शहरं
Join us  
Trending Stories
1
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
2
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
3
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
4
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
5
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
6
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
7
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
8
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
9
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
10
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
11
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
12
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
13
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार
14
“धर्म-भाषा काहीही असो, आपण सर्व हिंदू आहोत; ब्रिटिशांनी आपल्यात फूट पाडली”- मोहन भागवत
15
"...तोपर्यंत मी तुरुंगात राहण्यास तयार आहे"; सोनम वांगचुक यांनी जोधपूरहून भावाकडे पाठवला मेसेज
16
INDW vs PAKW: अचानक मैदानात पसरला पांढरा धूर: भारत-पाक सामन्यात नेमकं काय घडलं?
17
IND W vs PAK W : पुरुष असो वा महिला, नो हँडशेक फॉर्म्युला! हरमनप्रीतनं पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ
18
‘’२०२७ चा वर्ल्डकप खेळायला मिळाला तर…’’, बोलता बोलता रोहित झाला होता भावूक, तो व्हिडीओ होतोय व्हायरल  
19
बिहारमध्ये केव्हा होणार विधानसभा निवडणूक? CEC ज्ञानेश कुमार यांची घोषणा; SIR संदर्भातही मोठं विधान
20
गुजरातमधून आणलेला सिंह तामिळनाडूच्या प्राणीसंग्रहालयातून पळाला; स्थानिकांमध्ये घबराट...

‘सातबारा’चे काम रखडले

By admin | Updated: December 15, 2015 00:02 IST

औरंगाबाद : जिल्ह्यातील ६ तालुक्यांमधील सातबारा आॅनलाईन करण्याचे काम रखडल्यामुळे सर्वसामान्य शेतकऱ्यांना सातबारासाठी तलाठ्यांकडे हेलपाटे मारावे लागत आहेत.

औरंगाबाद : जिल्ह्यातील ६ तालुक्यांमधील सातबारा आॅनलाईन करण्याचे काम रखडल्यामुळे सर्वसामान्य शेतकऱ्यांना सातबारासाठी तलाठ्यांकडे हेलपाटे मारावे लागत आहेत. सातबारा आॅनलाईन करण्याचे काम ३१ डिसेंबरपर्यंत पूर्ण करावे, असे आदेश जिल्हा प्रशासनाने उपविभागीय अधिकाऱ्यांना दिले आहेत. जिल्ह्यातील ९ तालुक्यांपैकी खुलताबाद, कन्नड, फुलंब्री या ३ तालुक्यांचे सातबारा आॅनलाईन मिळतात. तर औरंगाबाद, गंगापूर, वैजापूर, पैठण, सिल्लोड, सोयगाव या ६ तालुक्यांचे आॅनलाईन सातबारा करण्याचे काम रखडले आहे. त्यातच सेतू सुविधा केंद्राचा करार अद्याप झालेला नसल्याने नागरिकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. सातबारा आॅनलाईन करण्याच्या कामासाठी समन्वयक म्हणून उपजिल्हाधिकारी देवेंद्र कटके यांची नियुक्ती करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. महसूल प्रशासनाचे कामकाज आॅनलाईन करण्याचा निर्णय झाला असला तरी प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे हे काम २ वर्षांपासून रखडले आहे. सातबाराच्या नोंदी आॅनलाईन करण्यासाठी प्रशासनाने उपविभागीय अधिकाऱ्यांना वर्षभरापूर्वी सूचना दिल्या होत्या. आॅनलाईन करण्याचे काम तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यकाळात होऊ शकले नाही. त्यामुळे यावेळी देण्यात आलेल्या आदेशातून काही साध्य होईल का? याकडे शेतकऱ्यांचे लक्ष आहे. तलाठ्यांना सातबारा अपडेट करण्यासाठी सेतू सुविधा केंद्रातून सुविधा दिली होती. दर १५ दिवसांनी तलाठ्यांनी थम्बच्या साह्याने लॉगिंग करून सातबारा अपडेट करण्याचे सांगण्यात आले होते; परंतु संकेतस्थळ सुरू करताना अनेक अडचणी येत असल्याच्या तक्रारी वाढल्याने ते काम रेंगाळले. एनआयसीने विकसित केलेल्या सॉफ्टवेअरने सातबारा आॅनलाईन केले जात असले तरी त्यांच्याकडे डाटा उपलब्ध नसल्यामुळे हे काम ठप्प झाल्याचे सूत्रांनी सांगितले. २०१३ मधील जुन्या रेकॉर्डनुसार सातबारा मिळत असून, नवीन नोंदीचा त्यामध्ये समावेश करण्यात आलेला नाही. नवीन नोंदी नसल्यामुळे जमीन खरेदी-विक्री व्यवहार करण्यात अनेक अडचणी निर्माण होत आहेत. संकेतस्थळ बंद असल्यामुळे शेतकऱ्यांना आॅनलाईन सातबारा उतारा घेण्यास अडचणी येत आहेत. त्यामुळे तलाठ्यांकडे जाऊन शेतकऱ्यांना सातबारा मिळवावा लागत आहे. तलाठ्यांकडे अनेक कामे असल्याने त्यांच्याकडे चकरा माराव्या लागत असून, सातबारा उतारा मिळत नसल्याची ओरड होत आहे. खरेदीखताच्या नोंदणीसाठी आॅनलाईन सातबारा स्वीकारला जात नसून तलाठ्यांनी हाताने लिहिलेला सातबारा आणावा लागतो आहे.