शहरं
Join us  
Trending Stories
1
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
2
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
3
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
4
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
5
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
6
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
7
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
8
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
9
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
10
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
11
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
12
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
13
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...
14
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
15
Pakistani Citizens Deadline: पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्यासाठी नवी डेडलाइन!
16
Waves Summit 2025: "सॉरी, माझी हार्टबीट खूप...", पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर बोलताना कार्तिक आर्यन झाला नर्व्हस
17
Waves 2025: सिनेसृष्टीतील या ५ दिग्गज सेलिब्रिटींच्या स्मरणार्थ टपाल तिकीटं, पंतप्रधान मोदींनी केलं अनावरण
18
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
19
IPL 2025: Mumbai Indians मध्ये आला नवा 'भिडू', कोण आहे Raghu Sharma? किती मिळाले पैसे?
20
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा

निवडणूक आचारसंहितेमध्ये जप्त केलेली रक्कम आयकर विभागाकडे जाणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2019 13:57 IST

पुरावे दिले तरच संबंधितांना मिळणार रक्कम परत

ठळक मुद्देभरारी पथकाने पकडली होती रोख जिल्ह्यात ३७ पथके स्थापन करण्यात आली होती.

औरंगाबाद : लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेत जप्त केलेली रक्कम आयकर विभागाकडे जमा होण्याची शक्यता आहे. ज्यांची रक्कम भरारी पथकाने जप्त केली आहे, ती रक्कम कुठून आणली, त्याचे पुरावे सादर केले तरच ती रक्कम त्यांना परत दिली जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.

आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर १० मार्च ते २३ एप्रिलदरम्यान निवडणूक विभागाच्या भरारी पथकांनी ६६ लाख ५५ हजारांची बेहिशेबी रोकड जप्त केली. तर ग्रामीण भागात ४६ लाखांच्या आसपास रक्कम जप्त केली. संबंधित व्यक्तींनी हिशेब सादर न केल्यास ही रक्कम आयकर विभागाकडे जमा केली जाईल. तसेच त्यासंबंधीचा निर्णयही आयकर विभागच घेईल, अशी माहिती निवडणूक विभाग सूत्रांनी दिली. आचारसंहितेत निवडणुकीसाठी पैशांचा हवाला व्यवहार होऊ नये, यावर नजर ठेवण्यासाठी नाकाबंदीच्या अनुषंगाने चेकपोस्ट होते. तसेच जिल्ह्यात ३७ पथके स्थापन करण्यात आली होती.

दीड महिन्यात शहरातील भरारी पथकांनी ६६ लाख ५५ हजार रुपयांची रोकड जप्त केली होती. पैशांसह संबंधित वाहनामध्ये उमेदवार, पक्षांचे झेंडे व इतर प्रचार साहित्य आढळल्यास गुन्हा नोंदवून रक्कम जप्त करण्यात येते. आचारसंहितेच्या काळात सुमारे सोळा लाख रुपये किमतीची दारूही जप्त करण्यात आली होती. 

काही प्रकरणांत सीईओकडे झाली सुनावणी निवडणूक विभागाच्या पथकाने जप्त केलेली रक्कम कोणत्या कामासाठी वापरली जाणार होती, कुठून आली, याचे पुरावे सादर केल्यानंतरच संबंधित व्यक्तीला परत केली जाणार आहे. यासंबंधी जि. प. सीईओ पवनीत कौर यांच्याकडे काही प्रकरणांत सुनावणी झाली असून, काही प्रकरणांत सुनावणी सुरू आहे. येत्या आठ दिवसांत सर्व प्रकरणांची सुनावणी पूर्ण करून त्याचा निकाल जाहीर केला जाईल. मतमोजणीपूर्वी जप्त रकमेबाबत निर्णय घेण्यात येईल. ज्यांना रकमेचा हिशेब देता येणार नाही, त्यांची रक्कम आयकर विभागाकडे दिली जाईल. त्याबाबत पुढील कार्यवाही आयकर विभागच करील, असे सूत्रांनी सांगितले. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९aurangabad-pcऔरंगाबादMONEYपैसाElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग