शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
3
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
4
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
5
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
6
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
7
तक्रारदारासोबत गैरवर्तन, २ पोलिस अधिकारी निलंबित
8
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
9
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
10
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
11
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
12
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
13
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
14
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
15
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
16
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
17
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
18
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
19
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
20
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?

दांडीबहाद्दर अधिव्याख्यात्याचे रोखले वेतन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:06 IST

औरंगाबाद : मागील दहा महिन्यांपासून विद्यापीठ प्रशासन अथवा विभागप्रमुखांना न सांगता गायब असलेल्या प्राणीशास्त्र विभागाच्या अधिव्याख्यात्यावर वेतन रोखण्याची कारवाई ...

औरंगाबाद : मागील दहा महिन्यांपासून विद्यापीठ प्रशासन अथवा विभागप्रमुखांना न सांगता गायब असलेल्या प्राणीशास्त्र विभागाच्या अधिव्याख्यात्यावर वेतन रोखण्याची कारवाई करण्यात आली असून, या घटनेने विद्यापीठ वर्तुळात अनेकांचे धाबे दणाणले आहेत.

यासंदर्भात अधिक माहिती अशी की, प्राणीशास्त्र विभागातील अधिव्याख्याता तथा प्राणीशास्त्र अभ्यास मंडळाचे अध्यक्ष प्रा. डॉ. ई.आर. मार्टीन हे मागील लॉकडाऊनच्या काळापासून आजपर्यंत विद्यापीठाकडे फिरकले नाहीत. प्राप्त माहितीनुसार ते सध्या म्हैसूर येथे त्यांच्या पत्नीकडे आहेत. त्यांची पत्नी तेथे केंद्र सरकारच्या एका कार्यालयात अधिकारी पदावर कार्यरत आहे.

लॉकडाऊनच्या काळात ऑनलाइन तासिका घेण्याचे आदेश असताना सुरुवातीला त्यांनी त्याकडेही कानाडोळा केला. आता ते विद्यार्थ्यांच्या ग्रुपवर व्हिडीओ क्लिप टाकून अध्यापनाचे कार्य पार पाडतात. ते कुठे आहेत, याची कल्पना विभागातील कोणालाही नाही. ते सतत गैरहजर असल्यामुळे विभागप्रमुखांनी त्यांना फोन केला. तेव्हा त्यांनी त्यांचा फोनही घेतला नाही. त्यानंतर मेलद्वारे विचारणा करण्यात आली, तर त्यांनी त्याचेही उत्तर दिले नाही. साधारणपणे डिसेंबरपासून त्यांना नेमून देण्यात आलेल्या कामांपैकी त्यांनी कोणते काम केले, याबद्दल विभागाला रिपोर्टिंगही केलेले नाही. अभ्यास मंडळाचे अध्यक्ष या नात्याने पीएच.डी.बाबत अधिमान्यता समितीच्या (आरआरसी) बैठकांना उपस्थित असणे गरजेचे असते; परंतु ते लॉकडाऊनच्या काळात एकाही बैठकीला उपस्थित राहिले नाहीत.

विभागप्रमुख डॉ. के.बी. शेजुळे यांनी डॉ. मार्टीन यांच्या या अनियमिततेकडे एका पत्राद्वारे विद्यापीठ प्रशासनाचे लक्ष वेधले. तेव्हा प्रशासनाने १० मार्च रोजी त्यांना पत्र पाठवून विचारणा केली; परंतु त्यांनी विद्यापीठाचे पत्र स्वीकारले नाही. त्यामुळे ते पत्र परत आले. त्यामुळे प्रशासनाने त्यांचेच मार्च महिन्यापासून वेतन रोखण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यापीठाने घेतलेल्या या धाडसी निर्णयामुळे विद्यापीठातील काही दांडीबहाद्दर प्राध्यापकांचे धाबे दणाणले आहेत.

चौकट......

आणखी नोटीस पाठवून म्हणणे ऐकून घेऊ

यासंदर्भात कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी सांगितले की, डॉ. मार्टीन हे पूर्वपरवानगीशिवाय डिसेंबर महिन्यापासून गैरहजर आहेत. ते विभागाकडे फिरकले नाहीत, ते रिपोर्टिंग करीत नाहीत, अशा विभागप्रमुखांच्या तक्रारी होत्या. त्यानुसार प्रशासनाने त्यांना पत्र पाठवून माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला; पण त्यांनी विद्यापीठ प्रशासनाचेही पत्र स्वीकारले नाही. त्यामुळे मार्च महिन्यापासून त्यांचे वेतन रोखण्याची कारवाई करण्याचा निर्णय घेतला. नैसर्गिक न्यायानुसार त्यांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी आणखी नोटीस पाठवली जाईल. त्यानंतर त्यांच्याबाबत पुढील निर्णय घेतला जाईल.