शहरं
Join us  
Trending Stories
1
...म्हणूनच पाक बिथरला! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये टॉप ५ दहशतवादांचा खात्मा; कोण आहेत ते?
2
'जर भारताने हल्ले थांबवले, तर आम्हीही आताच थांबवू', पाकिस्तानचे उप पंतप्रधान इशाक डार यांचा कांगावा
3
मोठ्या विक्रीदरम्यान रेखा झुनझुनवालांची चांदी, २ शेअर्समधून झाला ८९२ कोटी रुपयांचा फायदा; तुमच्याकडे आहे का?
4
'ऑपरेशन सिंदूर' सिनेमाचं पोस्टर पाहून भडकले नेटकरी, दिग्दर्शकाने माफी मागत दिले स्पष्टीकरण
5
"दहशतवाद्यांनी भरलेला देश..", कंगनाचं पाकिस्तानवर टीकास्त्र, म्हणाली - जगाच्या नकाशातून मिटवलं पाहिजे...
6
Sofia Qureshi : Video - "माझ्या सुनेचा मला अभिमान, ६ महिन्यांपूर्वी..."; कर्नल सोफिया कुरेशी यांचे सासरे भावुक
7
Weather Update : वेळेआधीच मान्सून धडकणार! कधी सुरू होणार पाऊस?हवामान विभागाने सांगितली तारीख
8
India Pakistan Tension : भारताने पाकिस्तानच्या 'या' ३ एअरबेसवरच हल्ला का केला? जाणून घ्या यामागची रणनीती
9
पाकिस्तानचा खोटारडेपणा उघड! भारतातील उधमपूर बेस उद्ध्वस्त केल्याचा दावा निघाला खोटा
10
"मुस्लिम नवऱ्याला सोडून दे", पाकिस्तानी युजरचा देवोलिनाला सल्ला; सडेतोड उत्तर देत म्हणाली...
11
Swiggy Q4 Results: इन्स्टामार्ट ठरतंय स्विगीसाठी डोकेदुखी, हजारो कोटींचं केलं नुकसान; जाणून घ्या
12
Anushka Sharma : अनुष्का शर्मा ११ वर्षांची असताना वडील लढलेले कारगिल युद्ध; घरी आईची असायची 'अशी' अवस्था
13
अण्वस्त्रांबाबतच्या चर्चेची बैठक बोलावल्याचं वृत्त पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांनी नाकारलं! ख्वाजा असिफ म्हणाले... 
14
India Pakistan Tension: पाकिस्तानने किती वाजता केला हायस्पीड मिसाईल हल्ला? लष्कराने सांगितलं ९-१० मेच्या रात्री काय घडलं?
15
India Pakistan: दहशतवाद्यांच्या अड्ड्यांमधून नुसता धूर; लष्कराने सीमेवरील लॉन्च पॅड्स केले उद्ध्वस्त; व्हिडीओही दाखवला
16
वृद्धापकाळात दर महिन्याला मिळतील ₹५०००; मोदी सरकारच्या या स्कीममध्ये मिळतेय संधी
17
Fake News Alert : पाकिस्तानच्या सायबर हल्ल्यानंतर वीज पुरवठा होणार खंडित? सरकारने लोकांना सांगितलं 'सत्य'
18
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानच्या गोळीबारात भारताचे आठ जवान जखमी
19
पाकिस्तानने खरंच भारताच्या स्क्वाड्रन लीडर शिवानी सिंह यांना पकडलं का? सरकारकडून महत्त्वाचा खुलासा
20
...तर पाकिस्तानला बसेल मोठा फटका, सोन्याचे भांडार हातातून जाईल; किती मोठी आहे इकॉनॉमी?

अध्यक्षांकडून सदस्यांना कामांचे चॉकलेट

By admin | Updated: December 20, 2015 23:58 IST

विजय सरवदे, औरंगाबाद स्थानिक काँग्रेस आमदारांनी मध्यस्थी केल्यानंतर जिल्हा परिषद अध्यक्षांविरुद्धचा रोष मावळला असल्याचे चित्र निर्माण केले जात आहे.

