शहरं
Join us  
Trending Stories
1
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
2
सीरियावरील हल्ल्यांमुळे इराण संतापला; इस्रायलला जन्माची अद्दल घडवण्यासाठी आखला प्लॅन
3
ना कॉल ना गिफ्ट...! शमीची पोस्ट बघून हसीन जहाँच्या मनात आली ही गोष्ट, म्हणाली...
4
STनेच होणार विदर्भातील नागरिकांची नागद्वार यात्रा, दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची फोनवर चर्चा
5
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
6
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
7
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
8
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
9
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
10
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
11
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
12
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
13
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
14
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
15
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
16
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
17
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
18
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
19
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
20
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी

महिलेचे दागिने लांबविले

By admin | Updated: July 8, 2014 00:36 IST

वसमत : शिर्डीहून निजामबादकडे कारने निघालेल्या दाम्पत्याने रविवारी रात्री वसमतजवळील माळवटा पेट्रोलपंपाशेजारी विश्रांतीसाठी कार उभी केली होती.

वसमत : शिर्डीहून निजामबादकडे कारने निघालेल्या दाम्पत्याने रविवारी रात्री वसमतजवळील माळवटा पेट्रोलपंपाशेजारी विश्रांतीसाठी कार उभी केली होती. अज्ञात चोरट्यांनी कारमधील महिलेचे दागिने लुटल्याची घटना समोर आली आहे. तक्रार देण्यासाठी हे दाम्पत्य ग्रामीण पोलिस ठाण्यात दाखलही झाले होते; मात्र या घटनेची नोंद नसल्याचे ग्रामीण पोलिसांचे म्हणणे आहे.रविवारी मध्यरात्री वसमत- नांदेड रस्त्यावर एका पाठोपाठ दोन लुुटपाटीच्या घटना घडल्या. यातील जीप चोरल्याच्या प्रकाराची नोंद ग्रामीण पोलिसांत आहे. ही घटना घडल्यानंतर पहाटे तीनच्या सुमारास माळवटा पेट्रोल पंपाजवळ उभ्या कारमधील महिलेच्या अंगावरील दागिने काढून घेतल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकाराची मात्र ग्रामीण पोलिस ठाण्यात नोंद नाही. सदर प्रकाराची समोर आलेली माहिती अशी की, निजामबाद येथील एक दाम्पत्य नव्याकोऱ्या कारने शिर्डीचे दर्शन घेवून परत जात होते. वसमतजवळ ही कार रविवारी मध्यरात्रीनंतर पोहोचली. चालकाला झोप येत असल्याने चालकाने माळवटा पाटीजवळील पेट्रोलपंपाजवळ कार उभी करून विश्रांती घेणे सुरू केले.पहाटे तीनच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी कारमधील महिलेच्या अंगावरील दागिने काढून घेवून पोबारा केला. लुटल्या गेलेल्या दाम्पत्याने कारसह जिंतूर टी पाँईट गाठले. तेथील कर्मचाऱ्यांच्या मदतीने ग्रामीण पोलिस ठाणे गाठले. ग्रामीण पोलिस ठाण्यात लेखी तक्रारही देण्याचा प्रयत्न या दाम्पत्यांनी केल्याचे वृत्त आहे. जीप चोरी व दागिने लुटल्याची तक्रार देणारे एकापोठापाठ एक ग्रामीण पोलिसांत दाखल झाले, हे विशेष. निजामबाद येथील रहिवासी वैद्यकीय व्यावसायिक हे दाम्पत्य होते. नव्या कारसह ते ग्रामीण पोलिस ठाण्यात आले होते. कार टेपररी पासिंगची होती, असे प्रत्यक्षदर्शीचे म्हणणे आहे.या संदर्भात ग्रामीण पोलिस ठाण्याचे सपोनि सुनील नाईक यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी अशी कोणतीही घटनाच घडली नसल्याचे अगोदर सांगितले. नंतर घटना कानावर आली, मात्र खरी की खोटे हे माहिती नाही, अधिकृत तक्रार आमच्याकडे आलेली नाही. अशीही भूमिका त्यांनी मांडली.सदर प्रतिनिधीने घटनास्थळी भेट देवून घटनेची सत्यता पडताळून पाहून पुन्हा सपोनि नाईक यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या संदर्भात नंतर बोलू, असे सांगून सदर प्रकाराला बगल देण्याचा प्रकार केला. एखाद्या महिलेला लुटण्याची घटना घडली असेल व जर ही महिला तक्रार देण्यासाठी पोलिस ठाण्यात आली असेल व या गंभीर प्रकाराची नोंदही पोलिसांनी घेतली नसेल तर पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न चिन्हे उभे राहते. ‘पोलिसांत तक्रार नाही’ या एका मुद्यावर जर पोलिस झटकन गंभीर गुन्ह्यावर पांघरून कसे घालू शकतात? हा एक प्रश्नच आहे. (वार्ताहर)ग्रामस्थांमधून संताप शिर्डी येथून निजामाबादकडे निघालेल्या दाम्पत्याला रविवारी रात्री माळवटा पाटीनजीक लुटल्याची घटना घडली. एकाच रात्री लुटमारीच्या दोन घटना घडूनही वसमत ग्रामीण पोलिसांना नाही गांभिर्य.पोलिस अधिकाऱ्यांची टाळाटाळीची भूमिका.