शहरं
Join us  
Trending Stories
1
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
2
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
3
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
4
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
5
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
6
इस्रायलचा दावा, वरिष्ठ इराणी लष्करी कमांडर सईद इजादी ठार; हमासशी संबंध असल्याचा आरोप!
7
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
8
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...
9
Ashadhi Wari 2025: दिंडीतून जाताना वारकरी महिला डोईवर तुळशी वृंदावन नेतात; पण का? वाचा!
10
"देवेंद्रजीसुद्धा योगीच, ते कसरत नाही पण..', अमृता फडणवीस यांचं विधान
11
"माझे ९ लाख रुपये निर्मात्यांनी दिलेले नाहीत", 'मन उडू उडू झालं' फेम अभिनेत्याची व्यथा, म्हणाला- "मी इंजिनियर असूनही..."
12
उप कर्णधार रिषभ पंतचा मोठा पराक्रम! शतकी खेळीसह मोडला MS धोनीचा विक्रम! सेलिब्रेशनही एकदम झक्कास
13
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
14
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
15
टीव्ही कपल लता सबरवाल-संजीव सेठ यांचा घटस्फोट, लग्नानंतर १५ वर्षांनी मोडला संसार
16
इराण युद्धात इस्त्रायलला खूप मोठा झटका; जिनपिंग-पुतिन यांच्या निर्णयाने ट्रम्पही चिंतेत
17
राज कुशवाहाकडून कळले सोनमचे सगळे 'राज'! ५ लाखांची रोकड आणि बंदुकीचाही झाला खुलासा
18
याला म्हणतात प्रामाणिकपणा...! व्यापाऱ्याचे रिक्षात लाखो रुपये विसरले, रिक्षाचालकानं सर्व परत नेऊन दिले; रक्कम जाणून थक्क व्हाल!
19
"प्रगत राज्यातील मुलांना मागासलेल्या राज्यांची भाषा...", हिंदी भाषा सक्तीवरुन गार्गी फुले थेटच बोलल्या
20
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पाठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

स्पर्धेमुळे झपाटून कामाला लागा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2017 00:51 IST

तांत्रिक, अतांत्रिक अधिकारी, कर्मचाºयांना आपली कार्यक्षमता वाढवावी लागेल. कार्यपद्धतीत बदल करावा लागेल. त्याचवेळी आपले अस्तित्व टिकेल, असे प्रतिपादन महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : सर्वच ग्राहकांना स्वस्त वीज आणि दर्जेदार सेवा पाहिजे. अलीकडे वीजनिर्मिती व वितरण क्षेत्रात खाजगी कंपन्या मोठ्या प्रमाणात उतरल्या आहेत. अशा परिस्थितीत आपणास स्पर्धेत टिकायचे असेल, तर तांत्रिक, अतांत्रिक अधिकारी, कर्मचाºयांना आपली कार्यक्षमता वाढवावी लागेल. कार्यपद्धतीत बदल करावा लागेल. त्याचवेळी आपले अस्तित्व टिकेल, असे प्रतिपादन महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार यांनी केले.शनिवारी तापडिया नाट्य मंदिरमध्ये महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनच्या वतीने महावितरणच्या विविध समस्यांवर तांत्रिक-अतांत्रिक कर्मचाºयांसोबत व्यवस्थापकीय संचालक संजीवकुमार यांचा थेट संवाद, या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रादेशिक विभागाचे सहव्यवस्थापकीय संचालक ओम प्रकाश बकोरिया, कार्यकारी संचालक शंकर शिंदे, मुख्य अभियंता सुरेश गणेशकर, अधीक्षक अभियंता सुरेशचंद्र अग्रवाल यांची उपस्थिती होती. अध्यक्षस्थानी वर्कर्स फेडरेशनचे अध्यक्ष मोहन शर्मा होते.संजीव कुमार म्हणाले, खाजगी कंपन्या या क्षेत्रात उतरल्या असून, या स्पर्धेत महावितरणचे अस्तित्व अबाधित ठेवण्यासाठी तुम्हाला अंग झटकून कामाला लागावेच लागेल. नाही तर महावितरणची मक्तेदारी संपुष्टात येण्याचे दिवस दूर नाहीत. प्रत्येकाने आपल्या जबाबदारीचे भान ठेवले पाहिजे. नवीन वीज कनेक्शनसाठी ग्राहकांना चकरा मारायला लावू नका. ग्राहकांच्या समस्यांचे तात्काळ निवारण करा. आपला सेवा देणारा व्यवसाय आहे. आपण व्यवसायाच्या तत्त्वाचे पालन केले नाही, तर व्यवसाय बंद पडण्यास वेळ लागणार नाही, असा धोकाही त्यांनी बोलून दाखवला. यावेळी प्रादेशिक सहसंचालक ओम प्रकाश बकोरिया म्हणाले की, लाइनमनची सुरक्षा ही आमची टॉप प्रायोरिटी असेल. त्यांना सुरक्षा उपकरणांचा पुरवठा केला जाईल. समन्वयाने काम करा. सप्टेंबर अखेरपर्यंत घराघरापर्यंत जाऊन मीटरविषयक तक्रारींचे निराकरण करावे. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संघटनेचे सरचिटणीस कृष्णा भोयर यांनी केले.