शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
4
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
5
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
6
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
7
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
8
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
9
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
10
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
11
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
12
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
13
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
14
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
15
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
16
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
17
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
18
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
19
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
20
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
Daily Top 2Weekly Top 5

अध्यक्षांकडून सदस्यांना कामांचे चॉकलेट

By admin | Updated: December 20, 2015 23:58 IST

विजय सरवदे, औरंगाबाद स्थानिक काँग्रेस आमदारांनी मध्यस्थी केल्यानंतर जिल्हा परिषद अध्यक्षांविरुद्धचा रोष मावळला असल्याचे चित्र निर्माण केले जात आहे.

विजय सरवदे, औरंगाबाद स्थानिक काँग्रेस आमदारांनी मध्यस्थी केल्यानंतर जिल्हा परिषद अध्यक्षांविरुद्धचा रोष मावळला असल्याचे चित्र निर्माण केले जात आहे. सध्या तरी सत्ताधारी आणि विरोधी, अशा दोन्ही पक्षांतील सदस्य चिडीचूप आहेत. येणाऱ्या सर्वसाधारण सभेत कोणीही गदारोळ करू नये, यासाठी गोंधळी सदस्यांना सिमेंट बंधाऱ्यांचे ‘चॉकलेट’ देऊन समजूत काढण्याचा अध्यक्षांनी प्रयत्न केला. असे असले तरी सर्वसाधारण सभेला आता काही तासांचा अवधी शिल्लक असतानादेखील सदस्यांना विश्वासात घेण्यासाठी अध्यक्षांनी अद्यापही ‘प्रीजीबी मीटिंग’ बोलावलेली नाही. त्यामुळे सत्ताधारी घटक पक्षांतील सदस्यांच्या मनात सध्या तरी अध्यक्षांविरुद्धचा असंतोष खदखदत आहे, हे मात्र नक्की! जि. प. अध्यक्ष श्रीराम महाजन यांनी सर्व सदस्यांची नाडी ओळखली आहे. ते सदस्य सत्ताधारी असो की विरोधी. बैठकांमध्ये गोंधळ घालणाऱ्या सदस्यांना तुटपुंज्या स्वरुपाची कामे देऊन गप्प बसविण्यामध्ये महाजन तरबेज आहेत. एकेकाळी विरोधी पक्षाची भूमिका वटवताना सत्ताधाऱ्यांना घाम फोडणाऱ्या शिवसेना सदस्यांनीही मिळेल त्यावर समाधान मानून नांगी टाकली आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेत विरोधी पक्ष नावालाच उरलेला आहे. दुसरीकडे, सत्ताधारी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सदस्यांनी मध्यंतरी अध्यक्ष हे अकार्यक्षम आहेत, असा आरोप करून त्यांच्याविरुद्ध अविश्वास आणायचा म्हणून काही असंतुष्टांची मोट बांधण्याचा प्रयत्न केला होता. हा प्रकार घडलाच तर सध्याचे दिवस काँग्रेससाठी बरे नाहीत म्हणून काँग्रेसचे आमदार अब्दुल सत्तार, आ. सुभाष झांबड, राष्ट्रवादी काँग्रेसचे आ. भाऊसाहेब पाटील चिकटगावकर यांनी १२ डिसेंबर रोजी समन्वय समितीची बैठक घेतली. या बैठकीत असंतुष्ट सदस्यांची समजूत काढून अध्यक्षांना सदस्यांची कामे करण्याबाबत चांगलीच समज दिली. दुसऱ्या दिवसांपासून अध्यक्ष श्रीराम महाजन यांनी सत्ताधारी घटक पक्षातील एकेका नाराज सदस्याला बोलावून सिमेंट बंधाऱ्यांची नवीन कामे व कोल्हापुरी बंधाऱ्याच्या दुरुस्तीची कामे देण्याचे आमिष दाखविले. या घटनेला ८ दिवसांचा कालावधी होत आला. कोणाला किती निधी द्यायचा, यासंबंधीच्या नियोजनाला अद्यापही मूर्त स्वरूप आलेले नाही. यादीनुसार सदस्यांच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली नाही. सर्वसाधारण सभेला ३६ ते ४० तासांवर अवधी शिल्लक राहिलेला आहे. या सदस्यांना विश्वासात घेण्यासाठी पूर्व सर्वसाधारण सभेची बैठक बोलावण्यात आलेली नाही. त्यामुळे नाराज सदस्यांच्या असंतोषाचा केव्हाही स्फोट होऊ शकतो.