोक्यात सापडलेला आहे़ पेरणीनंतर हुलकावणी दिलेल्या पावसामुळे जवळपास ३० ते ४० टक्के पिकाचे नुकसान झाले आहे़

उदगीर : पावसाअभावी उदगीर तालुक्यातील खरीप हंगाम धोक्यात सापडलेला आहे़ पेरणीनंतर हुलकावणी दिलेल्या पावसामुळे जवळपास ३० ते ४० टक्के पिकाचे नुकसान झाले आहे़ उर्वरित पिकेही वाळून जात असतानाच मघा नक्षत्राचा उत्तरार्ध बळीराजाला पावला़ ऐन पोळ्यातच पावसाने हजेरी लावल्यामुळे उरल्या-सुरल्या पिकांना जीवदान मिळण्याची आशा शेतकरी बाळगून आहेत़ दरम्यान, पंचागकर्त्यांनी मघा नक्षत्राबद्दलचा वर्तविलेला अंदाजही ‘लहरी’ वरुणराजाने चुकविला आहे़यंदाच्या हंगामात उदगीर तालुक्यात आजतागायत केवळ ३० टक्के इतकाच पाऊस झाला आहे़ त्यामुळे जलसाठे अजूनही कोरडेठाक आहेत़ पावसाच्या पाच नक्षत्रात जेमतेम पाऊस झाल्यानंतर शेतकऱ्यांनी महागडी बियाणे, खते, औषधे खरेदी करुन पेरणी केली़ मात्र त्यानंतर पाऊस गायब झाल्याने कुठे दुसऱ्यांदा तर कुठे तिसऱ्यांदा पेरणी करावी लागली़ तरीही पावसाने ओढ दिल्यामुळे शेतकऱ्यांची नगदी समजली जाणारे उडीद, मूग ही पिके पूर्णत: वाया गेली़ सोयाबीन व अन्य पिके वाळून जाण्याच्या मार्गावर असतानाच ‘मघा’ नक्षत्राने बळीराजाला मदतीचा हात दिला़ ‘तुझ्या अपार कष्टानं, बहरते सारी भुई़़़’ या काव्यपंक्तीप्रमाणे मघाच्या उत्तरार्धात झालेल्या या पावसामुळे भुई नवतेजाने बहरु लागली आहे़सोमवार व मंगळवार अशा दोन्ही दिवशी उदगीर तालुक्यात पाऊस झाला़ सोमवारी उदगीर तालुक्यात सर्वाधिक पाऊस नागलगाव मंडळात ९० मिमी इतका झाला आहे़ पाठोपाठ मोघा मंडळात ६९, नळगीर भागात ३५, उदगीर १३, वाढवणा २१, देवर्जन व हेर भागात प्रत्येकी ५ मिमी इतका पाऊस झाला आहे़(वार्ताहर)कोल्ह्यास साधारणत: धूर्त अशी उपाधी मानवानेच दिली आहे़ परंतु, याच कोल्ह्याने मानवाला काही अंशी दिलासा दिला आहे़ मघा नक्षत्राचे वाहन कोल्हा असून, या नक्षत्राच्या अखेरीस होत असलेल्या समाधानकारक पावसाने मदतीचा हात मिळाला आहे़ तत्पूर्वीच्या मृग, आर्द्रा, पुनर्वसू, पुष्य व अश्लेषा नक्षत्रात केवळ ३० टक्के इतकाच पाऊस झाला होता़४मघा नक्षत्राच्या पूर्वार्धात चांगला पाऊस होइल, नंतर हुलकावण्या देईल, ओढ धरेल, असा अंदाज पंचागकर्त्यांकडून वर्तविण्यात येत होता़ परंतु, मघाचा पूर्वाधच कोरडा जाऊन उत्तरार्ध मात्र चांगल्या पावसाचा जात असल्याने वरुणराजांनी आपल्या लहरी स्वभावाद्वारे पंचागकर्त्यांचाही अंदाज चुकविला असल्याची चर्चा सुरु आहे़गेल्या दोन दिवसांपासून जळकोट व देवणी तालुक्यातही पावसाला सुरुवात झाली आहे़ अतनूर व परिसरातही मंगळवारी पाऊस झाला़ मात्र, खरीपाचे झालेले नुकसान या पावसाने भरुन येणार नाही़ संभाव्य नुकसान मात्र टळेल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहे़