शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
2
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
3
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
4
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
5
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
6
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
7
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
8
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
9
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
10
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
11
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
12
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
13
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
14
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
15
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
16
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
17
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
18
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
19
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
20
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन

या गर्दीला कोण रोखणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:04 IST

औरंगाबाद : जाधववाडीतील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आडत बाजारातील हा भाजीपाला विक्रीचा किरकोळ बाजार प्रशासनासाठी डोकेदुखी ठरत आहे. शनिवारी ...

औरंगाबाद : जाधववाडीतील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आडत बाजारातील हा भाजीपाला विक्रीचा किरकोळ बाजार प्रशासनासाठी डोकेदुखी ठरत आहे. शनिवारी अनेक आडतदुकाने बंद होती, तरीपण विक्रेत्यांनी बाजार गजबजला होता.

शहरात संचारबंदी लागू आहे, पण हा आदेश भाजीपाल्याच्या मोठ्या आडत बाजारपेठेत लागू नाही का, येथे कोरोनाची भीती संपली का, असा प्रश्न पडावा एवढी गर्दी पाहण्यास मिळत आहे.

अत्यावश्यक सेवा म्हणून भाजीपाला, फळे विक्रीला सूट देण्यात आली आहे. यामुळे अनेक बेरोजगार या व्यवसायात शिरले. शहरात भाजीपाला विक्रेत्यांची संख्या ८ ते १० हजारपर्यंत जाऊन पोहोचली आहे.

शेतकऱ्यांना भाजीपाला विक्रीसाठी दररोज बाजारात आणावा लागतो. अडत्या त्याचा लिलाव करतात व किरकोळ विक्रेते तो खरेदी करून शहरात विक्रीसाठी आणतात. ६० टक्के फळे, भाजीपाला परजिल्ह्यातून, परराज्यातून विक्रीला येतो. तर आसपासच्या ग्रामीण भागातून ४० टक्के भाजीपाला शेतकरी विक्रीला आणतात. अनेक शेतकरी थेट किरकोळ विक्रेते किंवा ग्राहकांना विकतात. विक्रेतेही शेतकऱ्यांकडून भाजीपाला खरेदी करून आडत बाजारातच अंतर्गत रस्त्यावर विक्रीसाठी बसतात. थोडा स्वस्त भाजीपाला मिळत असल्याने ग्राहकांची येथे गर्दी उसळते. एकाच वेळी १० ते १५ हजार लोक जमतात. बाजार समितीने पिवळे पट्टे मारले आहेत. मात्र, काही विक्रेते त्यानुसार बसताना दिसत नाही. प्रशासनाचे कोणतेच आदेश पाळले जात नसल्याने येथे गोंधळ उडतो. शनिवारी अनेक आडत दुकानदारांनी आपली दुकाने उघडली नाहीत. बाहेरगावावरून फळ,भाजीपाला मागविला नाही, तरी बाजारात गर्दी उसळलेली होतीच. येथे एकत्र आलेले शेकडो विक्रेते नंतर गावभर विक्री करत फिरतात. यामुळे कोरोनाचा प्रसार वेगाने होईल, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

चौकट

४१ ठिकाणी मंडी भरविण्याचा प्रयत्न फसला

जाधववाडीतील आडत बाजारात होणाऱ्या गर्दीचे विकेंद्रीकरण होण्यासाठी मनपा प्रशासनाने शहरातील ४१ ठिकाणी तात्पुरती मंडी भरविण्याचे नियोजन केले होते, पण त्यास विक्रेत्यांनी प्रतिसाद दिला नाही. यामुळे पुन्हा आडत बाजारात गर्दी होत आहे.