शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
2
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
6
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
7
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
10
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
11
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
12
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
13
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
14
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
15
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
16
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
17
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
18
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
19
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
20
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

विजेत्या शाळांना बक्षिसांची रक्कम मिळेना

By admin | Updated: September 26, 2014 01:19 IST

विष्णू वाकडे , रामनगर जिल्हा प्रशासनाने सुमारे दीड वर्षांपूर्वी राबविलेल्या पर्यावरण जाणिव जागृती उपक्रमात जिल्ह्यातील शाळांना सहभाग नोंदवून बिया संकलन केले होते.

विष्णू वाकडे , रामनगरजिल्हा प्रशासनाने सुमारे दीड वर्षांपूर्वी राबविलेल्या पर्यावरण जाणिव जागृती उपक्रमात जिल्ह्यातील शाळांना सहभाग नोंदवून बिया संकलन केले होते. यातील जास्त बिया संकलन करणाऱ्या पहिल्या तीन शाळांना रोख बक्षीस देण्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र या तीनही बक्षीस पात्र शाळांची प्रशस्तीपत्रावरच बोळवन केली. त्यांना अद्यापपर्यंत जिल्हा प्रशासनाने जाहीर केलेल्या बक्षिसांची रक्कम देण्यात आली नाही. त्यामुळे जिल्हा प्रशासनाची घोषणाही राजकीय पुढाऱ्यांच्या घोषणेप्रमाणेच ठरते की काय ? असा प्रश्न विद्यार्थी व शिक्षकांना पडला आहे.जिल्ह्यात सन २०१२- १३ मध्ये जिल्हा परिषद व जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात आला. यासाठी तत्कालिन जिल्हाधिकारी श्याम देशपांडे यांनी विशेष प्रयत्न केले होते. त्यास जिल्हाभरातील शाळांनी मोठा सहभाग नोंदवून विविध प्रकारच्या बियांचे संकलन केले. संलग्न केलेल्या या बियांचे मोजमाप करून एकत्रिकरण करण्यात आले. सर्वाधिक तीन कोटी ८७ लाख ४८ हजार ७०१ एवढ्या बियांचे संकलन रामनगर येथील शिवाजी हायस्कुलने केल्याने या शाळेचा प्रथम क्रमाक आला होता. तर जयभवानी विद्यालय देळेगव्हाणचा द्वितीय व जयभवानी विद्यालय जयपूरचा तृतीय क्रमांक आला होता. या उपक्रमात या तिन्ही शांळानी उल्लेखनीय कार्यकेल्याने २६ जानेवारी २०१३ रोजी शांळाचा प्रशस्तीपत्र देवून गौरव करण्यात आला. मात्र बक्षीसाची रक्कम देण्यात आलेली नाही. या बाबत शिक्षणाधिकारी प्रा. रामदास शेवाळे यांच्याशी संपर्क साधला असता तीन्ही शाळांना बक्षिसांची रक्कम मिळावी असेच मत व्यक्त केले.या उपक्रमात प्रथम बक्षीस प्राप्त शाळांना १० लाख, द्वितीय ५ लाख व तृतीय १ लाखाचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. उपक्रम राबवून दिडवर्षाचा कालावधी उलटूनही प्रशासनाने या शांळाना बक्षीसाची रक्कम अदा केली नाही.ही रक्कम तात्काळ अदा करण्याची मागण होत आहे. (वार्ताहर)