शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत ठाकरे बंधू युतीत शरद पवारांची राष्ट्रवादी सहभागी होणार?; २२ जागांचा देणार प्रस्ताव
2
नोकरी बदलणाऱ्यांना EPFO चा मोठा दिलासा! 'ब्रेक'बाबतचे नियम बदलले; आता शनिवार-रविवारची सुट्टी अडथळा ठरणार नाही
3
दादरमध्ये अजब प्रकार, एक तरुण या इमारतीवरुन त्या इमारतीवर मारतोय उड्या; पोलिसांची दमछाक
4
अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिनामध्ये जेट विमानाचा अपघात; संपूर्ण कुटुंबच उद्ध्वस्त
5
'...तर त्यांचा एक हात तोडून दुसऱ्या हातात दिला असता'; इम्तियाज जलील मंत्री संजय निषाद यांच्यावर संतापले
6
डेमोक्रेट्सच्या खासदारांनी जारी केले एपस्टीनचे ६८ नवीन फोटो; महिलेसोबत दिसले बिल गेट्स
7
मुंबई विमानतळाची गोपनीय माहिती चोरट्यांच्या हाती; ऐरोलीतील घटना : अदानी ग्रुपच्या मॅनेजरचा लॅपटॉप चोरीला
8
मी सर्वांसमोर तिला चुकीच्या पद्धतीने का किस करेल? ट्रोल झाल्यावर राकेश बेदींनी दिलं स्पष्टीकरण
9
उस्मान हादी यांच्या मृत्यूनंतर बांग्लादेश पेटला, कट्टरपंथांनी भारताचे नाव घेतले; शेख हसीना यांच्या सरकारला हादीनेच दिले होते हादरे
10
राज्यातील पहिले 'जेन झी टपाल' आयआयटी मुंबईत; कार्यालयामध्ये नवीन सुविधांसह डिजिटल सेवा
11
'या' कंपनीच्या गुंतवणूकदारांना ₹५५,५५० कोटींपेक्षा अधिकचा फटका; १६ महिन्यांत स्टॉक ८० टक्क्यांनी आपटला
12
'राहुल गांधींचं काम केलं, तुमचं नाही केलं तर लोक म्हणतील...'; नितीन गडकरींनी प्रियंका गांधींना खाऊ घातली स्पेशल डिश
13
Vijay Mallya : देशातून फरार, पण लंडनमध्ये मात्र जोरदार सेलिब्रेशन; ललित मोदीच्या घरी झाली विजय माल्ल्याची जंगी बर्थ डे पार्टी
14
आज होणार धमाका! महिलेच्या शरीरावर कांदबरीतील ओळीचं लिखाण, १८ वर्षीय मुलीचा इतका 'रेट' लावला
15
कोकाटेंचा राजीनामा स्वीकारला; सदनिका घोटाळ्यात अटक वॉरंट निघताच आधी खाती काढून घेतली अन् आता…
16
संपादकीय : सरकारच्या प्रतिमेचे काय? डागाळलेली प्रतिमा अन् सत्तेची अपरिहार्यता
17
विखुरलेले विरोधक : भाजपचा कॅल्क्युलेटर ऑन! भावनिक लाट ओसरली, आता गणिताची लढाई!
18
बांगलादेशात मोठा गोंधळ! बंडखोरांचा नेता हादी यांचा मृत्यू; दंगली उसळल्या, लोकांनी तोडफोड आणि जाळपोळ केली सुरू
19
"छापा नाही, केवळ रुटीन व्हेरिफिकेशन...", शिल्पा शेट्टीच्या वकिलांनी छापेमारीचं वृत्त फेटाळलं
20
आजचे राशीभविष्य, १९ डिसेंबर २०२५: आर्थिक लाभ होईल, कार्यालयात संघर्ष किंवा मतभेदाचे प्रसंग येतील
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादच्या कच-याचा प्रश्न कोण सोडवणार ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2018 00:15 IST

