शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय सैन्यानं केली पाकची फजिती; पत्रकार परिषदेत फोटो दाखवत खोट्या दाव्याची पोलखोल
2
Operation Sindoor Live Updates: भारताच्या २६ ठिकाणांवर पाकिस्तानचा हल्ल्याचा प्रयत्न
3
भारताच्या हल्ल्याने पाकिस्तान बिथरला! पंतप्रधान शाहबाज यांचं आणखी एक नापाक पाऊल; अण्वस्त्रांशी थेट संबंध
4
कॅश, एटीएम, युपीआय... पाकिस्तानसोबतच्या तणावादरम्यान सीतारामन यांचे बँकांना अलर्ट राहण्याचे निर्देश
5
राष्ट्रीय पुरस्कार विजेते मेकअप आर्टिस्ट विक्रम गायकवाड यांचं निधन
6
India vs Pakistan : जीडीपी, जॉब आणि डेव्हलपमेंटमध्ये पाकिस्तानची दूरपर्यंत भारताशी तुलना नाही; पाहा 'ही' आकडेवारी
7
India Pakistan Tension : पाकिस्तानच्या 'फतेह-२'चे तुकडे हरियाणाच्या शेतात! सेनेने घेतले ताब्यात; दिल्लीवर होता निशाणा 
8
शिवाजी साटम यांच्या कमबॅकनंतर पार्थ समथानची CID 2 मधून एक्झिट; म्हणाला, "हे आधीच..."
9
India Pakistan: आणखी एक घाव! भारतीय लष्कराने पाकिस्तानच्या चौक्या आणि दहशतवादी लॉन्चिंग पॅड्स उडवले, व्हिडीओ बघा
10
India Pakistan Tension : खेळ महत्त्वाचा; पण आधी देश! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा खास संदेश
11
भारताविरोधात पाकिस्तानचं ऑपरेशन 'बुनयान उल मरसूस'; काय आहे या शब्दाचा अर्थ?
12
पाकिस्तानकडून भारताच्या नागरी वस्त्यांवर भ्याड हल्ले; घरांचे नुकसान, काही जखमी
13
Tarot Card: एकावेळी एका गोष्टीवर लक्ष द्या, नाहीतर तारांबळ उडेल; आगामी आठवडा संयम पाहणारा!
14
"मसूद अजहर-हाफिज सईद बिनधास्त फिरत आहेत...", 'गोपी बहू'नं पाकिस्तानला दाखवला आरसा, म्हणाली - युद्ध व्हायलाच पाहिजे...
15
Virat Kohli Test Retirement: रोहित शर्मानंतर विराट कोहलीचाही कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय? BCCI ला दिली माहिती
16
इंटरनॅशनल मॉनेटरी फंड की 'टेररिस्ट फंड'? पाकिस्तानला IMF च्या फंडिंगवर भडकल्या प्रियंका चतुर्वेदी
17
India Pakistan Tension : उडवून टाकलं! भारत-पाक हल्ल्यादरम्यान अमृतसरमध्ये पाडले ड्रोन
18
Breaking: पाकिस्तानकडून दिल्लीवर फतेह २ बॅलेस्टीक मिसाईल हल्ल्याचा प्रयत्न; हरियाणाच्या सिरसामध्ये हवेतच नष्ट करण्यात यश
19
India Pakistan: पाकिस्तानच्या हल्ल्यात जम्मूमध्ये आयुक्तांचा मृत्यू, अब्दुल्ला म्हणाले, हादरवून टाकणारी बातमी
20
'बुनयान उल मरसूस', तीन एअरबेसवर झालेल्या स्फोटांनंतर पाकिस्तानने भारताविरुद्ध कारवाई सुरू करण्याची घोषणा केली

साडेचार कोटी रुपयांच्या संतसृष्टीचे काम रखडले

By admin | Updated: December 8, 2014 00:23 IST

औरंगाबाद : मनपाच्या अत्यंत महत्त्वाकांक्षी अशा संतसृष्टीचे काम गेल्या अनेक महिन्यांपासून रखडले आहे.

