शहरं
Join us  
Trending Stories
1
Ganesh Kale Shot Dead: गणेशची हत्या करून फरार झालेले चार आरोपी सापडले; दोघांना अटक, नावे आली समोर
2
IND vs SA Women's World Cup 2025 Final Live Streaming: फायनलमध्ये 'ही' गोष्ट ठरेल भारतासाठी जमेची बाजू
3
"वर्गात एक विद्यार्थी असेल तरी मराठीची तुकडी चालली पाहिजे", विश्वास पाटील यांची स्पष्ट भूमिका
4
Ganesh Kale: मानेत, छातीत व पोटात घुसल्या गोळ्या, पळण्याआधीच चौघांनी गणेशला संपवले; आरोपींची नावे काय?
5
IND vs AUS 3rd T20I Live Streaming : हा सामना जिंका नाहीतर मालिका विसरा! टीम इंडियाकडे शेवटची संधी
6
Satara: फलटणमध्ये आणखी एका तरुणीने संपवले आयुष्य, आंचलच्या मृत्युसाठी आईवडिलच ठरले कारण
7
निर्भिड आणि बेधडक पत्रकारितेची आज गरज; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे मत
8
Pune Crime: नाशिकच्या तरुणीवर हिंजवडीत कोयत्याने हल्ला! प्रेमप्रकरणातून तरुणाने केला जीव घेण्याचा प्रयत्न
9
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन
10
Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार
11
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
12
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी
13
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
14
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
15
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
16
IND vs SA: वनडेत द. आफ्रिकेच्या पोरींचा भारतासमोर नाही चालत जोर; पण वर्ल्डकपमध्ये समोर येतात तेव्हा...
17
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले
18
"मल्लिकार्जून खरगेंनी इतिहासातून धडा घ्यावा", आरएसएसचे दत्तात्रय होसबळे काँग्रेसच्या अध्यक्षांवर भडकले
19
चीनचा एक निर्णय अन् जागतिक बाजारात सोन्याच्या दराचं गणित बदलणार; भारतावर काय परिणाम होणार?
20
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट

शिक्षकांचेच पगार उशिरा का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 04:05 IST

योगेश पायघन औरंगाबाद : जिल्हा परिषदेकडून पगार सातत्याने उशिरा होत असल्याने शिक्षकांतून नाराजी व्यक्त होत आहे. पगार वेळेवर न ...

योगेश पायघन

औरंगाबाद : जिल्हा परिषदेकडून पगार सातत्याने उशिरा होत असल्याने शिक्षकांतून नाराजी व्यक्त होत आहे. पगार वेळेवर न झाल्याने कर्जाचे हप्ते, देणेकऱ्यांची देणी थकल्याने आर्थिक कोंडीत सापडलेल्या शिक्षक आणि सर्वच शिक्षक संघटनांतून सीएमपी प्रणालीद्वारे पगार करण्याच्या मागणीने जोर धरला आहे. त्यादृष्टीने जिल्हा परिषद प्रशासनाने सीएमपी प्रणालीने पगार करण्यासंबंधी पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.

दरवर्षी मार्च, एप्रिल, मे महिन्यात पगाराला विलंब होतो. तर दिवाळी, ईद वेळी पगार वेळेत करण्याच्या आग्रही मागण्या करूनही पगार होत नाही. त्यामुळे शिक्षकांच्या परिवारांचे आर्थिक गणित बिघडते. जिल्हा परिषदेत सर्वाधिक वेतनाचे कर्मचारी शिक्षण विभागातील आहेत. २०४० शाळांतील साडेनऊ हजार शिक्षकांचे पगार वेळेवर होण्यासाठी वित्त विभाग व शिक्षण विभागाकडे वारंवार शिक्षक संघटना निवेदने देतात. मात्र, आतापर्यंत तरी वेळेवर पगार होत नसल्याने शिक्षकांतून नाराजी व्यक्त होत आहे. सोबतचे मित्रपरिवारही शिक्षकच असल्याने तेही इच्छा असूनसुद्धा आर्थिक मदत करू शकत नाहीत. विलंबाने होणाऱ्या हप्त्यांच्या फेडीमुळे लागणाऱ्या दंडाचा आर्थिक भारही शिक्षकांनाच सोसावा लागत आहे. सध्या कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांत व्यस्त असलेल्या शिक्षकांच्या वेतनातील विलंब किमान कोरोना काळात तरी थांबवावा, अशी मागणी शिक्षकांतून होत आहे.

