शहरं
Join us  
Trending Stories
1
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
2
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
3
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
4
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
5
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
6
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
7
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
8
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
9
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
10
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
11
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
12
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
13
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
14
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
15
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
16
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
17
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
18
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
19
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
20
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले

ग्रामीण भागात लाकडी घाणा कालबाह्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:05 IST

घाटनांद्रा : पूर्वी बैलाच्या किंवा मनुष्याच्या मदतीने लाकडी घाण्यावर उसाचा रस काढण्याचा व्यवसाय ग्रामीण भागात दिसत होता. आज ग्रामीण ...

घाटनांद्रा : पूर्वी बैलाच्या किंवा मनुष्याच्या मदतीने लाकडी घाण्यावर उसाचा रस काढण्याचा व्यवसाय ग्रामीण भागात दिसत होता. आज ग्रामीण भागातून लाकडी घाणे लुप्त झाले असून यंत्राच्या साहाय्याने उसाचा रस काढला जात आहे. विशेष बाब म्हणजे, उसाच्या रसाची चव या यंत्रामुळे बदलली आहे.

लाकडी घाण्यातून काढला गेलेला रस शुद्ध व चवदार असायचा. मात्र, यांत्रिक युगात मानवी व लाकडी घाण्याची जागा आता आधुनिक यंत्रसामग्रीने घेतली आहे. दिवसेंदिवस उन्हाचा कडाका वाढला आहे. त्यामुळे अंगाची लाहीलाही होऊ लागली आहे. या उकाड्यापासून शरीराला थंडावा मिळावा यासाठी सर्वांची पावले आपसूकच रसवंतीकडे वळू लागली आहेत. परंतु, लाकडी घाण्यावरून काढलेल्या रसामध्ये जो स्वाद होता. तो स्वाद या यंत्रावरून काढलेल्या रसाला येत नसल्याची प्रतिक्रिया नागरिकांकडून मिळू लागली आहे. मात्र, जीवाची होणारी लाहीलाही थांबविण्यासाठी यंत्रातूनही निघालेला रस प्यावाच लागतो. एके काळी ग्रामीण भागातील सर्वाधिक खपाचे शीतपेय म्हणून ओळखला जाणारा उसाचा रस बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या शीतपेयांमुळे मागे पडलेला दिसत आहे.

ठिकठिकाणी रसवंत्या थाटल्या

उन्हाळ‌ा सुरू होताच तालुक्याच्या ठिकाणासह अनेक महत्त्वाच्या गावांत रसवंत्या थाटल्या जातात. विद्युत मोटारीवर चालणाऱ्या यंत्रावर उसाचा रस काढला जातो. कमी जागेत हे यंत्र बसले जात असल्याने व्यावसायिकांना त्याचा फायदा होतो. थंड शीतपेयांच्या किमतीच्या तुलनेत रस पिणे अधिक परवडत असल्याचे ग्राहकांचे मत आहे.

शीतपेयांमुळे रसवंतीकडे कल कमी

सध्या काळाच्या लाकडी घाणा लुप्त होताना दिसत आहे. पूर्वी या घाण्यावर खुळखुळ्याचा वापर होत असायचा. यामुळे ग्राहकांना हे खुळखुळे आकर्षित करून उसाच्या रसाकडे येण्यास भाग पाडायचे. उन्हाळ्यात याला प्रचंड मागणी असते. मात्र, आज वेगवेगळी शीतपेये बाजारात उपलब्ध असल्याने उसाच्या रसाची मागणी काहीअंशी कमी होऊ लागली आहे.

माणिक मोरे, रसवंतीचालक.

दोन फोटो : घाटनांद्रा येथे आधुनिक यंत्रसामग्रीद्वारे रस काढताना रसवंतीचालक तर दुसरीकडे लुप्त होत चाललेला उस काढण्याचा लाकडी घाणा.