शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

स्पर्धेमुळे झपाटून कामाला लागा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2017 00:51 IST

तांत्रिक, अतांत्रिक अधिकारी, कर्मचाºयांना आपली कार्यक्षमता वाढवावी लागेल. कार्यपद्धतीत बदल करावा लागेल. त्याचवेळी आपले अस्तित्व टिकेल, असे प्रतिपादन महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : सर्वच ग्राहकांना स्वस्त वीज आणि दर्जेदार सेवा पाहिजे. अलीकडे वीजनिर्मिती व वितरण क्षेत्रात खाजगी कंपन्या मोठ्या प्रमाणात उतरल्या आहेत. अशा परिस्थितीत आपणास स्पर्धेत टिकायचे असेल, तर तांत्रिक, अतांत्रिक अधिकारी, कर्मचाºयांना आपली कार्यक्षमता वाढवावी लागेल. कार्यपद्धतीत बदल करावा लागेल. त्याचवेळी आपले अस्तित्व टिकेल, असे प्रतिपादन महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार यांनी केले.शनिवारी तापडिया नाट्य मंदिरमध्ये महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनच्या वतीने महावितरणच्या विविध समस्यांवर तांत्रिक-अतांत्रिक कर्मचाºयांसोबत व्यवस्थापकीय संचालक संजीवकुमार यांचा थेट संवाद, या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रादेशिक विभागाचे सहव्यवस्थापकीय संचालक ओम प्रकाश बकोरिया, कार्यकारी संचालक शंकर शिंदे, मुख्य अभियंता सुरेश गणेशकर, अधीक्षक अभियंता सुरेशचंद्र अग्रवाल यांची उपस्थिती होती. अध्यक्षस्थानी वर्कर्स फेडरेशनचे अध्यक्ष मोहन शर्मा होते.संजीव कुमार म्हणाले, खाजगी कंपन्या या क्षेत्रात उतरल्या असून, या स्पर्धेत महावितरणचे अस्तित्व अबाधित ठेवण्यासाठी तुम्हाला अंग झटकून कामाला लागावेच लागेल. नाही तर महावितरणची मक्तेदारी संपुष्टात येण्याचे दिवस दूर नाहीत. प्रत्येकाने आपल्या जबाबदारीचे भान ठेवले पाहिजे. नवीन वीज कनेक्शनसाठी ग्राहकांना चकरा मारायला लावू नका. ग्राहकांच्या समस्यांचे तात्काळ निवारण करा. आपला सेवा देणारा व्यवसाय आहे. आपण व्यवसायाच्या तत्त्वाचे पालन केले नाही, तर व्यवसाय बंद पडण्यास वेळ लागणार नाही, असा धोकाही त्यांनी बोलून दाखवला. यावेळी प्रादेशिक सहसंचालक ओम प्रकाश बकोरिया म्हणाले की, लाइनमनची सुरक्षा ही आमची टॉप प्रायोरिटी असेल. त्यांना सुरक्षा उपकरणांचा पुरवठा केला जाईल. समन्वयाने काम करा. सप्टेंबर अखेरपर्यंत घराघरापर्यंत जाऊन मीटरविषयक तक्रारींचे निराकरण करावे. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संघटनेचे सरचिटणीस कृष्णा भोयर यांनी केले.