विजय सरवदे, औरंगाबाद स्थानिक काँग्रेस आमदारांनी मध्यस्थी केल्यानंतर जिल्हा परिषद अध्यक्षांविरुद्धचा रोष मावळला असल्याचे चित्र निर्माण केले जात आहे. सध्या तरी सत्ताधारी आणि विरोधी, अशा दोन्ही पक्षांतील सदस्य चिडीचूप आहेत. येणाऱ्या सर्वसाधारण सभेत कोणीही गदारोळ करू नये, यासाठी गोंधळी सदस्यांना सिमेंट बंधाऱ्यांचे ‘चॉकलेट’ देऊन समजूत काढण्याचा अध्यक्षांनी प्रयत्न केला. असे असले तरी सर्वसाधारण सभेला आता काही तासांचा अवधी शिल्लक असतानादेखील सदस्यांना विश्वासात घेण्यासाठी अध्यक्षांनी अद्यापही ‘प्रीजीबी मीटिंग’ बोलावलेली नाही. त्यामुळे सत्ताधारी घटक पक्षांतील सदस्यांच्या मनात सध्या तरी अध्यक्षांविरुद्धचा असंतोष खदखदत आहे, हे मात्र नक्की! जि. प. अध्यक्ष श्रीराम महाजन यांनी सर्व सदस्यांची नाडी ओळखली आहे. ते सदस्य सत्ताधारी असो की विरोधी. बैठकांमध्ये गोंधळ घालणाऱ्या सदस्यांना तुटपुंज्या स्वरुपाची कामे देऊन गप्प बसविण्यामध्ये महाजन तरबेज आहेत. एकेकाळी विरोधी पक्षाची भूमिका वटवताना सत्ताधाऱ्यांना घाम फोडणाऱ्या शिवसेना सदस्यांनीही मिळेल त्यावर समाधान मानून नांगी टाकली आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेत विरोधी पक्ष नावालाच उरलेला आहे. दुसरीकडे, सत्ताधारी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सदस्यांनी मध्यंतरी अध्यक्ष हे अकार्यक्षम आहेत, असा आरोप करून त्यांच्याविरुद्ध अविश्वास आणायचा म्हणून काही असंतुष्टांची मोट बांधण्याचा प्रयत्न केला होता. हा प्रकार घडलाच तर सध्याचे दिवस काँग्रेससाठी बरे नाहीत म्हणून काँग्रेसचे आमदार अब्दुल सत्तार, आ. सुभाष झांबड, राष्ट्रवादी काँग्रेसचे आ. भाऊसाहेब पाटील चिकटगावकर यांनी १२ डिसेंबर रोजी समन्वय समितीची बैठक घेतली. या बैठकीत असंतुष्ट सदस्यांची समजूत काढून अध्यक्षांना सदस्यांची कामे करण्याबाबत चांगलीच समज दिली. दुसऱ्या दिवसांपासून अध्यक्ष श्रीराम महाजन यांनी सत्ताधारी घटक पक्षातील एकेका नाराज सदस्याला बोलावून सिमेंट बंधाऱ्यांची नवीन कामे व कोल्हापुरी बंधाऱ्याच्या दुरुस्तीची कामे देण्याचे आमिष दाखविले. या घटनेला ८ दिवसांचा कालावधी होत आला. कोणाला किती निधी द्यायचा, यासंबंधीच्या नियोजनाला अद्यापही मूर्त स्वरूप आलेले नाही. यादीनुसार सदस्यांच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली नाही. सर्वसाधारण सभेला ३६ ते ४० तासांवर अवधी शिल्लक राहिलेला आहे. या सदस्यांना विश्वासात घेण्यासाठी पूर्व सर्वसाधारण सभेची बैठक बोलावण्यात आलेली नाही. त्यामुळे नाराज सदस्यांच्या असंतोषाचा केव्हाही स्फोट होऊ शकतो.