शहरं
Join us  
Trending Stories
1
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
2
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
3
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
4
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
5
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
6
इस्रायलचा दावा, वरिष्ठ इराणी लष्करी कमांडर सईद इजादी ठार; हमासशी संबंध असल्याचा आरोप!
7
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
8
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...
9
Ashadhi Wari 2025: दिंडीतून जाताना वारकरी महिला डोईवर तुळशी वृंदावन नेतात; पण का? वाचा!
10
"देवेंद्रजीसुद्धा योगीच, ते कसरत नाही पण..', अमृता फडणवीस यांचं विधान
11
"माझे ९ लाख रुपये निर्मात्यांनी दिलेले नाहीत", 'मन उडू उडू झालं' फेम अभिनेत्याची व्यथा, म्हणाला- "मी इंजिनियर असूनही..."
12
उप कर्णधार रिषभ पंतचा मोठा पराक्रम! शतकी खेळीसह मोडला MS धोनीचा विक्रम! सेलिब्रेशनही एकदम झक्कास
13
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
14
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
15
टीव्ही कपल लता सबरवाल-संजीव सेठ यांचा घटस्फोट, लग्नानंतर १५ वर्षांनी मोडला संसार
16
इराण युद्धात इस्त्रायलला खूप मोठा झटका; जिनपिंग-पुतिन यांच्या निर्णयाने ट्रम्पही चिंतेत
17
राज कुशवाहाकडून कळले सोनमचे सगळे 'राज'! ५ लाखांची रोकड आणि बंदुकीचाही झाला खुलासा
18
याला म्हणतात प्रामाणिकपणा...! व्यापाऱ्याचे रिक्षात लाखो रुपये विसरले, रिक्षाचालकानं सर्व परत नेऊन दिले; रक्कम जाणून थक्क व्हाल!
19
"प्रगत राज्यातील मुलांना मागासलेल्या राज्यांची भाषा...", हिंदी भाषा सक्तीवरुन गार्गी फुले थेटच बोलल्या
20
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पाठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

पुरस्कारांची परंपरा कायम ठेवणार

By admin | Updated: June 19, 2014 00:52 IST

औरंगाबाद : महापालिकेने दहावीत विशेष प्रावीण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेली अर्थरूपी पुरस्कारांची परंपरा कायम सुरू राहणार असल्याचा दावा मनपा आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांनी केला.

औरंगाबाद : महापालिकेने या वर्षीपासून दहावीत विशेष प्रावीण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेली अर्थरूपी पुरस्कारांची परंपरा यापुढे कायम सुरू राहणार असल्याचा दावा मनपा आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांनी केला. १३७ विद्यार्थी विशेष प्रावीण्य मिळवीत उत्तीर्ण झाले आहेत. आयुक्तांच्या दालनात गुणवंतांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सभागृहनेते किशोर नागरे, विरोधी पक्षनेते रावसाहेब गायकवाड, गटनेते मीर हिदायत अली, सभापती सावित्री वाणी, नगरसेवक नारायण कुचे, उपायुक्त सुरेश पेडगावकर, शिक्षणाधिकारी ए.एम. शेख, मुख्याध्यापक संजीव सोनार, शिक्षक आदींची उपस्थिती होती. आयुक्त म्हणाले की, मिलिंद दाभाडे हा मनपा शाळांतून पहिला आहे. त्याला ७५ हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात येईल. उर्वरित ८० ते ८४ टक्क्यांपर्यंत विद्यार्थ्यांना ५० हजार, ७५ ते ८० टक्के मिळवणाऱ्यांना ३५ हजार, ७० ते ७५ टक्के मिळवणाऱ्यांना २० हजार आणि ६० टक्क्यांहून अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना ३ हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे. येत्या आठवड्यात एका कार्यक्रमात विद्यार्थ्यांना या पारितोषिकांचे वितरण होईल. पुढच्या वर्षीचा निकाल ९० टक्क्यांहून पुढे जाईल, असा दावा आयुक्तांनी केला. शिक्षक, सराव वर्ग, परीक्षा, अपेक्षितांचा पुरवठा, संगणक कक्षाची सोय, व्हॅकेशनमुळे विद्यार्थ्यांना यश मिळविता आले. शाळाखोल्या वाढविणारमुख्याध्यापकांनी वर्ग कमी पडत असल्याचे आयुक्तांना सांगितले. यावर आयुक्त म्हणाले की, शाळाखोल्या वाढविण्यात येतील. तात्पुरत्या व्यवस्थेसाठी जागा भाडेत्तत्वावर घेण्यासाठी पाहणी करण्याचे आदेश शिक्षण अधिकाऱ्यांना दिले. तासिका शिक्षकांची वेतनवाढतासिका तत्त्वावरील शिक्षकांच्या मेहनतीमुळे विद्यार्थ्यांना यश मिळाले. रात्रीचे वर्ग, सराव परीक्षा, विद्यार्थ्यांशी आयुक्तांनी केलेला संवाद यामुळे मनपा शाळांचा निकाल या वर्षी उंचावला. तासिका शिक्षकांना शिक्षणसेवकाइतके तरी किमान वेतन मिळेल. याची व्यवस्था या वर्षी करण्यात येईल, असे आयुक्तांनी सांगितले.