शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कुणाचे ओझे कुणाच्या खांद्यावर

By admin | Updated: April 5, 2016 00:46 IST

औरंगाबाद : विद्यापीठाशी संबंध नसलेल्या दोन संस्थांसाठी अर्थसंकल्पात तरतूद करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ दुसऱ्याचे ओझे

औरंगाबाद : विद्यापीठाशी संबंध नसलेल्या दोन संस्थांसाठी अर्थसंकल्पात तरतूद करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ दुसऱ्याचे ओझे आपल्या खांद्यावर वाहून नेण्याचा प्रयत्न करीत असल्याची प्रतिक्रिया विद्यापीठ वर्तुळात उमटत आहे. पैठण येथील बंद पडलेले संतपीठ विद्यापीठाने चालवावे, असा प्रस्ताव राज्याच्या सांस्कृतिक विभाग आणि उच्चशिक्षण विभागाने विद्यापीठाला दिला. दोन्ही खाती विनोद तावडे यांच्याकडे असल्याने हा प्रस्ताव विद्यापीठाने स्वीकारला. अनेकांनी विद्यापीठाच्या या भूमिकेचे स्वागतच केले आहे. मात्र, या केंद्रासाठी विद्यापीठाने आपल्या अर्थसंकल्पात तरतूद करण्याची गरज काय, असा सवाल उपस्थित होत आहे.पैठणच्या संतपीठासाठी विद्यापीठाने ५० लाखांची तरतूद केली आहे. राज्य सरकारने संतपीठासाठी सांस्कृतिक विभागाकडे असणारी आर्थिक तरतूद वळविण्यासंबंधी अद्याप विद्यापीठाला काहीही कळविलेले नाही. असे असताना केवळ राजकीय दबावापोटी विद्यापीठ संतपीठासाठी विद्यापीठाच्या फंडातून रक्कम खर्च करणार आहे. दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या नावाने राष्ट्रीय ग्रामीण विकास संशोधन संस्थेसाठी ५ कोटी एवढ्या भल्या मोठ्या रकमेची तरतूद केली आहे. मुळात विद्यापीठात मुंडे यांच्या नावाने अध्यासन केंद्राचा विचार असताना राष्ट्रीय ग्रामीण विकास संशोधन संस्थेचा २०० कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार करण्यात आला.या संस्थेसाठी राज्य सरकारने अर्थसंकल्पात एक छदामही दिला नाही. मात्र, विद्यापीठाने ५ कोटी रुपये अर्थसंकल्पात तरतूद केल्यासंदर्भात आश्चर्य व्यक्त होत आहे.निवडून आलेली सिनेट अस्तित्वात नसल्याने राजकीय दबावापोटी विद्यापीठाने ही तरतूद आपल्या अर्थसंकल्पात केली आहे. दरम्यान, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी कॉलेज टीचर्स आॅर्गनायझेशनचे (बामुक्टो) जिल्हाध्यक्ष डॉ. उमाकांत राठोड यांनी सांगितले की, गोपीनाथ मुंडे संस्थेसाठी विद्यापीठाची शंभर एकर जागा देण्यास आमचा विरोधआहे. राज्य शासनाने त्यांच्या पैशातून ही संस्था इतरत्र कोठेही उभारावी. विद्यापीठानेही अर्थसंकल्पात केलेली तरतूद रद्द करून ती रक्कम विद्यार्थी कल्याणाचे प्रकल्प राबविण्यासाठी वापरावी.