शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
6
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
7
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
8
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
9
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
10
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
11
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
12
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
13
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
14
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
15
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
16
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
17
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
18
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
19
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती

रेल्वेने पाणी येणार का; जिल्हाधिकाऱ्यांना सवाल

By admin | Updated: April 4, 2016 00:40 IST

लातूर : लातूर शहरातील भीषण पाणीटंचाई लक्षात घेता, प्रभागातील लोकसंख्येनुसार वाढीव टॅँकर देण्याचा प्रशासनाने निर्णय घेतला आहे.

लातूर : लातूर शहरातील भीषण पाणीटंचाई लक्षात घेता, प्रभागातील लोकसंख्येनुसार वाढीव टॅँकर देण्याचा प्रशासनाने निर्णय घेतला आहे. पाणीटंचाईच्या प्रश्नावर प्रशासन गंभीर असून, जिल्ह्यात उपलब्ध असलेल्या पाणीसाठ्यावरुन पाणी शहराला वितरीत केले जात आहे, असे जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांनी रविवारी झालेल्या सुकाणू समितीच्या बैठकीत सांगितले. दरम्यान, दुष्काळी भागात जार आणि बाटलीबंद पाणी टॅक्स फ्री करण्यात यावे, अशी मागणी आमदार अमित देशमुख यांनी केली. रेल्वेने पाणी येणार का, असा सवालही या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आला़शासकीय विश्रामगृह येथे रविवारी सुकाणू समितीची बैठक झाली़ या बैठकीत लातूर शहरातील पाणी पुरवठ्याबाबत चर्चा करण्यात आली़ प्रशासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहिती जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांनी दिली़ बैठकीस आ. अमित देशमुख, आ़त्रिंबक भिसे, जि़प़अध्यक्षा प्रतिभाताई पाटील, मनपा आयुक्त सुधाकर तेलंग, महापौर अख्तर शेख, उपमहापौर राजेंद्र कांबळे, मोईज शेख, अतुल देऊळगावकर यांच्यासह नगरसेवकांची उपस्थिती होती़ (आणखी वृत्त हॅलो २ वर)लातूर शहराला रेल्वेने पाणीपुरवठा करणार का, ८ एप्रिलला रेल्वेने पाणी येणार असेल तर आम्हाला स्वागत करायचे आहे, असे प्रश्न आ़अमित देशमुख यांच्यासह माजी नगराध्यक्ष लक्ष्मण कांबळे, अतुल देऊळगावकर यांनी या बैठकीत उपस्थित केले़ जिल्हाधिकाऱ्यांनी रेल्वेने पाणीपुरवठा करण्याबाबत शासनाने अधिकृत काहीही सूचना केलेल्या नसल्याचे सांगितले़ शिवाय, रेल्वेने पाणीपुरवठा करणे सध्या तरी शक्य नाही. राजस्थानातील काही जिल्ह्यामध्ये रेल्वेद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे, तेथील माहिती घेतली जात आहे़ रेल्वेने पाणी आणण्याबाबतचा आपलाही प्रस्ताव राज्य शासनाकडे असल्याचे जिल्हाधिकारी पोले म्हणाले़