शहरं
Join us  
Trending Stories
1
"खडा हूं आज भी वहीं..."; मतचोरीच्या आरोपांवरून जेपी नड्डांनी घेतली राहुल गांधींची 'फिरकी', VIDEO शेअर करत सगळंच उघडं पाडलं!
2
ट्रम्प यांनी भारतावर का लावलंय मोठ्या प्रमाणात टॅरिफ, अखेर व्हाईट हाऊसनं सांगितलं कारण
3
'नोरा फतेहीसारखी फिगर बनव'; पतीने केला पत्नीचा अतोनात छळ, चिडलेल्या तिने शिकवला 'असा' धडा!
4
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
5
CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा फोटो आला समोर, आरोपी गुजरातचा रहिवासी
6
Mumbai Rain Updates Live: मुंबईसाठी हवामान विभागाचा ऑरेंज अलर्ट, मुंबई रेल्वेची वाहतूक धीम्या गतीनं सुरू
7
गृहकर्जाचे हप्ते डोईजड झालेत? सरकार स्वस्तात देतंय २५ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज; कोण घेऊ शकतो लाभ?
8
'मुंबईचा फौजदार' सिनेमाचा रिमेक येणार? गश्मीर म्हणाला- "मी सिनेमा बनवेन पण प्राजक्ता माळीला..."
9
India China Talks: व्यापारापासून ते थेट उड्डाणांपर्यंत; भारत-चीन यांच्यातील चर्चेत अनेक समस्यांवर निघाला तोडगा
10
Ritul: मासिक पाळीदरम्यान केस का धुवू नयेत? जाणून घ्या शास्त्र आणि विज्ञान!
11
BMC: पावसाळ्यात कुठे अडकलात तर काय कराल? मुंबई महानगरपालिकेची महत्त्वाची पोस्ट!
12
'हिला भुतांनी पछाडलेले आहे'; तांत्रिक गरम सळीने चटके देत राहिला, वेदनेने मुलीचा मृत्यू झाला
13
खळबळजनक! बीडमधील कोर्टात सरकारी वकिलाने स्वतःला संपवलं; कारण काय?
14
"चहलने तो टीशर्ट स्टंट खरंच केला? माझा विश्वासच बसत नव्हता..", धनश्री वर्माने व्यक्त केल्या भावना
15
पंतप्रधान अन् मुख्यमंत्र्यांनाही पदावरुन हटवण्याची तरतूद; केंद्र सरकारच्या नवीन विधेयकात नेमकं काय?
16
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
17
आधी बोलत होता, अचानक हात खेचला, धक्का दिला; रेखा गुप्ता यांच्यावर कसा हल्ला झाला? प्रत्यक्षदर्शी म्हणाले...
18
Toll: खराब रस्त्यांवर टोल नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!
19
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
20
रात्रीच्या वेळी शेतामध्ये प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत होती मुलगी; मागून गेलेल्या वडिलांनी बघितलं, उचललं टोकाचं पाऊल अन्...

निवडणूक आचारसंहितेमध्ये जप्त केलेली रक्कम आयकर विभागाकडे जाणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2019 13:57 IST

पुरावे दिले तरच संबंधितांना मिळणार रक्कम परत

ठळक मुद्देभरारी पथकाने पकडली होती रोख जिल्ह्यात ३७ पथके स्थापन करण्यात आली होती.

औरंगाबाद : लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेत जप्त केलेली रक्कम आयकर विभागाकडे जमा होण्याची शक्यता आहे. ज्यांची रक्कम भरारी पथकाने जप्त केली आहे, ती रक्कम कुठून आणली, त्याचे पुरावे सादर केले तरच ती रक्कम त्यांना परत दिली जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.

आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर १० मार्च ते २३ एप्रिलदरम्यान निवडणूक विभागाच्या भरारी पथकांनी ६६ लाख ५५ हजारांची बेहिशेबी रोकड जप्त केली. तर ग्रामीण भागात ४६ लाखांच्या आसपास रक्कम जप्त केली. संबंधित व्यक्तींनी हिशेब सादर न केल्यास ही रक्कम आयकर विभागाकडे जमा केली जाईल. तसेच त्यासंबंधीचा निर्णयही आयकर विभागच घेईल, अशी माहिती निवडणूक विभाग सूत्रांनी दिली. आचारसंहितेत निवडणुकीसाठी पैशांचा हवाला व्यवहार होऊ नये, यावर नजर ठेवण्यासाठी नाकाबंदीच्या अनुषंगाने चेकपोस्ट होते. तसेच जिल्ह्यात ३७ पथके स्थापन करण्यात आली होती.

दीड महिन्यात शहरातील भरारी पथकांनी ६६ लाख ५५ हजार रुपयांची रोकड जप्त केली होती. पैशांसह संबंधित वाहनामध्ये उमेदवार, पक्षांचे झेंडे व इतर प्रचार साहित्य आढळल्यास गुन्हा नोंदवून रक्कम जप्त करण्यात येते. आचारसंहितेच्या काळात सुमारे सोळा लाख रुपये किमतीची दारूही जप्त करण्यात आली होती. 

काही प्रकरणांत सीईओकडे झाली सुनावणी निवडणूक विभागाच्या पथकाने जप्त केलेली रक्कम कोणत्या कामासाठी वापरली जाणार होती, कुठून आली, याचे पुरावे सादर केल्यानंतरच संबंधित व्यक्तीला परत केली जाणार आहे. यासंबंधी जि. प. सीईओ पवनीत कौर यांच्याकडे काही प्रकरणांत सुनावणी झाली असून, काही प्रकरणांत सुनावणी सुरू आहे. येत्या आठ दिवसांत सर्व प्रकरणांची सुनावणी पूर्ण करून त्याचा निकाल जाहीर केला जाईल. मतमोजणीपूर्वी जप्त रकमेबाबत निर्णय घेण्यात येईल. ज्यांना रकमेचा हिशेब देता येणार नाही, त्यांची रक्कम आयकर विभागाकडे दिली जाईल. त्याबाबत पुढील कार्यवाही आयकर विभागच करील, असे सूत्रांनी सांगितले. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९aurangabad-pcऔरंगाबादMONEYपैसाElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग