शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

कशाला औरंगाबादेत जन्म घेतला...!

By admin | Updated: August 6, 2016 00:12 IST

मुजीब देवणीकर, औरंगाबाद मूलभूत सोयी-सुविधांमुळे आधीच औरंगाबादकर प्रचंड वैतागलेले असतानाच महापालिकेकडून नागरिकांना जन्म-मृत्यू प्रमाणपत्र देण्यासाठी अक्षरश: मरणयातनाच देण्यात येत आहेत.

मुजीब देवणीकर, औरंगाबादशहरातील रस्ते, पथदिवे, ड्रेनेज, पाणीपुरवठा आदी मूलभूत सोयी-सुविधांमुळे आधीच औरंगाबादकर प्रचंड वैतागलेले असतानाच महापालिकेकडून नागरिकांना जन्म-मृत्यू प्रमाणपत्र देण्यासाठी अक्षरश: मरणयातनाच देण्यात येत आहेत. वॉर्ड ‘अ’ कार्यालयात सकाळ, संध्याकाळ चकरा मारून जाम वैतागलेल्या नागरिकांचा संताप ‘कशाला औरंगाबादेत जन्म घेतला’ अशा शब्दांत उफाळून येत आहे. सत्ताधारी पक्षाच्या नगरसेवकाला स्वत:च्या जन्म प्रमाणपत्राची फक्त साक्षांकित प्रत मिळविण्यासाठी चक्क दोन महिन्यांपासून वॉर्ड कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागत आहेत.महापालिकेच्या वॉर्ड कार्यालयांमध्ये जन्म-मृत्यू प्रमाणपत्र देण्यासाठी कोणतीच सुटसुटीत पद्धत नाही. प्रत्येक वॉर्ड कार्यालयात प्रमाणपत्र देण्यासाठी संगणकावर चक्कचौथी किंवा पाचवी उत्तीर्ण असलेल्या सफाई मजुरांना बसविण्यात आले आहे. त्यांना इंग्रजी तर सोडा व्यवस्थित मराठीही लिहिता, वाचता येत नाही. सहा वॉर्ड कार्यालयांमधून दररोज १०० ते १२५ जन्म-मृत्यू प्रमाणपत्र देण्यात येतात. यामध्ये ८० टक्के प्रमाणपत्रांमध्ये चुकाच चुका असतात. एकदा देण्यात आलेल्या प्रमाणपत्रात दुरुस्ती करण्यासाठी नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. ज्या नागरिकांनी वॉर्ड कार्यालयातील ‘दलाल’ अथवा कर्मचाऱ्यांच्या हातात ठराविक रक्कम ठेवली तर दुसऱ्या तासाला पाहिजे तसे प्रमाणपत्र मिळते. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने हे प्रताप मागील अनेक वर्षांपासून राजरोसपणे सुरू आहेत.महापालिका मुख्यालयातील वॉर्ड ‘अ’कार्यालयात तर दररोज सकाळी आणि संध्याकाळी किमान शंभर ते दीडशे नागरिक एका खोलीसमोर उभे असतात. ‘लोकमत’प्रतिनिधीने नागरिकांची विचारपूस केली असता जन्म-मृत्यू प्रमाणपत्रासाठी ही झुंबड असल्याचे सांगितले. अनेक नागरिकांनी मागील पाच ते सहा महिन्यांपासून जन्म-मृत्यू प्रमाणपत्र मिळविण्यासाठी चकरा मारत असल्याचे नमूद केले. मनपाने ज्या चुका केल्या आहेत, त्या दुरुस्त करून देण्यासाठी मनपाच नकार देत असल्याचे काहींनी नमूद केले. जन्म-मृत्यू प्रमाणपत्र विभाग सांभाळणारे लिपिक जमील हे स्वत:ला मनपा आयुक्तच समजतात. एकाही नागरिकांशी त्यांचे व्यवस्थित बोलणे नाही. प्रत्येक नागरिकाच्या अर्जात कारकुनी खोड्या काढण्यात ते अत्यंत पटाईत आहेत. वॉर्ड ‘अ’ कार्यालयांतर्गत येणाऱ्या रुग्णालयांमध्ये जन्म घेतलेल्या मुलांचे प्रमाणपत्र येथे काढण्यात येते. सर्वाधिक बालक घाटीत जन्माला येतात. त्यामुळे येथे जन्म प्रमाणपत्र मिळविण्यासाठी अलोट गर्दी असते. रुग्णालयाकडून आलेले रेकॉर्ड मनपाने आपल्या रजिस्टरमध्ये नोंद ठेवणे आवश्यक असते. मागील अनेक वर्षांपासून वॉर्ड कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी रेकॉर्डच तयार केलेले नाही. रुग्णालयांकडून आलेल्या माहितीवरूनच जन्म प्रमाणपत्र बनविण्यात येते. यातील जन्म आणि मृत्यू प्रमाणपत्राचे काही रेकॉर्डच गायब असल्याची धक्कादायक माहिती काही नागरिकांनी दिली. त्यामुळे मनपा कर्मचारी प्रमाणपत्र देण्यास टाळाटाळ करीत असल्याचा आरोप नागरिकांनी केला. जमील या कर्मचाऱ्याची सखोल चौकशी करून प्रशासनाने त्यास निलंबित करावे, अशी संतप्त मागणी नागरिकांनी केली.