शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

... तेव्हा शरद पवार यांनी साधा निषेधसुद्धा का केला नाही?

By admin | Updated: August 31, 2016 00:38 IST

औरंगाबाद : अलीकडे एकट्या अहमदनगर जिल्ह्यातच दलित अत्याचाराच्या १५० हून अधिक घटना घडल्या. आजही देशभर दलितांवरील अन्याय- अत्याचाराच्या,

औरंगाबाद : अलीकडे एकट्या अहमदनगर जिल्ह्यातच दलित अत्याचाराच्या १५० हून अधिक घटना घडल्या. आजही देशभर दलितांवरील अन्याय- अत्याचाराच्या, दलित महिलांवरील बलात्काराच्या घटना घडतच आहेत. मुस्लिमांवरही अन्यायसत्र सुरुच आहे. याबाबतीत शरद पवार का बोलत नाहीत, प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन आस्थेवाईकपणे चौकशी करणे तर दूरच पण साधा निषेधही ते का करीत नाहीत? असा सवाल राज्यसभेचे काँग्रेसचे सदस्य हुसेन दलवाई यांनी उपस्थित केला. सकाळी ते पत्रकारांशी वार्तालाप करीत होते. महिला कोणत्याही जाती- धर्माची असो, ती आपली बहीण असते. तिच्यावरील अन्याय-अत्याचाराचा, बलात्काराचा निषेधच झाला पाहिजे. कोपर्डीच्या घटनेचेही कोणी समर्थन करणार नाही. सर्व दलित नेत्यांनीही निषेधच नोंदवला आहे. आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी रामदास आठवलेंपासून सर्वांनी केली आहे; परंतु सध्या राज्यभर विशिष्ट जातीचे मोर्चे काढण्याचा प्रयत्न होत आहे. मोर्चेच काढायचे तर मग सर्व जातींंना सोबत घेऊन काढा असे दलवाई यांनी सुचविले. यासंबंधात अधिक विश्लेषण करताना त्यांनी सांगितले की, अ‍ॅट्रॉसिटी कायद्यात दुरुस्ती झाली पाहिजे, असे शरद पवार म्हणतात. आज अशावेळी त्यांच्यासारख्या नेत्याने असे म्हणणे दुर्दैवी वाटले. यामुळे महाराष्ट्रातील जातीय सलोखा बिघडू शकतो, हे लक्षात घेतले पाहिजे. मराठा समाजाच्या मुलांना भडकवण्याचा हा प्रयत्न वाटतो. यामागे राजकारण तर आहेच. पण आरक्षणाचा मुद्दाही दिसतो. सत्तेचे राजकारणही यात आहेच. मराठा समाजातील आर्थिकदृष्ट्या मागासांना वंचित कुणी ठेवले? त्यांचा विकास करू नये असे कुणी म्हटले का? अ‍ॅट्रॉसिटीमध्ये काय दुरुस्ती व्हावी हेसुद्धा शरद पवार यांनी सांगितले पाहिजे. केवळ राजकारणासाठी असले मुद्दे उचलणे योग्य नाही. महाराष्ट्राच्या पुरोगामी वातावरणाला प्रतिगामी करण्याचा प्रयत्न करूनये. समाज दुभंगेल, असे काही शरद पवार यांनी करू नये. औरंगाबाद येथील हज हाऊसचे काम निधी असतानाही संथगतीने चालू आहे. आगामी रमजानपर्यंत हे काम पूर्ण झाले पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.