शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट निवडणुकीचा निकाल लागताच राज ठाकरे वर्षा निवासस्थानी; CM देवेंद्र फडणवीसांची घेतली भेट
2
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
3
भारत अमेरिकेला आणखी एक झटका देण्याच्या तयारीत; कच्च्या तेलानंतर रशियासोबत करू शकतो ‘ही’ डील
4
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधूंच्या सपशेल पराभवावर CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
5
Stock Market Today: शेअर बाजाराची मजबूत सुरुवात, Nifty २५,१०० च्या वर; NBFCs, रियल्टी शेअर्समध्ये तेजी
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफवर रामबाण तोडगा सापडला, हे मित्र बनणार भारतासाठी ढाल
7
सत्काराच्या शालीने वकिलाचा न्यायालयातच गळफास; खिशात चिठ्ठी, पण पोलिसांनी माहिती दडवली
8
मृत्यूच्या खाईत सौंदर्याचा सशक्त आवाज; पॅलेस्टाइनची तरुणी यंदा 'मिस युनिव्हर्स'मध्ये...
9
अदानींनी परदेशी बँकांकडून घेतलं 24000000000 रुपयांचं कर्ज! जाणून घ्या, एवढ्या मोठ्या रकमेचं काय करणार? किती व्याज लागणार? 
10
शाहरुखचा लेक त्याचाच डुप्लिकेट! लूक अन् आवाज सगळंच सेम, पहिल्यांदाच आला प्रेक्षकांसमोर, म्हणाला...
11
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
12
अक्षय कुमार, अर्शद वारसी हाजिर हो..! दिवाणी न्यायालयात प्रकरण दाखल; कारण काय?
13
'त्याला मीच मारलं पण तो कोण होता?'; दहावीच्या विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या मुलाची धक्कादायक चॅटिंग समोर
14
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
15
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
16
“वराह जयंती साजरी करण्याची मागणी म्हणजे तरुणांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा अजेंडा”: सपकाळ
17
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
18
घरांच्या किमतींपेक्षा भाडे जास्त वेगाने वाढते आहे.... महानगरांतली वाढ तर चक्रावून टाकणारी !
19
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
20
आजचा अग्रलेख: मनमानी आणि कंत्राटदारधार्जिणे निर्णय रोखून खाबूगिरीला चाप बसावा, म्हणून...

तारेला चिटकून महिलेचा मृत्यू

By admin | Updated: May 20, 2014 00:06 IST

पाथरी : मुख्य वाहिनीच्या लोंबकळत पडलेल्या तारेला चिटकून कोल्हावाडी येथील आशामती केशव भिसे (वय ३५ ) या महिलेचा दुदैवी मृत्यू झाला.

पाथरी : मुख्य वाहिनीच्या लोंबकळत पडलेल्या तारेला चिटकून कोल्हावाडी येथील आशामती केशव भिसे (वय ३५ ) या महिलेचा दुदैवी मृत्यू झाला. ही घटना १९ मे रोजी सकाळी ७.३० वाजेच्या सुमारास घडली. ही महिला शेतातून भूईमुगाचे वेल उपटून घरी परत येत असताना ही घटना घडली. कोल्हावाडी या गावाला आंबेगाव फिडरमधून वीज पुरवठा होतो. या फिडरहून येणारी मुख्य वाहिनी पाणीपुरवठा योजनेच्या डीपीला जोडण्यात आली आहे. मुख्य वाहिनीचे दोन खांब डीपीला जोडण्यापूर्वीच बालासाहेब शंकरराव भिसे यांच्या शेतात काही महिन्यांपासून वाकले गेले होते. यामुळे मुख्य वाहिनीच्या तारा जमिनीलगत लोंबकळत होत्या. शेतकर्‍यांनी या संदर्भात वीज कंपनीच्या अधिकारी व कर्मचार्‍यांकडे अनेक वेळा तक्रारी करुन वाकलेले खांब दुरुस्त करुन देण्याची मागणी केली होती. परंतु, वीज कंपनीच्या अधिकार्‍यांनी याकडे कानाडोळा केला. १९ मे रोजी गावातील एका शेतकर्‍याच्या शेतात भूईमुगाच्या पिकाची काढणी सुरु होती. यावेळी जवळपास १०० महिला सकाळी ६ वाजताच भूईमूग शेंगा काढण्यासाठी शेतात गेल्या. वेल उपटून या महिला गावाकडे परत येत असताना बालासाहेब भिसे यांच्या शेतातील मुख्य वाहिनीच्या वाकलेल्या खांबाच्या तारेला आशामती केशव भिसे या महिलेच्या डोक्याचा स्पर्श झाला. तारेत विद्युत प्रवाह सुरु असल्याने महिला तारेला चिटकून पडली. आजुबाजुच्या महिलांच्या लक्षात हा प्रकार आला. परंतु, मुख्य वाहिनीची तार असल्याने या प्रसंगी या महिलेस कोणी मदत करु शकले नाही. काही महिलांनी घटनास्थळी जाण्याचा प्रयत्न केला. परंतु, इतरांनी आरडाओरड केल्यामुळे या महिलाही अपघातातून बालंबाल बचावल्या. काही क्षणातच तारेला चिटकलेल्या आशामती यांचा मृत्यू झाला. ग्रामस्थांनी तातडीने परभणी येथील शासकीय रुग्णालयामध्ये दाखल केले. परंतु, तत्पूर्वीच आशामाती यांचा मृत्यू झाला होता. (वार्ताहर) अधिकार्‍यांवर कारवाई करा-वर्षा भिसे कोल्हावाडी येथील आशामती भिसे यांचा तारेला स्पर्श लागून मृत्यू झाला. या प्रकरणास वीज वितरण कंपनीचे अधिकारी व कर्मचारी जबाबदार आहेत. घटनेनंतर तब्बल सहा ते आठ तासापर्यंत कंपनीच्या अधिकारी किंवा कर्मचार्‍याने या ठिकाणी भेट दिली नाही. गेल्या कित्येक महिन्यांपासून ग्रामस्थांच्या वतीने वीज कंपनीचे अधिकारी व कर्मचार्‍यांना या वाकलेल्या खांबाबाबत माहिती देण्यात आली होती. परंतु, त्याकडे त्यांनी दुर्लक्ष केले. याच लोंबकाळलेल्या तारामुळे आशामती भिसे यांचा दुदैवी मृत्यू झाला. वीज कंपनीने त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत देऊन अधिकारी व कर्मचार्‍यावर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी सरपंच वर्षाताई विठ्ठलराव भिसे यांनी केली आहे. गावाला जोडणार्‍या मुख्य वाहिनीच्या तारा लोंबकळत पडलेल्या घटनेला काही महिने झाले होते. गावचा लाईनमन, कंपनीचे शाखा अभियंता यांना अनेकवेळा ग्रामस्थांनी तोंडी कल्पना दिली होती. वीज कंपनीने मुख्य वाहिनीच्या तारा दुरुस्तीकडे दुर्लक्ष केल्यामुळे हा प्रसंग ओढावला गेला.