शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

विजेसाठी ऐन दुष्काळात होरपळ

By admin | Updated: February 10, 2015 00:33 IST

औरंगाबाद : शासनाने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तीन महिन्यांचे वीज बिल आणि साडेतेहतीस टक्केवीज बिलात सवलतीची घोषणा केलेली आहे;

औरंगाबाद : शासनाने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तीन महिन्यांचे वीज बिल आणि साडेतेहतीस टक्केवीज बिलात सवलतीची घोषणा केलेली आहे; पण महावितरणचे अधिकारी घोषणेची अंमलबजावणी करताना दिसून येत नाहीत. शासनाच्या आदेशाला बगल देऊन शेतकऱ्यांकडून शंभर टक्के वीज बिलाची वसुली करीत आहेत. या धोरणामुळे महावितरण शेतकऱ्यांच्या मुळावर उठले आहे का असा प्रश्न शेतकरी करीत आहेत.मराठवाड्यात दुष्काळाची तीव्रता वाढत आहे, अशा परिस्थितीत काही विहिरीला आणि बोअरला असलेले पाणी रोहित्र जळाल्याने शेतकरी आणि ग्रामस्थांना मिळत नाही. शेतकऱ्यांच्या हाताशी आलेली पिके पाण्याअभावी करपत आहेत. महावितरण आणि अधिकाऱ्यांच्या धोरणामुळे शेतातील उभ्या पिकांची राखरांगोळी होत आहे. वीजपुरवठा होत नसल्यामुळे पाणी मिळत नाही. बाजारपेठ थंडावली आहे. शासनाने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिलेल्या सवलतीही त्यांना दिल्या जात नसल्यामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत. डी. पी जळाल्यानंतर नवीन अथवा दुरुस्तीसाठी महिना लागत आहे. विशेष म्हणजे रोहित्र जळाल्यानंतर तीन दिवसांत बदलून देणे कंपनीला बंधनकारक आहे. महावितरणचे वरिष्ठ अधिकारी रोहित्रासाठी नियमानुसार ७० टक्के वीज बिल घेत आहेत; पण शेतकऱ्यांना वीज बिल माफी आणि सवलतीचा फायदा देत नाही आणि कर्मचारी अनधिकृत पैसे घेऊन शेतकऱ्यांची पिळवणूक करीत आहेत. शेतकऱ्यांना रोहित्र जळाल्यानंतर तीन दिवसांत दुरुस्त अथवा नवीन देणे बंधनकारक आहे. शासनाने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना जुलै, आॅगस्ट आणि सप्टेंबर या तीन महिन्यांचे वीज बिल माफ आणि साडेतेहतीस टक्के बिलात सवलत जाहीर केली आहे. हे नियम अधिकाऱ्यांना दिसत नाहीत का असा प्रश्न शेतकरी करीत आहेत.पैसे द्या, ट्रान्स्फॉर्मर घ्याशेतकऱ्यांना प्रथम वीज बिल भरण्यासाठी पैशांची जमवाजमव करावी लागते. गावातील वायरमनला रोहित्र काढण्यासाठी हजार ते दोन हजार रुपये द्यावे लागतात, त्यानंतर वायरमन गावातील अप्रशिक्षित कामगारांकडून रोहित्र काढून घेतो. डी. पी. काढल्यानंतर कन्नड अथवा औरंगाबादला आणण्यासाठी लोडिंग रिक्षाचे भाडे शेतकऱ्यांना द्यावे लागते. रोहित्र शेतातील रस्त्यातून आणायचे असल्यामुळे रिक्षाचालक जास्तीचे भाडे घेतो. रोहित्र फिल्टरवर आणल्यानंतर संबंधित अभियंता आणि वायरमनला प्रत्येकी एक ते दीड हजार रुपये द्यावे लागतात. एवढा खर्च केल्यानंतर आदेशाप्रमाणे ७० टक्के बिल भरावे लागते.ही सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सात ते दहा दिवस लागतात. त्यानंतर अधिकारी तीन-चार दिवसांनी या, रोहित्र देतो, असे आश्वासन देतो. शेतकरी अभियंत्याच्या आश्वासनाप्रमाणे डी.पी. घेण्यासाठी येतात. पुन्हा चिरीमिरीचा कारभार सुरू होतो. रोहित्र चांगले घेण्यापासून ते बसविण्यापर्यंत शेतकऱ्यांना पैसे द्यावे लागतात. चांगले रोहित्र काढण्यासाठी फिल्टरवरील कर्मचाऱ्याला दोनशे ते तीनशे रुपये, त्यानंतर रोहित्र रिक्षा अथवा टेम्पोमध्ये लोड करण्यासाठी पाचशे ते सातशे रुपये, ठरल्याप्रमाणे पुन्हा रिक्षाचे भाडे, गावात गेल्यानंतर रोहित्र उतरवण्यासाठी पाचशे ते सातशे रुपये, शेवटी पुन्हा रोहित्र काढल्याप्रमाणे डी. पी. बसविण्यासाठी एक ते दोन हजार रुपये वायरमनला द्यावे लागतात. असे सात ते दहा हजार रुपये शेतकऱ्यांना खर्च करावे लागत आहेत. विशेष म्हणजे शेतकऱ्यांना अथवा ग्रामस्थांना रोहित्रासाठी एक रुपयाही खर्च करणे गरजेचे नाही; पण अधिकाऱ्यांचा कर्मचाऱ्यावरील वचक कमी झाल्यामुळे गावपातळीवरील वायरमन चिरीमिरी घेतल्याशिवाय काम करीत नाहीत. शेतकऱ्यांनी पैसे न दिल्यास संबंधित कर्मचारी डी. पी बसविण्यासाठी टाळाटाळ करतात.