शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
2
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
3
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका
4
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य
5
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
6
'टीम इंडिया'त मिळाली नाही संधी; अखेर परदेशी संघाकडून खेळला, पहिल्याच सामन्यात ठोकलं शतक
7
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
8
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
9
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
10
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
11
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
12
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
13
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
14
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
15
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
16
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
17
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
18
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
19
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
20
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष

स्त्रियांप्रमाणेच मोदींच्याही मनाचा ठाव लागणे कठीण

By admin | Updated: December 18, 2015 23:47 IST

औरंगाबाद : ‘करवीर पीठाचा शंकराचार्य म्हणून माझी इच्छा आहे की, अयोध्येमध्ये त्याच जागी राम मंदिर बनावे व तेही याच सरकारच्या कार्यकाळात.

औरंगाबाद : ‘करवीर पीठाचा शंकराचार्य म्हणून माझी इच्छा आहे की, अयोध्येमध्ये त्याच जागी राम मंदिर बनावे व तेही याच सरकारच्या कार्यकाळात. मात्र असे म्हणतात की, महिलांच्या मनात काय चालले हे कळत नाही. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मनात काय चालले याचाही थांगपत्ता लागत नाही, ते कधी काय निर्णय घेतील याचा नेम नाही,’ असे विचार करवीर पीठाचे शंकराचार्य विद्यानृसिंहभारती स्वामी यांनी येथे व्यक्त केले. दत्त जयंतीनिमित्त सिडको एन- ७ येथील जागृत दत्तमंदिरात आयोजित धार्मिक कार्यक्रमासाठी शंकराचार्य शहरात आले होते. या निमित्ताने आयोजित (पान १ वरून) पत्रपरिषदेत शंकराचार्य यांनी सांगितले की, माझा राजकारणाशी काही संबंध नाही; पण धर्मपीठाच्या गादीवर बसलो असताना मलाही सर्वांप्रमाणे राम मंदिर उभारले जावे असेच वाटते. ‘शनिशिंगणापूर येथे चौथऱ्यावर महिलांना प्रवेश मिळावा यासाठी विधानसभेसमोर महिला आमदारांनी निदर्शने केली. याबद्दल शंकराचार्य म्हणाले की, हिंदू संस्कृतीत काही रुढी, परंपरा आहेत. त्या आज तयार झालेल्या नाहीत, तर हजारो वर्षांच्या अभ्यासातून निर्माण झालेल्या आहेत. यामुळे रुढी, परंपरांचे ‘गुडविल’ जपले गेले पाहिजे. मात्र, काळाच्या ओघात आलेल्या शास्त्रविरोधी परंपरा मोडीत काढायला हव्यात. जसे की, सतीची प्रथा आता बंद झाली आहे. चौकट वेळप्रसंगी असहिष्णू बनावे शंकराचार्य म्हणाले की, कोणी कसे राहावे, कसे वागावे, हे धर्म संस्कृतीने ठरवून दिले आहे. सैनिकांनी सहिष्णू राहून चालत नाही. त्यांनी असहिष्णूच राहिले पाहिजे. तसेच बुद्धिजीवींनी सहिष्णूच राहिले पाहिजे. मात्र, क्वचितप्रसंगी असहिष्णूही बनले पाहिजे.