--

२०४०

जिल्ह्यातील जि. प. शाळा

--

९५००

एकूण शिक्षक

---

घराचे हप्ते वेळेवर कसे फेडणार?

दरमहा पगार द्यायचाच आहे. तो चुकणार नाही. मग, कशासाठी विलंब केला जातो? विलंबाला कोण जबाबदार? महिन्याच्या पहिल्या दिवशी पगार मिळाला तर शिक्षकांचे आर्थिक व्यवहार सुरळीत होतील. बँकेचे हप्ते, एलआयसी, देणेकऱ्यांची देणी दिली जातील. पैसा हाती नसेल तर सर्व पर्याय बंद होतात.

- राजेश हिवाळे, शिक्षक

इतरांकडे मदत मागण्याची वेळ येते

घरात एकच कमवती व्यक्ती तिचाच पगार जर वेळेवर आला नाही तर घराचे आर्थिक गणित कोलमडते. हक्काचा पगार वेळेवर न झाल्याने इतरांकडे मदत मागण्याची वेळ येते. पगार उशिरा झाल्याने गृहकर्ज, वाहनकर्ज, बँकेचे हप्ते, एलआयसी, सोसायटीचे हप्ते वेळेवर न भरल्यास दंडाचा भुर्दंड तर बसतो; मात्र, सिबिलवरही परिणाम होतो.

- वंदना तारो, शिक्षिका

--

प्रशासनाने लक्ष दिले पाहिजे

पगार वेळेवर न झाल्याने घर कर्ज, बँकेच्या कर्जांचे हप्ते वेळेवर भरता येत नाहीत. त्याच्या दंडाचा नाहक भुर्दंड सहन करावा लागतो. त्यासाठी वेळेवर पगार होईल याकडे प्रशासनाने लक्ष दिले पाहिजे. तसेच राष्ट्रीयीकृत बँकांत खाते सक्तीचे करून तेथे पगार झाल्यास बँकेच्या इतर सोयींचाही लाभ मिळेल.

- संतोष खेडकर, शिक्षक

---

महिन्याच्या शेवटी होतो पगार

दरवर्षी मार्च, एप्रिल, मे महिन्याच्या पगाराच्या विलंबाचा प्रश्न निर्माण होतो. या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पगार होतात. त्यामुळे देणेकरी, बँकेचे हप्ते, घरखर्च, घरभाडे, वैद्यकीय खर्चामुळे आर्थिक कोंडी निर्माण होते. सध्या कोरोनाचा काळ सुरू असल्याने त्या अडचणींत आणखी भर पडली आहे. त्यामुळे पगार महिन्याच्या पहिल्या दिवशी व्हावा. वेळेवर पगार होण्यासाठी सीएमपी प्रणालीने पगाराची मागणी सर्वच शिक्षक संघटनांच्या माध्यमातून सातत्याने होत आहे.

---

आता सीएमपी प्रणालीद्वारे पगार

फेब्रुवारीत आयकराची कपात होते. मार्चच्या पगाराचे अनुदान १५ एप्रिलच्या पुढे येते. या वेळी ऑनलाइन तांत्रिक अडचणी आल्या. त्यामुळे उशीर झाला. आता सीएमपी प्रणालीद्वारे पगारासाठी स्टेट बँक ऑफ इंडियात खाते उघडून शिक्षकांनाही तिथे खाते उघडण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे होणारा विलंब टळेल.

- सूरजप्रसाद जयस्वाल, शिक्षणाधिकारी