शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट निवडणुकीचा ‘निकाल’ लागताच राज ठाकरे-CM फडणवीस भेट; पाऊण तास चर्चा, तर्कांना उधाण
2
"श्री गणेश करते हैं..."; जेव्हा रशियन राजदूतांनी हिंदीमध्ये सुरू केली पत्रकार परिषद! 'सुदर्शन चक्र'चा उल्लेख करत दिलं मोठं आश्वासन, बघा VIDEO
3
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
4
Coconut Oil : नारळ तेल बनलं VIP प्रोडक्ट; दोन वर्षांत तीन पटींनी वाढली किंमत
5
पत्नीचा मृतदेह पाहून पतीला बसला धक्का, एका कोपऱ्यात बसला आणि तासाभरातच...  
6
Ramayana चित्रपटातील 'राम' Ranbir Kapoor नं 'या' कंपनीत केली मोठी गुंतवणूक; शेअर करुन देतोय जबरदस्त कमाई
7
शिल्पा शेट्टीच्या रेस्टॉरंटमध्ये पोहोचली 'सावली', प्राप्ती रेडकरचा ग्लॅम लूक; सोबत दिसली 'भैरवी'
8
शाळेत मारल्याच्या रागातून नववीतील विद्यार्थ्याने शिक्षकावर झाडली गोळी, लंच बॉक्समधून आणला कट्टा आणि...  
9
भारत अमेरिकेला आणखी एक झटका देण्याच्या तयारीत; कच्च्या तेलानंतर रशियासोबत करू शकतो ‘ही’ डील
10
OMG! आर्यन खानची पहिलीच सीरिज आग लावणार, प्रीव्ह्यूच्या शेवटी 'त्या' डायलॉगने वेधलं लक्ष
11
अमेरिकेची 'मोस्ट वॉन्टेड' महिला अखेर भारतात सापडली, एफबीआयने केली मोठी कारवाई!
12
BEST Election Results: ठाकरे बंधूंच्या सपशेल पराभवावर CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
13
Stock Market Today: शेअर बाजाराची मजबूत सुरुवात, Nifty २५,१०० च्या वर; NBFCs, रियल्टी शेअर्समध्ये तेजी
14
डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफवर रामबाण तोडगा सापडला, हे मित्र बनणार भारतासाठी ढाल
15
सत्काराच्या शालीने वकिलाचा न्यायालयातच गळफास; खिशात चिठ्ठी, पण पोलिसांनी माहिती दडवली
16
मृत्यूच्या खाईत सौंदर्याचा सशक्त आवाज; पॅलेस्टाइनची तरुणी यंदा 'मिस युनिव्हर्स'मध्ये...
17
अदानींनी परदेशी बँकांकडून घेतलं 24000000000 रुपयांचं कर्ज! जाणून घ्या, एवढ्या मोठ्या रकमेचं काय करणार? किती व्याज लागणार? 
18
शाहरुखचा लेक त्याचाच डुप्लिकेट! लूक अन् आवाज सगळंच सेम, पहिल्यांदाच आला प्रेक्षकांसमोर, म्हणाला...
19
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
20
अक्षय कुमार, अर्शद वारसी हाजिर हो..! दिवाणी न्यायालयात प्रकरण दाखल; कारण काय?

अविश्वास दाखविल्यामुळे संताप

By admin | Updated: March 17, 2015 00:49 IST

औरंगाबाद : शासनाने १० रस्त्यांच्या विकासासाठी देऊ केलेल्या २४ कोटी ३३ लाख रुपयांच्या निधीतून एक पैसाही मनपाच्या तिजोरीत येणार नाही.

औरंगाबाद : शासनाने १० रस्त्यांच्या विकासासाठी देऊ केलेल्या २४ कोटी ३३ लाख रुपयांच्या निधीतून एक पैसाही मनपाच्या तिजोरीत येणार नाही. मनपाच्या यंत्रणेवर शासनाने दाखविलेल्या अविश्वासाचे पडसाद आज स्थायी समितीच्या बैठकीत उमटले. तसेच मध्य मतदारसंघासह अल्पसंख्याक वसाहतींमध्ये त्या निधीतून एकही रस्ता होणार नसल्याने काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांनी शासनाचा निषेध केला. शासनाने रस्ते विकासासाठी निधीचा अध्यादेश काढताना विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी व मनपा आयुक्तांची समिती स्थापन केली आहे. त्यामुळे मनपावर अविश्वास दाखविण्याची ही पहिलीच घटना घडली आहे. सदस्य मीर हिदायत अली म्हणाले, २४ कोटी ३३ लाखांचा निधी मिळाला आहे. त्यामध्ये अल्पसंख्याक वसाहतींना वगळले आहे. मनपावर शासनाने अविश्वास दाखविणे ही चांगली बाब नाही. काशीनाथ कोकाटे म्हणाले, २४ कोटी खरंच मिळाले की फक्त घोषणा केली आहे. त्या रस्त्यांना सर्वसाधारण सभेने मंजुरी दिली आहे का, विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केली असली तरी मनपा ही स्वायत्त संस्था आहे. हा प्रकार योग्य नाही. किराडपुऱ्यातील राममंदिर ते आझाद चौक हा रस्ता त्या निधीत नाही. राज्यकर्ते रामाला विसरल्याचा टोला त्यांनी लगावला. उपअभियंता के. आर. कुलकर्णी म्हणाले, २४.३३ कोटींच्या रस्त्यांसाठी १२ मार्च रोजी बैठक झाली. ते रस्ते मनपाच करणार आहे. तसेच राममंदिर ते आझाद चौक हा रस्ता २०१० साली डिफर्ड पेमेंटमध्ये घेतला होता, त्याचे काम अजून झाले नाही. रामनवमीपर्यंत त्या रस्त्याचे काम करण्याचे आदेश सभापती वाघचौरे यांनी दिले. मनपाने शहरात हाती घेतलेल्या १९ पैकी १३ रस्त्यांची कामे रखडलेली आहेत. कंत्राटदारांनी अनेक रस्ते अर्धवट अवस्थेत सोडले आहेत. असे असताना मनपाने कोर्टाला दिशाभूल करणारी माहिती दिली. ४या प्रकरणाचे वृत्त लोकमतने १६ मार्चच्या अंकात प्रकाशित केले होते. शहरातील बहुतांश रस्त्यांची कामे रखडली आहेत. ४ती कामे प्रशासनाने पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी सदस्य त्र्यंबक तुपे यांनी केली.दहा रस्त्यांच्या कामासाठी प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर निधी जिल्हाधिकाऱ्यांना उपलब्ध होईल. काम वेळेत व गुणवत्तेनुसार पूर्ण करण्यासाठी यंत्रणेत बदल करण्याचे अधिकार विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील समितीला देण्यात आले आहेत.