शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

महिलांचा छळ थांबेना..!

By admin | Updated: July 10, 2017 00:40 IST

जालना : जिल्ह्यात महिलांवरील शारीरिक व मानसिक अत्याचाराच्या घटना थांबता थांबायला तयार नाहीत.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्ह्यात महिलांवरील शारीरिक व मानसिक अत्याचाराच्या घटना थांबता थांबायला तयार नाहीत. गत दीड वर्षात सासरकडील होणाऱ्या छळामुळे ३३३ संसार उद्ध्वस्त झाले आहेत. तर छेडछाड व विनयभंगाच्या ३२० घटना घडल्या आहेत. महिलांना सन्मानाची वागणूक मिळावी, त्यांच्यावर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांना पायबंद घालण्यासाठी शासनासह सामाजिक स्तरावर वेगवेगळ्या पातळ्यांवर प्रयत्न केले जात आहेत. असे असले तरी कौटुंबीक हिंसाचार, आत्महत्येस प्रवृत्त करणे, छेडछाड, लैंगिक छळ, बलात्कार यासारख्या घटनांचे प्रमाण कमी होण्याऐवजी वाढत असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात दीड वर्षात महिलांवर लैंगिक अत्याचाराच्या ६७ घटना घडल्या आहेत. सार्वजनिक ठिकाणी होणारी छेडछाड, विनयभंगाच्या ३२० घटनांमध्ये अनेक युवतींना मानसिक त्रासाबरोबर आपले शिक्षण, नोकरी सोडण्याचे प्रसंग घडले आहेत. माहेरहून हुंडा आणला नाही म्हणून दीड वर्षात सासरकडील मंडळींकडून तीन महिलांचे खून झाले असून, पाच महिलांच्या खुनाचाप्रयत्न झाल्याची नोंद आहे. प्रेम प्रकरण, लैंगिक संबंधास नकार, कौटुंबिक वाद यासारख्या कारणांमुळे युवती व महिलांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या २५ घटना दीड वर्षात घडल्याचे पोलीस प्रशासनाकडील आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. ग्रामीण भागात घडणाऱ्या महिला अत्याचाराच्या अनेक घटनांची पोलीस प्रशासनाकडे नोंद होत नसल्याची वस्तुस्थिती आहे. महिलांवरील अन्याय अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी प्रभावी कायद्यांबरोबर त्याच्या कठोर अंमलबजावणीची गरज आहे.