शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

लघु उद्योगांद्वारे महिला आत्मनिर्भर व्हावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2019 21:56 IST

ग्रामीण भागातील महिलांना शासनाच्या विविध योजनाचा लाभ मिळावा तसेच लघु उद्योगाद्वारे आत्मनिर्भर व्हावे यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येतात, अशी माहिती महिलांना देण्यात आली.

वाळूज महानगर : ग्रामीण भागातील महिलांना शासनाच्या विविध योजनाचा लाभ मिळावा तसेच लघु उद्योगाद्वारे आत्मनिर्भर व्हावे यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येतात, अशी माहिती महिलांना देण्यात आली.

महाराष्टÑ राज्य ग्रामीण जिवनन्नोती अभियानांतर्गत पंढरपुरातील विठ्ठल-रुख्मिणी मंदिरात गुरुवारी बचत गटील महिलांसाठी मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आला. याचे उद्घाटन तालुका अभियान व्यवस्थापक अशोक घोडके यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच शेख अख्तर, उपसरपंच महेंद्र खोतकर, मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र पवार तर मार्गदर्शक म्हणून तालुका व्यवस्थापक अर्चना डाले, समन्वयक मिरा तोंडे उपस्थित होते.

अशोक घोडके यांनी महिला ग्रामसंघाची कार्यपद्धती व कर्तव्य आदीविषयी महिला पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमात अर्चना डाले व मिरा तोंडे यांनी ग्रामीण भागातील महिलांना शासनाच्या विविध योजनाचा लाभ मिळावा तसेच आत्मनिर्भर व्हावे यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत असल्याचे सांगितले.

सुरवातील महिलांनी गट स्थापन केल्यानंतर ६ महिन्यानंतर या गटाचा समावेश ग्रामसंघात करण्यात येतो. एका महिला ग्रामसंघात ९ महिलांचा समावेश करुन त्यांना खेळते भांडवल उपलब्ध करुन देणे, शासनाकडून अनुदान मिळवून देणे, लघु उद्योग सुरु करण्यासाठी स्वयंसहायता समूहाना बिनव्याजी कर्ज उपलब्ध करुन देणे, केंद्र व राज्य शासनामार्फत सुरु केलेल्या विविध योजनांचा लाभ महिलांना देणे, १२ रुपयांत पंतप्रधान विमा योजनेचा लाभ देणे, महिलांना घरच्या घरी शिलाई मशिन, पापड, लोणचे तयार करणे, संगणक प्रशिक्षण, मोबाईल दुरुस्ती आदी प्रशिक्षण देणे याबाबत मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाला महिला ग्रामसंघाच्या अध्यक्षा मिनाबाई साबळे, सचिव सुषमा खोतकर, कोषाध्यक्षा राधा अवसरमल, छाया पवार आदीसह जवळपास १०० महिला उपस्थित होत्या. प्रास्ताविक व आभार मिरा तोंडे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रतिभा साळवे, ज्योत्स्ना दवंडे, नितीन सरोदे, मयुर पवार आदीसह पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.

टॅग्स :Walujवाळूज