शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

लघु उद्योगांद्वारे महिला आत्मनिर्भर व्हावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2019 21:56 IST

ग्रामीण भागातील महिलांना शासनाच्या विविध योजनाचा लाभ मिळावा तसेच लघु उद्योगाद्वारे आत्मनिर्भर व्हावे यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येतात, अशी माहिती महिलांना देण्यात आली.

वाळूज महानगर : ग्रामीण भागातील महिलांना शासनाच्या विविध योजनाचा लाभ मिळावा तसेच लघु उद्योगाद्वारे आत्मनिर्भर व्हावे यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येतात, अशी माहिती महिलांना देण्यात आली.

महाराष्टÑ राज्य ग्रामीण जिवनन्नोती अभियानांतर्गत पंढरपुरातील विठ्ठल-रुख्मिणी मंदिरात गुरुवारी बचत गटील महिलांसाठी मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आला. याचे उद्घाटन तालुका अभियान व्यवस्थापक अशोक घोडके यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच शेख अख्तर, उपसरपंच महेंद्र खोतकर, मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र पवार तर मार्गदर्शक म्हणून तालुका व्यवस्थापक अर्चना डाले, समन्वयक मिरा तोंडे उपस्थित होते.

अशोक घोडके यांनी महिला ग्रामसंघाची कार्यपद्धती व कर्तव्य आदीविषयी महिला पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमात अर्चना डाले व मिरा तोंडे यांनी ग्रामीण भागातील महिलांना शासनाच्या विविध योजनाचा लाभ मिळावा तसेच आत्मनिर्भर व्हावे यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत असल्याचे सांगितले.

सुरवातील महिलांनी गट स्थापन केल्यानंतर ६ महिन्यानंतर या गटाचा समावेश ग्रामसंघात करण्यात येतो. एका महिला ग्रामसंघात ९ महिलांचा समावेश करुन त्यांना खेळते भांडवल उपलब्ध करुन देणे, शासनाकडून अनुदान मिळवून देणे, लघु उद्योग सुरु करण्यासाठी स्वयंसहायता समूहाना बिनव्याजी कर्ज उपलब्ध करुन देणे, केंद्र व राज्य शासनामार्फत सुरु केलेल्या विविध योजनांचा लाभ महिलांना देणे, १२ रुपयांत पंतप्रधान विमा योजनेचा लाभ देणे, महिलांना घरच्या घरी शिलाई मशिन, पापड, लोणचे तयार करणे, संगणक प्रशिक्षण, मोबाईल दुरुस्ती आदी प्रशिक्षण देणे याबाबत मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाला महिला ग्रामसंघाच्या अध्यक्षा मिनाबाई साबळे, सचिव सुषमा खोतकर, कोषाध्यक्षा राधा अवसरमल, छाया पवार आदीसह जवळपास १०० महिला उपस्थित होत्या. प्रास्ताविक व आभार मिरा तोंडे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रतिभा साळवे, ज्योत्स्ना दवंडे, नितीन सरोदे, मयुर पवार आदीसह पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.

टॅग्स :Walujवाळूज