शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
2
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
3
आता 'या' देशात पर्यटकही धूम्रपान करू शकणार नाहीत! सेलिब्रेटींमध्ये लोकप्रिय असणाऱ्या देशाचे नियम बदलले
4
भारताला डिवचण्याचा प्रयत्न; मोहम्मद युनूस यांनी पाकिस्ताननंतर तुर्कीला दिला वादग्रस्त नकाशा
5
Viral Video: लग्नात स्वयंपाक बनवताना तरुणाचं घाणेरडं कृत्य; व्हिडिओ समोर येताच अटक!
6
३०, ४० आणि ५० व्या वर्षी 'कोट्यधीश' व्हायचेय? तुमच्या वयानुसार निवडा गुंतवणुकीची योग्य स्ट्रॅटेजी!
7
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार
8
ICC Rankings : हातात विश्वचषकाचा 'दागिना'; पण जाता जाता लॉरानं 'वनडे क्वीन’ स्मृतीचा मुकूट हिसकावला!
9
दुबार मतदारांच्या नावासमोर 'डबल स्टार' येणार; राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, कशी असेल नवी मोहीम?
10
सलग चौथ्या दिवशी बाजारात घसरण! गुंतवणूकदारांचे २.६ लाख कोटी पाण्यात; 'ही' आहेत ५ कारणे
11
लग्नात का येताहेत समस्या? कोणत्या सुधारणा आवश्यक? न्यायालयानं स्पष्टच सांगितलं
12
मंदिराच्या गर्भगृहाची दुरुस्ती करताना सापडलं घबाड, कलशात होती सोन्याची एवढी नाणी...  
13
माणुसकीचा जमानाच राहीला नाही! ओला रायडरची मदत केली अन् तो तरुणीसोबत 'असा' वागला
14
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा शिंदेंना धक्का, रायगडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेशी आघाडी
15
महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणातील मुख्य आरोपी दुबईतून बेपत्ता, भारताच्या प्रत्यार्पणाच्या आशेला धक्का
16
'या' योजनेत गुंतवणूक केल्यास मिळेल दुहेरी फायदा आणि तगडा परतावा, निवृत्तीनंतरचे टेन्शन होईल 'गायब'!
17
सप्तपदीनंतर दोन तासांत लग्न मोडलं, वधू पक्षाने वराला झोड झोड झोडलं, नेमकं काय घडलं?  
18
कॅनडाने भारतीय विद्यार्थ्यांना दिला मोठा धक्का, ७४% विद्यार्थी व्हिसा अर्ज नाकारले
19
उद्योग जगताला मोठा धक्का! हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष गोपीचंद पी. हिंदुजा यांचे लंडनमध्ये निधन
20
चॅटजीपीटी आता तुम्हाला 'या' मुद्द्यांवर सल्ला देणार नाही! कंपनीने का बदलले नियम?

रेल्वेने पाणी येणार का; जिल्हाधिकाऱ्यांना सवाल

By admin | Updated: April 4, 2016 00:40 IST

लातूर : लातूर शहरातील भीषण पाणीटंचाई लक्षात घेता, प्रभागातील लोकसंख्येनुसार वाढीव टॅँकर देण्याचा प्रशासनाने निर्णय घेतला आहे.

लातूर : लातूर शहरातील भीषण पाणीटंचाई लक्षात घेता, प्रभागातील लोकसंख्येनुसार वाढीव टॅँकर देण्याचा प्रशासनाने निर्णय घेतला आहे. पाणीटंचाईच्या प्रश्नावर प्रशासन गंभीर असून, जिल्ह्यात उपलब्ध असलेल्या पाणीसाठ्यावरुन पाणी शहराला वितरीत केले जात आहे, असे जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांनी रविवारी झालेल्या सुकाणू समितीच्या बैठकीत सांगितले. दरम्यान, दुष्काळी भागात जार आणि बाटलीबंद पाणी टॅक्स फ्री करण्यात यावे, अशी मागणी आमदार अमित देशमुख यांनी केली. रेल्वेने पाणी येणार का, असा सवालही या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आला़शासकीय विश्रामगृह येथे रविवारी सुकाणू समितीची बैठक झाली़ या बैठकीत लातूर शहरातील पाणी पुरवठ्याबाबत चर्चा करण्यात आली़ प्रशासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहिती जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांनी दिली़ बैठकीस आ. अमित देशमुख, आ़त्रिंबक भिसे, जि़प़अध्यक्षा प्रतिभाताई पाटील, मनपा आयुक्त सुधाकर तेलंग, महापौर अख्तर शेख, उपमहापौर राजेंद्र कांबळे, मोईज शेख, अतुल देऊळगावकर यांच्यासह नगरसेवकांची उपस्थिती होती़ (आणखी वृत्त हॅलो २ वर)लातूर शहराला रेल्वेने पाणीपुरवठा करणार का, ८ एप्रिलला रेल्वेने पाणी येणार असेल तर आम्हाला स्वागत करायचे आहे, असे प्रश्न आ़अमित देशमुख यांच्यासह माजी नगराध्यक्ष लक्ष्मण कांबळे, अतुल देऊळगावकर यांनी या बैठकीत उपस्थित केले़ जिल्हाधिकाऱ्यांनी रेल्वेने पाणीपुरवठा करण्याबाबत शासनाने अधिकृत काहीही सूचना केलेल्या नसल्याचे सांगितले़ शिवाय, रेल्वेने पाणीपुरवठा करणे सध्या तरी शक्य नाही. राजस्थानातील काही जिल्ह्यामध्ये रेल्वेद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे, तेथील माहिती घेतली जात आहे़ रेल्वेने पाणी आणण्याबाबतचा आपलाही प्रस्ताव राज्य शासनाकडे असल्याचे जिल्हाधिकारी पोले म्हणाले़