शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

या गर्दीला कोण रोखणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:04 IST

औरंगाबाद : जाधववाडीतील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आडत बाजारातील हा भाजीपाला विक्रीचा किरकोळ बाजार प्रशासनासाठी डोकेदुखी ठरत आहे. शनिवारी ...

औरंगाबाद : जाधववाडीतील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आडत बाजारातील हा भाजीपाला विक्रीचा किरकोळ बाजार प्रशासनासाठी डोकेदुखी ठरत आहे. शनिवारी अनेक आडतदुकाने बंद होती, तरीपण विक्रेत्यांनी बाजार गजबजला होता.

शहरात संचारबंदी लागू आहे, पण हा आदेश भाजीपाल्याच्या मोठ्या आडत बाजारपेठेत लागू नाही का, येथे कोरोनाची भीती संपली का, असा प्रश्न पडावा एवढी गर्दी पाहण्यास मिळत आहे.

अत्यावश्यक सेवा म्हणून भाजीपाला, फळे विक्रीला सूट देण्यात आली आहे. यामुळे अनेक बेरोजगार या व्यवसायात शिरले. शहरात भाजीपाला विक्रेत्यांची संख्या ८ ते १० हजारपर्यंत जाऊन पोहोचली आहे.

शेतकऱ्यांना भाजीपाला विक्रीसाठी दररोज बाजारात आणावा लागतो. अडत्या त्याचा लिलाव करतात व किरकोळ विक्रेते तो खरेदी करून शहरात विक्रीसाठी आणतात. ६० टक्के फळे, भाजीपाला परजिल्ह्यातून, परराज्यातून विक्रीला येतो. तर आसपासच्या ग्रामीण भागातून ४० टक्के भाजीपाला शेतकरी विक्रीला आणतात. अनेक शेतकरी थेट किरकोळ विक्रेते किंवा ग्राहकांना विकतात. विक्रेतेही शेतकऱ्यांकडून भाजीपाला खरेदी करून आडत बाजारातच अंतर्गत रस्त्यावर विक्रीसाठी बसतात. थोडा स्वस्त भाजीपाला मिळत असल्याने ग्राहकांची येथे गर्दी उसळते. एकाच वेळी १० ते १५ हजार लोक जमतात. बाजार समितीने पिवळे पट्टे मारले आहेत. मात्र, काही विक्रेते त्यानुसार बसताना दिसत नाही. प्रशासनाचे कोणतेच आदेश पाळले जात नसल्याने येथे गोंधळ उडतो. शनिवारी अनेक आडत दुकानदारांनी आपली दुकाने उघडली नाहीत. बाहेरगावावरून फळ,भाजीपाला मागविला नाही, तरी बाजारात गर्दी उसळलेली होतीच. येथे एकत्र आलेले शेकडो विक्रेते नंतर गावभर विक्री करत फिरतात. यामुळे कोरोनाचा प्रसार वेगाने होईल, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

चौकट

४१ ठिकाणी मंडी भरविण्याचा प्रयत्न फसला

जाधववाडीतील आडत बाजारात होणाऱ्या गर्दीचे विकेंद्रीकरण होण्यासाठी मनपा प्रशासनाने शहरातील ४१ ठिकाणी तात्पुरती मंडी भरविण्याचे नियोजन केले होते, पण त्यास विक्रेत्यांनी प्रतिसाद दिला नाही. यामुळे पुन्हा आडत बाजारात गर्दी होत आहे.