शहरातील कचरा कोंडीचा प्रश्न महापालिकेला मागील सहा दिवसांमध्ये सोडविता आला नाही. मेटाकुटीला आलेल्या मनपाने बुधवारी याप्रश्नी तोडगा काढावा म्हणून शासनालाच विनंती केली. राज्य शासनानेही त्वरित विभागीय आयुक्तांना सूचना देऊन युद्धपातळीवर कच-याचा प्रश्न सोडवावा, अशा सूचना दिल्या. रात्री उशिरा मनपा, महसूल आणि पोलीस प्रशासनाचे एक पथक नारेगाव येथे आंदोलनकर्त्यांसोबत चर्चा करण्यासाठी पोहोचले. आंदोलनकर्त्यांनी विभागीय आयुक्तांच्या पथकासमोरही आंदोलन मागे घेण्यास नकार दिला.

ठळक मुद्देकच-याचा विषय शासन दरबारी

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : शहरातील कचरा कोंडीचा प्रश्न महापालिकेला मागील सहा दिवसांमध्ये सोडविता आला नाही. मेटाकुटीला आलेल्या मनपाने बुधवारी याप्रश्नी तोडगा काढावा म्हणून शासनालाच विनंती केली. राज्य शासनानेही त्वरित विभागीय आयुक्तांना सूचना देऊन युद्धपातळीवर कच-याचा प्रश्न सोडवावा, अशा सूचना दिल्या. रात्री उशिरा मनपा, महसूल आणि पोलीस प्रशासनाचे एक पथक नारेगाव येथे आंदोलनकर्त्यांसोबत चर्चा करण्यासाठी पोहोचले. आंदोलनकर्त्यांनी विभागीय आयुक्तांच्या पथकासमोरही आंदोलन मागे घेण्यास नकार दिला. मात्र, उद्या नारेगावात कचरा टाकण्यात येणार असल्याचे अल्टिमेटम आंदोलकांना देण्यात आले.१६ फेब्रुवारीपासून नारेगाव भागातील शेतकºयांनी कचरा डेपो हटाव, या मुख्य मागणीसाठी आंदोलन सुरू केले आहे. मागील सहा दिवसांमध्ये शहरातील कचºयाचे एकही ट्रक नारेगावात गेले नाही. शहरात जवळपास २४०० मेट्रिक टन कचरा पडून आहे. मनपाने विविध वसाहतींमधून उचलेला कचरा मध्यवर्ती जकात नाका येथे आणून टाकण्यात येत आहे. येथेही आता प्रचंड दुर्गंधी सुटली आहे. बुधवारी महापौर नंदकुमार घोडेले यांनी पालकमंत्री डॉ.दीपक सावंत यांना कचरा प्रश्नाची वस्तुस्थिती सांगितली. त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे हा निरोप पोहोचवला. त्यानंतर विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांना या प्रकरणात लक्ष घालण्याचे आदेश शासनाने दिले. सायंकाळी पाच वाजता विभागीय आयुक्तांकडे एका व्यापक बैठकीचे आयोजन केले होते. बैठकीत नारेगाव येथील आंदोलकांसोबत एकदा चर्चा करण्याचा निर्णय घेण्यात आला. विभागीय आयुक्तांनी आंदोलकांसोबत चर्चा करण्यासाठी सहा जणांचे शिष्टमंडळ नेमले. यामध्ये मनपाचे कार्यकारी अभियंता सिकंदर अली, डी.पी. कुलकर्णी, उपविभागीय आधिकारी शशिकांत हदगल, अप्पर तहसीलदार रमेश मुंडलोड, तहसीलदार सतीश सोनी यांचा समावेश होता. शिष्टमंडळ रात्री उशिरा नारेगाव येथे आंदोलकांसोबत चर्चा करण्यासाठी गेले. त्यांनी कचºयावर प्रक्रिया करण्यासाठी यंत्रसामुग्री उभारण्यासाठी दोन महिने लागणार आहेत. तोपर्यंत मुभा द्यावी, अशी विनंती केली. आंदोलकांनी ही विनंती फेटाळून लावली.