शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

रेल्वेने पाणी येणार का; जिल्हाधिकाऱ्यांना सवाल

By admin | Updated: April 4, 2016 00:40 IST

लातूर : लातूर शहरातील भीषण पाणीटंचाई लक्षात घेता, प्रभागातील लोकसंख्येनुसार वाढीव टॅँकर देण्याचा प्रशासनाने निर्णय घेतला आहे.

लातूर : लातूर शहरातील भीषण पाणीटंचाई लक्षात घेता, प्रभागातील लोकसंख्येनुसार वाढीव टॅँकर देण्याचा प्रशासनाने निर्णय घेतला आहे. पाणीटंचाईच्या प्रश्नावर प्रशासन गंभीर असून, जिल्ह्यात उपलब्ध असलेल्या पाणीसाठ्यावरुन पाणी शहराला वितरीत केले जात आहे, असे जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांनी रविवारी झालेल्या सुकाणू समितीच्या बैठकीत सांगितले. दरम्यान, दुष्काळी भागात जार आणि बाटलीबंद पाणी टॅक्स फ्री करण्यात यावे, अशी मागणी आमदार अमित देशमुख यांनी केली. रेल्वेने पाणी येणार का, असा सवालही या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आला़शासकीय विश्रामगृह येथे रविवारी सुकाणू समितीची बैठक झाली़ या बैठकीत लातूर शहरातील पाणी पुरवठ्याबाबत चर्चा करण्यात आली़ प्रशासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहिती जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांनी दिली़ बैठकीस आ. अमित देशमुख, आ़त्रिंबक भिसे, जि़प़अध्यक्षा प्रतिभाताई पाटील, मनपा आयुक्त सुधाकर तेलंग, महापौर अख्तर शेख, उपमहापौर राजेंद्र कांबळे, मोईज शेख, अतुल देऊळगावकर यांच्यासह नगरसेवकांची उपस्थिती होती़ (आणखी वृत्त हॅलो २ वर)लातूर शहराला रेल्वेने पाणीपुरवठा करणार का, ८ एप्रिलला रेल्वेने पाणी येणार असेल तर आम्हाला स्वागत करायचे आहे, असे प्रश्न आ़अमित देशमुख यांच्यासह माजी नगराध्यक्ष लक्ष्मण कांबळे, अतुल देऊळगावकर यांनी या बैठकीत उपस्थित केले़ जिल्हाधिकाऱ्यांनी रेल्वेने पाणीपुरवठा करण्याबाबत शासनाने अधिकृत काहीही सूचना केलेल्या नसल्याचे सांगितले़ शिवाय, रेल्वेने पाणीपुरवठा करणे सध्या तरी शक्य नाही. राजस्थानातील काही जिल्ह्यामध्ये रेल्वेद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे, तेथील माहिती घेतली जात आहे़ रेल्वेने पाणी आणण्याबाबतचा आपलाही प्रस्ताव राज्य शासनाकडे असल्याचे जिल्हाधिकारी पोले म्हणाले़