शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

कशाला औरंगाबादेत जन्म घेतला...!

By admin | Updated: August 6, 2016 00:12 IST

मुजीब देवणीकर, औरंगाबाद मूलभूत सोयी-सुविधांमुळे आधीच औरंगाबादकर प्रचंड वैतागलेले असतानाच महापालिकेकडून नागरिकांना जन्म-मृत्यू प्रमाणपत्र देण्यासाठी अक्षरश: मरणयातनाच देण्यात येत आहेत.

मुजीब देवणीकर, औरंगाबादशहरातील रस्ते, पथदिवे, ड्रेनेज, पाणीपुरवठा आदी मूलभूत सोयी-सुविधांमुळे आधीच औरंगाबादकर प्रचंड वैतागलेले असतानाच महापालिकेकडून नागरिकांना जन्म-मृत्यू प्रमाणपत्र देण्यासाठी अक्षरश: मरणयातनाच देण्यात येत आहेत. वॉर्ड ‘अ’ कार्यालयात सकाळ, संध्याकाळ चकरा मारून जाम वैतागलेल्या नागरिकांचा संताप ‘कशाला औरंगाबादेत जन्म घेतला’ अशा शब्दांत उफाळून येत आहे. सत्ताधारी पक्षाच्या नगरसेवकाला स्वत:च्या जन्म प्रमाणपत्राची फक्त साक्षांकित प्रत मिळविण्यासाठी चक्क दोन महिन्यांपासून वॉर्ड कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागत आहेत.महापालिकेच्या वॉर्ड कार्यालयांमध्ये जन्म-मृत्यू प्रमाणपत्र देण्यासाठी कोणतीच सुटसुटीत पद्धत नाही. प्रत्येक वॉर्ड कार्यालयात प्रमाणपत्र देण्यासाठी संगणकावर चक्कचौथी किंवा पाचवी उत्तीर्ण असलेल्या सफाई मजुरांना बसविण्यात आले आहे. त्यांना इंग्रजी तर सोडा व्यवस्थित मराठीही लिहिता, वाचता येत नाही. सहा वॉर्ड कार्यालयांमधून दररोज १०० ते १२५ जन्म-मृत्यू प्रमाणपत्र देण्यात येतात. यामध्ये ८० टक्के प्रमाणपत्रांमध्ये चुकाच चुका असतात. एकदा देण्यात आलेल्या प्रमाणपत्रात दुरुस्ती करण्यासाठी नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. ज्या नागरिकांनी वॉर्ड कार्यालयातील ‘दलाल’ अथवा कर्मचाऱ्यांच्या हातात ठराविक रक्कम ठेवली तर दुसऱ्या तासाला पाहिजे तसे प्रमाणपत्र मिळते. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने हे प्रताप मागील अनेक वर्षांपासून राजरोसपणे सुरू आहेत.महापालिका मुख्यालयातील वॉर्ड ‘अ’कार्यालयात तर दररोज सकाळी आणि संध्याकाळी किमान शंभर ते दीडशे नागरिक एका खोलीसमोर उभे असतात. ‘लोकमत’प्रतिनिधीने नागरिकांची विचारपूस केली असता जन्म-मृत्यू प्रमाणपत्रासाठी ही झुंबड असल्याचे सांगितले. अनेक नागरिकांनी मागील पाच ते सहा महिन्यांपासून जन्म-मृत्यू प्रमाणपत्र मिळविण्यासाठी चकरा मारत असल्याचे नमूद केले. मनपाने ज्या चुका केल्या आहेत, त्या दुरुस्त करून देण्यासाठी मनपाच नकार देत असल्याचे काहींनी नमूद केले. जन्म-मृत्यू प्रमाणपत्र विभाग सांभाळणारे लिपिक जमील हे स्वत:ला मनपा आयुक्तच समजतात. एकाही नागरिकांशी त्यांचे व्यवस्थित बोलणे नाही. प्रत्येक नागरिकाच्या अर्जात कारकुनी खोड्या काढण्यात ते अत्यंत पटाईत आहेत. वॉर्ड ‘अ’ कार्यालयांतर्गत येणाऱ्या रुग्णालयांमध्ये जन्म घेतलेल्या मुलांचे प्रमाणपत्र येथे काढण्यात येते. सर्वाधिक बालक घाटीत जन्माला येतात. त्यामुळे येथे जन्म प्रमाणपत्र मिळविण्यासाठी अलोट गर्दी असते. रुग्णालयाकडून आलेले रेकॉर्ड मनपाने आपल्या रजिस्टरमध्ये नोंद ठेवणे आवश्यक असते. मागील अनेक वर्षांपासून वॉर्ड कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी रेकॉर्डच तयार केलेले नाही. रुग्णालयांकडून आलेल्या माहितीवरूनच जन्म प्रमाणपत्र बनविण्यात येते. यातील जन्म आणि मृत्यू प्रमाणपत्राचे काही रेकॉर्डच गायब असल्याची धक्कादायक माहिती काही नागरिकांनी दिली. त्यामुळे मनपा कर्मचारी प्रमाणपत्र देण्यास टाळाटाळ करीत असल्याचा आरोप नागरिकांनी केला. जमील या कर्मचाऱ्याची सखोल चौकशी करून प्रशासनाने त्यास निलंबित करावे, अशी संतप्त मागणी नागरिकांनी केली.