उस्मानाबाद : जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी पदाची सूत्रे हातात घेतल्यापासून ते आजतागायत संविधानाच्या चौकटीत राहून काम केले. खोटं काहीही केलेले नाही, असे सांगतानाच त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले. स्वत:ला सावरत त्यांनी ‘अश्रू ही माझी ताकद आहे, कमजोरी नाही’ असे सांगत जेथे जाईन येथे संविधानाने घालून दिलेल्या चौकटीत बसूनच काम करेल, असे त्यांनी नमूद केले.जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सुमन रावत यांची मुंबई येथे बदली झाल्यानंतर गुरूवारी अधिकारी कर्मचाऱ्यांच्या वतीने निरोप समारंभ घेण्यात आला. अध्यक्षस्थानी उपाध्यक्ष सुधाकर गुंड तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांची उपस्थिती होती. यावेळी विभाग प्रमुखांसह कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थिती हेती.सुमन रावत म्हणाल्या की, आई-वडील सातत्याने सांगायचे की, ‘समाजाने जेवढे दिले, त्यापेक्षा दुप्पट समाजाला द्या’. आई-वडीलांनी घालून दिलेली ही शिकवण आणि संविधान या दोहोंच्या माध्यमातूनच प्रशासन चालविले आहे. दीड वर्षाच्या कार्यकाळात कुठेही खोटं काम केलेले नाही. काही खोटं काम केलं तरी ते जास्तकाळ टिकत नसंत, हेही सर्वांनी लक्षात घेण्याची गरज आहे. पैशाने समाजाची निर्मिती होत नाही. तर समाज निर्मितीसाठी चांगले विचार, आचार आणि कृतीची गरज असते, असे त्यांनी यावेळी आवर्जुन नमूद केले. दीड वर्षाच्या कार्यकाळात भ्रष्टाचाराला कुठेही थारा दिला नाही. त्यामुळे प्रशासनाच्या कारभारात पादर्शकता आली. परिणामी संचिकाही विहित मुदतीत मार्गी लागल्या. त्याचप्रमाणे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून हाती घेण्यात आलेल्या उपक्रमांची राज्य आणि देशपातळीवर दखल घेतल्याचाही त्यांनी आवर्जुन उल्लेख केला. यावेळी सुधाकर गुंड, जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी उबाळे यांची भाषणे झाली.
संविधानाच्या चौकटीतच काम केले
By admin | Updated: September 4, 2015 00:33 IST