शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
3
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
4
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
5
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
6
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
7
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
8
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
9
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
10
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
11
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
12
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
13
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
14
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
15
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
16
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
17
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
18
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
19
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
20
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."

कामगारांच्या विविध मागण्यांसाठी सीटूचा कलेक्टर आॅफिसवर मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2017 01:11 IST

कामगारांच्या विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सीटूने आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : कामगारांच्या विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सीटूने आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. क्रांतीचौकातून हा मोर्चा निघाला. पैठणगेट, गुलमंडी, सिटीचौक, शहागंजमार्गे तो जिल्हाधिकारी कार्यालयावर आला.या मोर्चात संघटित व असंघटित क्षेत्रातील कामगारांनी व विशेषत: महिला कामगारांनी लक्षणीय सहभाग घेतला. अ.भा. सीटू व कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या आदेशानुसार देशभर आंदोलनाचा एक भाग म्हणून राष्टÑीय १२ मागण्या आणि स्थानिक चार मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला. द्वारसभा, पत्रक वाटप, पोस्टर-स्टीकर, बॅनरद्वारे रेल्वे स्टेशन एआयडीसी, चितेगाव एमआयडीसी, वाळूज एमआयडीसी, चिकलठाणा एमआयडीसी व शेंद्रा एमआयडीसीत मोर्चाचा प्रचार करण्यात आला होता.जिल्हाधिकाºयांना निवेदन सादर करण्यात आल्यानंतर मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. सीटूचे राज्य उपाध्यक्ष उद्धव भवलकर यांनी यावेळी मार्गदर्शन केले. येत्या ९ ते ११ नोव्हेंबरपर्यंत दिल्लीत महापाडाव आंदोलन होत आहे. त्यात सहभागी होण्यासाठी औरंगाबादहून पाचशे कामगार जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली. सभेत बसवराज पटणे, मंगल ठोंरे,दीपक अहिरे, दामोधर मानकापे, लक्ष्मण साक्रुडकर आदींची भाषणे झाली. शंकर ननुरे यांनी आभार मानले.कामगार संघटना कायदा १९२६, औद्योगिक विवाद कायदा १९४७, स्थायी आदेश अधिनियम इ. कायदे रद्द करून औद्योगिक संबंध बिलाच्या नियमांचा मसुदा केंद्र सरकारने मध्यवर्ती कामगार संघटनांसमोर चर्चेसाठी ठेवला होता. त्या बिलास विरोध करण्यात आला होता. कामगारांचा संप करण्याचा अधिकार संपुष्टात आणणारे असल्याचे कामगार संघटनांचे म्हणणे होते. आज मोर्चाद्वारे हेच म्हणणे मांडण्यात आले. अन्य मागण्या अशा- शेतमजुरांसह सर्व कामगारांना अठरा हजार रु. किमान वेतन द्या, वाढती महागाई व बेरोजगारी त्वरित रोखा, रेशन व्यवस्था व्यापक करा, कंत्राटी पद्धत बंद करा, समान कामाला समान वेतन द्या, राज्य व केंद्र सरकारच्या सर्व खात्यांतील रिक्त जागा तात्काळ भरा, कामगार कायद्यांची अंमलबजावणी करा, कामगार, शेतमजूर, कर्मचा-यांना मासिक तीन हजार रु. पेन्शन द्या, बोनस, भविष्यनिर्वाह निधी, बंद पडलेल्या कंपन्या चालू करा, घरकामगारांना सामाजिक सुरक्षा द्या, आदी मागण्यांचे हे निवेदन आहे.