शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
4
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
5
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
6
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
7
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
8
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
9
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
10
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
11
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
12
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
13
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
14
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
15
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
16
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
17
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
18
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
19
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
20
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

पहाटे ३ वाजता दिली वर्कआॅर्डर

By admin | Updated: September 4, 2016 01:06 IST

औरंगाबाद : शहरातील ४० हजार पथदिव्यांना एलईडी बल्ब बसविणाऱ्या कंपनीला महापालिकेने शुक्रवारी पहाटे ३ वाजता वर्कआॅर्डर दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

औरंगाबाद : शहरातील ४० हजार पथदिव्यांना एलईडी बल्ब बसविणाऱ्या कंपनीला महापालिकेने शुक्रवारी पहाटे ३ वाजता वर्कआॅर्डर दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रात्रभर महापालिका कार्यालय सुरू ठेवून वर्कआॅर्डर देण्याची एवढी घाई कशासाठी करण्यात आली. सर्वोच्च न्यायालयाने आताच वर्कआॅर्डर द्या, असेही मनपाला बजावलेले नाही. २४२ कोटींचा निव्वळ तोटा या ठेक्यामुळे होत असताना प्रशासनाने संयमाची भूमिका का घेतली नाही, असे एक ना अनेक प्रश्न पदाधिकाऱ्यांकडून उपस्थित करण्यात येत आहेत.महापालिकेत मागील काही दिवसांपासून पदाधिकारी विरुद्ध प्रशासन, असा संघर्ष सुरू आहे. त्यातच एलईडी प्रकरणाच्या माध्यमातून पदाधिकाऱ्यांना आयते कोलीत मिळाले आहे. शनिवारी पुन्हा एकदा महापौर त्र्यंबक तुपे, उपमहापौर प्रमोद राठोड यांनी प्रशासनावर तोफ डागली. नोव्हेंबर २०१५ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने एलईडीची वर्कआॅर्डर ठेका इलेक्ट्रॉन लाईटिंग सिस्टीम प्रा. लि. तथा पेरॉगॉन केबल इंडिया (जॉइंट व्हेंचर) या कंपनीला द्यावा, असे आदेश दिले होते. या आदेशाची अंमलबजावणी न करता तत्कालीन आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी ११२ कोटींची निविदा ३८ कोटींवर आणली. नंतर ही निविदा सर्वसाधारण सभेसमोर आणून रद्द केली. या निर्णयाची कोणतीही कल्पना सर्वोच्च न्यायालयाला देण्यात आली नाही. त्यामुळे कंत्राटदार कंपनीने मनपावर अवमान याचिका दाखल केली. त्यानंतर मनपाने पुनर्विलोकन याचिका दाखल केली. तेव्हापर्यंत न्यायालयात प्रकरण बरेच विरोधात गेले होते. गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळून लावताच मनपातील अधिकाऱ्यांनी पहाटे ३ वाजता कंपनीला वर्कआॅर्डर देण्यात आली.मनपाने निविदा तयार करताना अनेक त्रुटी ठेवल्या होत्या. निविदा प्रक्रियेत दर महिन्याला कंपनीला २ कोटी ७२ लाख रुपये देण्याचे म्हटले आहे. मनपाच्या खात्यात पैसे जमा झाल्यावर आपोआप कंपनीच्या खात्यात रक्कम वर्ग होईल. करार रद्द करण्याची अटच टाकली नाही.मागील वर्षभरात मनपाने वेगवेगळ्या कंत्राटदारांकडून पथदिव्यांचे काम करून घेतले. १०० पेक्षा अधिक कामे विविध खाजगी एजन्सीमार्फत मनपा करून घेत आहे. सर्वोच्च न्यायालयाचे आदेश असतानाही वर्कआॅर्डर देण्यात येत नसल्याचा दावा कंपनीने न्यायालयात पुराव्यास केला. कंपनीने मनपाच्या १०० पेक्षा अधिक कामांची यादीच सादर केली. ही यादी कंपनीला कोणी पुरविली, असाही प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. मनपातील पंक्चर कोण आहेत हे प्रशासनाने शोधून काढावे, अशी मागणी मनपा पदाधिकाऱ्यांनी केली.तर चक्क दिवाळे निघेल...४एलईडीची निविदा काढताना मनपाने कंपनीच्या कोट्यवधी रुपयांचा कसा फायदा होईल हेच पाहण्यात आले. ११२ कोटींचे काम अवघ्या ३८ कोटींमध्ये आज होऊ शकते. मनपाला एकूण २६१ कोटी रुपये कंपनीला या कामासाठी द्यावे लागणार आहेत. ४दर महिन्याला ४ कोटी रुपये देणे अशक्य आहे. या निर्णयाचा कुठेतरी विचार झाला पाहिजे. सर्वोच्च न्यायालयातील जादा न्यायमूर्र्तींकडे पुन्हा एकदा याचिका दाखल करणे शक्य आहे. मनपाला आज या निर्णयामुळे २४२ कोटींचा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. शहराच्या हितासाठी हेसुद्धा करून पाहता येईल, असेही महापौर, उपमहापौरांनी नमूद केले.