शहरं
Join us  
Trending Stories
1
अखेर पाकिस्तानने गुडघे टेकले! आता नवीन अडचणीत सापडला, जल-मंथनसाठी प्रयत्न सुरू
2
हगवणे कुटुंब राक्षसी, त्यांना चौकातच फाशी देण्यात यावी : विजय वडेट्टीवार
3
न्यायाधिशांनी चार दिवस प्यायले साप मेलेले दूषित पाणी प्रकृती बिघडली; शासकीय निवासस्थान साेडण्याची नामुष्की
4
हेड- क्लासेन जोडीनं जोर लावला; शेवटी ३०० पारचा नारा अधुरा! पण SRH नं वर्ल्ड रेकॉर्ड केला भक्कम
5
कोल्हापूरच्या घाटक्षेत्रात २९ पर्यंत ऑरेंज अलर्ट; दोन दिवसांतच मान्सून महाराष्ट्रात धडकणार
6
तेजप्रताप यादवच नाही तर या बड्या नेत्यांच्या प्रेमप्रकरणांवरूनही झाला होता वाद, अशी आहे यादी
7
SRH vs KKR: वादळी खेळीसह क्लासेनची विक्रमी सेंच्युरी! पण वैभव सूर्यंवशीच्या तो मागेच राहिला
8
विधानसभा निवडणुकांसाठी सरकारची रणनीती; PM मोदींनी NDAच्या बैठकीत दिला विजयाचा मंत्र
9
पुढचा प्लॅन काय? धोनीनं घरची ओढ अन् या गोष्टीवर प्रेम व्यक्त करत असा टाळला तो विषय
10
शाहजहांपूर मेडिकल कॉलेजमध्ये फॉर्मेलिन गॅस गळती, रुग्णालयात चेंगराचेंगरी; एक मृत
11
बोलण्यावर संयम ठेवा, ऑपरेशन सिंदूरवर अनावश्यक विधाने टाळा; PM मोदींच्या BJP नेत्यांना सूचना
12
त्या निवेदनातून माझे नाव वगळा, दुसरे नाव टाका;पोलिस महानिरीक्षक जालिंदर सुपेकरांची ऑडिओ क्लिप व्हायरल
13
भारताला चीनपासून सर्वात मोठा धोका, चहुबाजूंनी घेरण्यासाठी विणतोय जाळं, अमेरिकेच्या गोपनीय अहवालातून गौप्यस्फोट 
14
GT ला मोठा धक्का! CSK वर पहिल्यांदाच आली तळाला राहण्याची वेळ; पण जाता जाता त्यांनी MI ला दिलं गिफ्ट
15
निरा डावा कालव्याला भगदाड..! बारामती परिसरात नागरिकांच्या घरात-शेतात पाणीच पाणी
16
धक्कादायक! चेंजिंग रूममध्ये कॅमेरा बसवला होता, महिलांचे कपडे बदलतानाचे व्हिडीओ व्हायरल
17
'...तर तुम्हाला रस्त्यावर फिरू देणार नाही', जरांगे पाटलांचा मुख्यमंत्री फडणवीसांना थेट इशारा
18
"मी एका खोलीच्या घरात राहतो, कर्जबाजारी..."; सीबीआयच्या आरोपपत्रावर सत्यपाल मलिक म्हणाले,...
19
पीएम मोदींचा पाकिस्तान दौरा अन् 2016 चा पठाणकोट हल्ला..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
20
ऑपरेशन सिंदूरमधील नामुष्कीनंतर पाकिस्तान सुधरेना, अण्वस्त्रांबाबत रचतोय भयंकर डाव, अमेरिकेच्या अहवालातून गौप्यस्फोट

२ महिन्यांपासून मानधनाविना काम

By admin | Updated: August 20, 2014 23:55 IST

हिंगोली : उन्हातान्हात गावागावात जाऊन काम करणाऱ्या पाणलोट व्यवस्थापनातील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मानधनाचे नेहमीच वांधे होत आहेत.

हिंगोली : उन्हातान्हात गावागावात जाऊन काम करणाऱ्या पाणलोट व्यवस्थापनातील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मानधनाचे नेहमीच वांधे होत आहेत. महिना दोन महिन्याआड उद्भवणाऱ्या या प्रश्नाचे मूळ खुद्द कर्मचाऱ्यांनाही समजले नाही. आधीच तुटपूंजे मानधन तेही वेळेवर मिळत नसल्यामुळे बुधवारी कर्मचाऱ्यांनी उपविभागीय कृषी अधिकाऱ्यांकडे व्यथा मांडली. एकात्मीक पाणलोट व्यवस्थापनतंर्गत मागील तीन वर्षांपासून कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना मिळणारे तुटपूंजे मानधनही वेळेवर मिळत नाही. अलिकडच्या सहा महिन्यांत हा प्रश्न नित्याचाच झाला आहे. दोन महिन्यांपूर्वी तीन महिन्यांचे एकदाच मानधन मिळाले होते. तत्पूर्वी कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांसमोर गाऱ्हाणे मांडावे लागले. आताही तोच कित्ता गिरवावा लागण्याची चिन्हे आहेत. स्वतंत्र विभाग असतानाही मानधनात आडकाठी येत असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष पसरला. महिन्याभरापासून तंत्र अधिकारी भंडारी यांच्या कार्यालयात कर्मचारी खेटे घालत आहेत; परंतु अद्याप कर्मचाऱ्यांना न्याय मिळालेला नाही. गत आठवड्यात संपामुळे तंत्र अधिकारी कर्मचाऱ्यांना भेटले नाहीत. उर्वरित वेळेत इतर कारणे कर्मचाऱ्यांना सांगितली जातात. वेतनाविना कर्मचाऱ्यांचे कामात लक्ष लागत नाही. घरखर्च भागवणेही अवघड झाले आहे. शिवाय प्रत्येक महिन्यात मानधनाला उशीर होत असल्याने कंटाळलेल्या कर्मचाऱ्यांनी उपविभागीय कृषी अधिकाऱ्यांकडे धाव घेवून मानधनाची मागणी केली. (प्रतिनिधी)अधिऱ्यांच्या बोलण्यात तफावतकर्मचाऱ्यांच्या मागणीनुसार महिन्याच्या ४ तारखेला मानधन देण्याचे आदेश लातूर येथील विभागीय कार्यालयाने हिंगोली येथील तंत्र अधिकाऱ्यांना दिले आहेत; मात्र लेखी मिळाले नसल्यामुळे ९ तारखेच्या पुढेच वेतन केले जात आहे; परंतु याचा दोन महिन्याच्या मानधनाशी अर्थाअर्थी संबंध नसल्याचे कर्मचारी म्हणाले.जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवाजी पवार यांनी लातूर विभागातून निधी दिला नसल्यामुळे वेतन झाले नसल्याचे सांगितले; पण याच विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी कृष्णा शिपकुले यांनी कर्मचाऱ्यांच्या मानधनासाठी जिल्ह्यास निधी दिली जात असल्याचे सांगितले. प्रत्येक महिन्याला विभागीय कार्यालयातून मानधन देण्याचा संबंध नाही. स्वतंत्र विभाग आणि मानधनाचे अधिकारही जिल्हा कृषी विभागास असल्याचे शिपकुले म्हणाले. दुसरीकडे तंत्र अधिकारी भंडारी यांनी जुलै महिन्याचे मानधन काढले असल्याचे सांगितले. प्रत्यक्षात मानधन मिळाले नसल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले.