शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
3
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
4
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
5
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
6
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
7
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
8
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
9
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
10
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
11
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
12
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
13
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
14
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
15
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
16
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
17
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
18
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
19
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा
20
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले

जागेच्या घोळात पैठण येथील जलकुंभाचे काम रखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:03 IST

जनतेवर पाणीपाणी म्हणण्याची वेळ... पैठण : पैठण-आपेगाव विकास प्राधिकरणांतर्गत दोन वर्षांपूर्वी नेहरू चौक व नवनाथ मंदिर येथे मंजूर झालेल्या ...

जनतेवर पाणीपाणी म्हणण्याची वेळ...

पैठण : पैठण-आपेगाव विकास प्राधिकरणांतर्गत दोन वर्षांपूर्वी नेहरू चौक व नवनाथ मंदिर येथे मंजूर झालेल्या जलकुंभाच्या बांधकामासाठी जागा निश्चित करण्यात नगर परिषद प्रशासनास अपयश आले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी सुचविलेली जागा डावलून न.प. प्रशासनाने आता दुसऱ्या जागेवर टाकीचे बांधकाम करण्याचा घाट घातल्याने नागरिक संतापले आहेत. यामुळे शहरातील ७०० नागरिकांनी बेमुदत उपोषण करण्याचा इशारा नगर परिषद प्रशासनास दिला आहे.

पैठण शहरातील नेहरू चौक व नवनाथ मंदिर परिसरात जलकुंभ बांधण्यासाठी लागणारी जागा नगर परिषदेने

उपलब्ध करून न दिल्याने मंजूर असलेल्या जलकुंभाचे काम सुरू करता आले नाही, असा लेखी खुलासा महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या वतीने काही दिवसांपूर्वी करण्यात आला. यानंतर जून २०२० मध्ये झालेल्या पैठण-आपेगाव विकास प्राधिकरणाच्या बैठकीत न.प. कार्यालयासमोर असलेली जुनी तहसील कार्यालयाची इमारतीची जागा नगर परिषदेने ताब्यात घेऊन जलकुंभाच्या बांधकामासाठी जीवन प्राधिकरणास उपलब्ध करून देण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते. मात्र, पुढे त्यात काहीही झाले नाही. याचा परिणाम परिसरात सध्या भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.

चौकट

दोन जलकुंभांच्या बांधकामास मंजुरी

पैठण शहरातील वाढती लोकसंख्या लक्षात घेता नेहरू चौक परिसरातील जीर्ण झालेला जलकुंभ पाडून तेथे नवीन ७.७० लक्ष क्षमतेचा जलकुंभ व वाढीव पाण्याची गरज भागविण्यासाठी नवनाथ मंदिर परिसरात ४.९० लाख लीटर क्षमतेचा नवीन जलकुंभ बांधण्याच्या कामास पैठण-आपेगाव विकास

प्राधिकरणातून मंजुरी देण्यात आली आहे. याची जबाबदारी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडे सोपविली आहे. मात्र, अजून याला मुहूर्त सापडला नाही.

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची टोलवाटोलवी

एमजेपीला जलकुंभाच्या बांधकामाचे आदेश दिल्यानंतर वर्षभरानंतर

एमजेपीच्या अभियंत्यांनी खुलासा करताना नगर परिषद कार्यालयाजवळील अस्तित्वातील जलकुंभ पाडण्यापूर्वी या भागात बायपासद्वारे सर्व भागांना समान व सुरळीत पाणी पुरवठा होणे आवश्यक आहे. जलकुंभातून तीन वेळा बायपासद्वारे पाणी वितरण व्यवस्थेत सोडून चाचणी घेण्यात आली. मात्र, वितरण व्यवस्था पस्तीस वर्षे जुनी असल्याने उंच भागात पाणी पोहोचू शकले नाही. तसेच नवीन जलकुंभासाठी जास्त जागा लागते. मात्र, अस्तित्वातील जागा कमी पडत आहे. शेजारी कब्रस्थान व खाजगी घर असल्याने येथे जलकुंभ बांधता येणे शक्य नसल्याचा खुलासा एमजेपीने केला आहे. यासाठी नवीन जागा द्यावी अशी शिफारस एमजेपीने प्राधिकरणाकडे केली. नवनाथ मंदिराजवळ एक वर्षापूर्वी खोदकाम सुरू करण्यात आले. मात्र, स्थानिक नागरिकांनी हे काम बंद पाडले.