शहरं
Join us  
Trending Stories
1
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
2
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
3
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
4
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
5
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
6
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
7
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
8
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
9
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
10
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
11
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!
12
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
13
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
14
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
15
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
16
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
18
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
19
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
20
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!

महिलांचा छळ थांबेना..!

By admin | Updated: July 10, 2017 00:40 IST

जालना : जिल्ह्यात महिलांवरील शारीरिक व मानसिक अत्याचाराच्या घटना थांबता थांबायला तयार नाहीत.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्ह्यात महिलांवरील शारीरिक व मानसिक अत्याचाराच्या घटना थांबता थांबायला तयार नाहीत. गत दीड वर्षात सासरकडील होणाऱ्या छळामुळे ३३३ संसार उद्ध्वस्त झाले आहेत. तर छेडछाड व विनयभंगाच्या ३२० घटना घडल्या आहेत. महिलांना सन्मानाची वागणूक मिळावी, त्यांच्यावर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांना पायबंद घालण्यासाठी शासनासह सामाजिक स्तरावर वेगवेगळ्या पातळ्यांवर प्रयत्न केले जात आहेत. असे असले तरी कौटुंबीक हिंसाचार, आत्महत्येस प्रवृत्त करणे, छेडछाड, लैंगिक छळ, बलात्कार यासारख्या घटनांचे प्रमाण कमी होण्याऐवजी वाढत असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात दीड वर्षात महिलांवर लैंगिक अत्याचाराच्या ६७ घटना घडल्या आहेत. सार्वजनिक ठिकाणी होणारी छेडछाड, विनयभंगाच्या ३२० घटनांमध्ये अनेक युवतींना मानसिक त्रासाबरोबर आपले शिक्षण, नोकरी सोडण्याचे प्रसंग घडले आहेत. माहेरहून हुंडा आणला नाही म्हणून दीड वर्षात सासरकडील मंडळींकडून तीन महिलांचे खून झाले असून, पाच महिलांच्या खुनाचाप्रयत्न झाल्याची नोंद आहे. प्रेम प्रकरण, लैंगिक संबंधास नकार, कौटुंबिक वाद यासारख्या कारणांमुळे युवती व महिलांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या २५ घटना दीड वर्षात घडल्याचे पोलीस प्रशासनाकडील आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. ग्रामीण भागात घडणाऱ्या महिला अत्याचाराच्या अनेक घटनांची पोलीस प्रशासनाकडे नोंद होत नसल्याची वस्तुस्थिती आहे. महिलांवरील अन्याय अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी प्रभावी कायद्यांबरोबर त्याच्या कठोर अंमलबजावणीची गरज आहे.