औरंगाबाद : मनपाच्या अत्यंत महत्त्वाकांक्षी अशा संतसृष्टीचे काम गेल्या अनेक महिन्यांपासून रखडले आहे. यापूर्वीच्या आयुक्तांनी या कामाला खीळ घातली, असे मनपा वर्तुळात चर्चिले जात आहे. आता नव्या आयुक्तांनी तरी याकामी पुढाकार घ्यावा, असे बोलले जात आहे. विद्यमान उपमहापौर संजय जोशी यांनी या प्रकल्पासाठी पुढाकार घेतला. भारत माता मंदिराप्रमाणेच हाही प्रकल्प महत्त्वाकांक्षी ठरेल, असा विश्वास त्यांना वाटतो. बीओटी तत्त्वाखाली बिल्डरांच्या घशात जाणारी उल्कानगरीतील मोठी जागा या संतसृष्टीसाठी मिळवण्यात यश मिळाले. या ठिकाणी मोठे वाचनालय राहील, ध्यान केंद्र राहील. अनेक संतांचे पुतळे याठिकाणी बघावयास मिळतील; पण हे काम सध्या रखडले आहे. या कामाचा आराखडा श्रीश्रीश्री रविशंकर यांना दाखवण्यात आला होता, तेव्हा त्यांना तो खूप आवडला व स्वत:हून त्यांनी या कामासाठी एक कोटी रुपये देणगी देण्याचे जाहीर केले होते. दरम्यान, महाराष्ट्र राज्य ओबीसी जनजागरण व संघर्ष समितीचे एक शिष्टमंडळ उपमहापौर संजय जोशी यांना भेटले व त्यांच्याशी या प्रकल्पासंबंधी सविस्तर चर्चा केली. समितीने निवेदन सादर करून काही मुद्दे उपस्थित केले. ते असे : मनपाने खूप गाजावाजा केलेल्या संतसृष्टीचे काम कुठवर आले? हे काम पूर्णत्वास जाण्यासाठी आणखी किती कालावधी लागणार आहे? संतसृष्टीत कोणकोणत्या संतांच्या पुतळ्याचा समावेश करण्यात येणार आहे? खूप गाजावाजा केलेल्या महाराणा प्रताप यांच्या पुतळ्यासंबंधीही काहीच समजत नाही. दरवर्षी महाराणा प्रताप यांची जयंती येते त्यावेळी हा मुद्दा प्रकर्षाने पुढे येतो आणि नंतर काहीच होत नाही. हा पुतळा लवकरात लवकर उभा करण्यात मनपाच्या अडचणी तरी कोणत्या आहेत? कारण हा पुतळा कॅनॉट प्लेसच्या उद्यानात आहे. अडथळा ठरेल, अशा चौकात नाही. निष्काम कर्मयोगी गाडगेबाबा, संताजी जगनाडे महाराज, माजी पंतप्रधान व्ही.पी. सिंग, निळू फुले, लोककवी वामनदादा कर्डक यांचे पुतळे शहराच्या मोक्याच्या ठिकाणी उभे करण्यात यावेत, असा आग्रह ओबीसी जनजागरण व संघर्ष समितीने मनपा आयुक्तांकडे धरला आहे. औरंगपुऱ्यातील महात्मा जोतिबा फुले यांचा व मिल कॉर्नरवरील आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराजांच्या पुतळ्याची उंची बघवत नाही. या पुतळ्यांची उंची तातडीने वाढविण्यात आली पाहिजे. शिवाय, पुतळ्यांचा रंगही उडून चालला आहे. औरंगपुरा येथे फुले दाम्पत्याचा पुतळाही असाच रखडला गेला आहे. हा पुतळा त्वरित बसवण्याची मागणी वाढत आहे.फुले दाम्पत्याच्या पुतळ्याची योजना मनपाने आता थंडबस्त्यात गुंडाळून ठेवली की काय, असे वाटू लागले आहे. पुतळा बनवून तयार आहे, आता फक्त राज्य शासनाच्या एनओसीची गरज आहे, असे कितीतरी वेळा सांगितले गेले; परंतु प्रत्यक्षात औरंगाबादकरांना फुले दाम्पत्याचा पुतळा बघावयास मिळत नाही. महापालिका याबाबतीत काय करू इच्छिते, हे तरी एकदा जाहीर करावे, असे समितीच्या अध्यक्ष सरस्वती हरकळ, निर्मला बडवे, अशोक गहिलोत, जी.आर. सिरसे, गणेश पवार, गणेश धुंदे, रामनाथ कापसे यांनी म्हटले आहे. या निवेदनाच्या प्रति मनपा विरोधी पक्षनेते रावसाहेब गायकवाड व भाजपा गटनेते संजय केणेकर यांनाही देण्यात आल्या आहेत. नवे आयुक्त प्रकाश महाजन यांनी विशेषत: संतसृष्टीच्या प्रकल्पात व पुतळ्यांसंबंधीच्या मागण्यांमध्ये लक्ष घालावे, असा आग्रह ओबीसी समितीने धरण्यात आला आहे.