शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री माणिकराव कोकाटे नॉट रिचेबल; वकिलांनी उच्च न्यायालयातही केली कायदेशीर कोंडी, कधीही अटक होऊ शकते...
2
काँग्रेसचा 'हात' सुटला, आमदार प्रज्ञा सातव भाजपच्या वाटेवर; कार्यकर्ते मुंबईकडे रवाना
3
IPL मधील ऑक्शनची संपूर्ण रक्कम घरी नेतात का खेळाडू? पाहा टॅक्स, सॅलरी आणि इनहँड रकमेचा कसा असतो हिशोब
4
‘टायगर स्टेट’समोर गंभीर आव्हान! एका आठवड्यात 6 तर, वर्षभरात 54 वाघांचा मृत्यू; शिकारीचा संशय
5
किडन्या फेल, डायलिसिससाठी पैसेच नाहीत; ७० दिवस 'डिजिटल अरेस्ट' करुन ५३ लाखांचा गंडा
6
"पॅरेलाइज होऊ शकलो असतो..."; सैफ अली खानने सांगितला हल्ल्याचा थरार, आजही वाटतेय भीती
7
"कायदा यांच्या कोठीवर नाचतोय, जोवर दिल्लीत आणि निवडणूक आयोगात हरामखोरांचं राज्य, तोवर...;" संजय राऊतांची जीभ घसरली!
8
Yashasvi Jaiswal: यशस्वी जैस्वालची प्रकृती अचानक बिघडली, तातडीने रुग्णालयात दाखल, काय झालं?
9
कल्याणमध्ये मनसेला मोठा धक्का; एकाचवेळी २ नेत्यांचा राजीनामा, भाजपात प्रवेशाची चर्चा
10
एपस्टीन सेक्स स्कँडल: जगभरातील नेत्यांची झोप उडाली! दोन दिवस उरले, भारतीय नेत्यांचेही नाव?
11
BJP vs MVA: तुळजापुरात भाजप-मविआच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा; काग्रेस उमेदवाराचा पुतण्या गंभीर जखमी
12
आलिशान राजवाडा, 1000 घोडे अन् यॉट्सचा ताफा; PM मोदींना भेटणारे ओमानचे सुलतान किती श्रीमंत?
13
बाबा वेंगाची भारत आणि जगासाठी १० आनंदाची भाकिते; २०२६ पासून सुरू होणार 'सुवर्णकाळ'?
14
पुण्यात पुन्हा एकदा कोयता गँगची दहशत, वाघोलीमध्ये दुकानांच्या लाईटची तोडफोड; घटनेचा सीसीटीव्ही समोर
15
Manikrao Kokate: "आता तरी लाजेखातर..."; माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्यासाठी मविआ आक्रमक
16
दिल्लीत ५० टक्के कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम देण्याचे सरकारचे आदेश; कुणाला मिळणार १० हजार?
17
बारामतीतील मुलीवर अंबाजोगाईमध्ये सामूहिक बलात्कार, बदामबाईने आधी कला केंद्रावर नेलं, नंतर लॉजवर...
18
निवृत्तीनंतर हातात येणार रग्गड पैसा! NPS चे नवीन नियम लागू; ५ वर्षांचा 'लॉक-इन' कालावधी संपला
19
माणिकराव कोकाटे यांचे मंत्रिपद जाणार? आज अजित पवार यांची भेट घेणार, मोठ्या निर्णयाची शक्यता
20
Video - बापमाणूस! ६० फूट खोल बोरवेलमध्ये पडलेल्या लेकीसाठी वडिलांनी लावली जीवाची बाजी
Daily Top 2Weekly Top 5

महिला बाल रुग्णालय; शासन निधी परत जाणार

By admin | Updated: November 7, 2016 01:01 IST

औरंगाबाद : मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबाद शहरात शासनाने चिकलठाणा येथे २०० खाटांचे भव्य दिव्य रुग्णालय उभारले.

औरंगाबाद : मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबाद शहरात शासनाने चिकलठाणा येथे २०० खाटांचे भव्य दिव्य रुग्णालय उभारले. त्यानंतर नवजात शिशू आणि गरोदर महिलांसाठी स्वतंत्र रुग्णालय उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या रुग्णालयासाठी महापालिका मागील तीन वर्षांपासून जागा देण्यास तयार नाही. महापालिकेच्या या वृत्तीमुळे रुग्णालय उभारण्याचा प्रश्न लालफितीत अडकला आहे. रुग्णालयासाठी शासनाकडून आलेला निधीही परत जाण्याच्या मार्गावर आहे.शहरातील नागरिकांना चांगली आरोग्य सेवा देण्याचे काम महापालिकेचे आहे. मनपा प्रशासनाने नेहमीच ही जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला. मनपाचे आरोग्य केंद्र फक्त नावालाच सुरू आहेत. गंभीर आजारांसाठी नागरिकांना आजही घाटी रुग्णालयावरच विसंबून राहावे लागते. घाटीत दररोज ३ हजार नागरिक बाह्यरुग्णसेवेसाठी येतात. ११७७ खाटांची क्षमता असताना सुमारे १५०० पेक्षा अधिक रुग्ण दाखल करून घ्यावे लागतात. घाटी रुग्णालयावरील हा भार कमी करण्यासाठी दहा वर्षांपूर्वी महापालिकेने मध्यवर्ती जकात नाका येथे बीओटी तत्त्वावर २०० खाटांचे रुग्णालय सुरू करण्याची घोषणा केली. नेहमीप्रमाणे ही घोषणा हवेतच विरली. एकाच छताखाली विविध आजारांच्या चाचण्या करून देण्याची घोषणा राजकीय मंडळींनी केली. ही घोषणाही राजकीय स्वरुपाचीच ठरली. रुग्णसेवेच्या बाबतीत महापालिका किती गंभीर आहे, हे अनेक घोषणांवरून दिसून येते.चार वर्षांपूर्वी महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने चिकलठाणा येथे २०० खाटांचे रुग्णालय उभारण्याचा निर्णय घेतला. तब्बल ३८ कोटी रुपये खर्च करून टुमदार रुग्णालय उभारण्यात आले आहे. आता हे रुग्णालय उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे. हे रुग्णालय सुरू झाल्यास घाटीवरील ताण किंचित कमी होईल.दोन वर्षांपूर्वी काँग्रेस आघाडी सरकारने नवजात शिशू आणि गरोदर महिलांच्या प्रसूतीसाठी २०० खाटांचे स्वतंत्र रुग्णालय सुरू करण्यास मान्यता दिली. रुग्णालयासाठी शहरी भागात कुठेही मनपाने ७ एकर जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी आरोग्य विभागाने केली आहे.मागील दोन वर्षांपासून महापालिकेने ७ एकर जागा उपलब्ध करून न दिल्याने रुग्णालयाचा प्रश्न लालफितीत अडकला आहे. मागील आठवड्यात जिल्हा प्रशासनाने पुन्हा एकदा पत्र पाठवून जागा उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. महापौर त्र्यंबक तुपे यांनी सातारा-देवळाई भागात मनपा प्रशासनाने ७ एकर जागा द्यावी, अशी मागणी आयुक्तांकडे सहा महिन्यांपूर्वीच केली आहे.