शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

पहाटे ३ वाजता दिली वर्कआॅर्डर

By admin | Updated: September 4, 2016 01:06 IST

औरंगाबाद : शहरातील ४० हजार पथदिव्यांना एलईडी बल्ब बसविणाऱ्या कंपनीला महापालिकेने शुक्रवारी पहाटे ३ वाजता वर्कआॅर्डर दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

औरंगाबाद : शहरातील ४० हजार पथदिव्यांना एलईडी बल्ब बसविणाऱ्या कंपनीला महापालिकेने शुक्रवारी पहाटे ३ वाजता वर्कआॅर्डर दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रात्रभर महापालिका कार्यालय सुरू ठेवून वर्कआॅर्डर देण्याची एवढी घाई कशासाठी करण्यात आली. सर्वोच्च न्यायालयाने आताच वर्कआॅर्डर द्या, असेही मनपाला बजावलेले नाही. २४२ कोटींचा निव्वळ तोटा या ठेक्यामुळे होत असताना प्रशासनाने संयमाची भूमिका का घेतली नाही, असे एक ना अनेक प्रश्न पदाधिकाऱ्यांकडून उपस्थित करण्यात येत आहेत.महापालिकेत मागील काही दिवसांपासून पदाधिकारी विरुद्ध प्रशासन, असा संघर्ष सुरू आहे. त्यातच एलईडी प्रकरणाच्या माध्यमातून पदाधिकाऱ्यांना आयते कोलीत मिळाले आहे. शनिवारी पुन्हा एकदा महापौर त्र्यंबक तुपे, उपमहापौर प्रमोद राठोड यांनी प्रशासनावर तोफ डागली. नोव्हेंबर २०१५ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने एलईडीची वर्कआॅर्डर ठेका इलेक्ट्रॉन लाईटिंग सिस्टीम प्रा. लि. तथा पेरॉगॉन केबल इंडिया (जॉइंट व्हेंचर) या कंपनीला द्यावा, असे आदेश दिले होते. या आदेशाची अंमलबजावणी न करता तत्कालीन आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी ११२ कोटींची निविदा ३८ कोटींवर आणली. नंतर ही निविदा सर्वसाधारण सभेसमोर आणून रद्द केली. या निर्णयाची कोणतीही कल्पना सर्वोच्च न्यायालयाला देण्यात आली नाही. त्यामुळे कंत्राटदार कंपनीने मनपावर अवमान याचिका दाखल केली. त्यानंतर मनपाने पुनर्विलोकन याचिका दाखल केली. तेव्हापर्यंत न्यायालयात प्रकरण बरेच विरोधात गेले होते. गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळून लावताच मनपातील अधिकाऱ्यांनी पहाटे ३ वाजता कंपनीला वर्कआॅर्डर देण्यात आली.मनपाने निविदा तयार करताना अनेक त्रुटी ठेवल्या होत्या. निविदा प्रक्रियेत दर महिन्याला कंपनीला २ कोटी ७२ लाख रुपये देण्याचे म्हटले आहे. मनपाच्या खात्यात पैसे जमा झाल्यावर आपोआप कंपनीच्या खात्यात रक्कम वर्ग होईल. करार रद्द करण्याची अटच टाकली नाही.मागील वर्षभरात मनपाने वेगवेगळ्या कंत्राटदारांकडून पथदिव्यांचे काम करून घेतले. १०० पेक्षा अधिक कामे विविध खाजगी एजन्सीमार्फत मनपा करून घेत आहे. सर्वोच्च न्यायालयाचे आदेश असतानाही वर्कआॅर्डर देण्यात येत नसल्याचा दावा कंपनीने न्यायालयात पुराव्यास केला. कंपनीने मनपाच्या १०० पेक्षा अधिक कामांची यादीच सादर केली. ही यादी कंपनीला कोणी पुरविली, असाही प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. मनपातील पंक्चर कोण आहेत हे प्रशासनाने शोधून काढावे, अशी मागणी मनपा पदाधिकाऱ्यांनी केली.तर चक्क दिवाळे निघेल...४एलईडीची निविदा काढताना मनपाने कंपनीच्या कोट्यवधी रुपयांचा कसा फायदा होईल हेच पाहण्यात आले. ११२ कोटींचे काम अवघ्या ३८ कोटींमध्ये आज होऊ शकते. मनपाला एकूण २६१ कोटी रुपये कंपनीला या कामासाठी द्यावे लागणार आहेत. ४दर महिन्याला ४ कोटी रुपये देणे अशक्य आहे. या निर्णयाचा कुठेतरी विचार झाला पाहिजे. सर्वोच्च न्यायालयातील जादा न्यायमूर्र्तींकडे पुन्हा एकदा याचिका दाखल करणे शक्य आहे. मनपाला आज या निर्णयामुळे २४२ कोटींचा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. शहराच्या हितासाठी हेसुद्धा करून पाहता येईल, असेही महापौर, उपमहापौरांनी नमूद केले.