शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादच्या कच-याचा प्रश्न कोण सोडवणार ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2018 00:15 IST

शहरातील कचरा कोंडीचा प्रश्न महापालिकेला मागील सहा दिवसांमध्ये सोडविता आला नाही. मेटाकुटीला आलेल्या मनपाने बुधवारी याप्रश्नी तोडगा काढावा म्हणून शासनालाच विनंती केली. राज्य शासनानेही त्वरित विभागीय आयुक्तांना सूचना देऊन युद्धपातळीवर कच-याचा प्रश्न सोडवावा, अशा सूचना दिल्या. रात्री उशिरा मनपा, महसूल आणि पोलीस प्रशासनाचे एक पथक नारेगाव येथे आंदोलनकर्त्यांसोबत चर्चा करण्यासाठी पोहोचले. आंदोलनकर्त्यांनी विभागीय आयुक्तांच्या पथकासमोरही आंदोलन मागे घेण्यास नकार दिला.

ठळक मुद्देकच-याचा विषय शासन दरबारी

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : शहरातील कचरा कोंडीचा प्रश्न महापालिकेला मागील सहा दिवसांमध्ये सोडविता आला नाही. मेटाकुटीला आलेल्या मनपाने बुधवारी याप्रश्नी तोडगा काढावा म्हणून शासनालाच विनंती केली. राज्य शासनानेही त्वरित विभागीय आयुक्तांना सूचना देऊन युद्धपातळीवर कच-याचा प्रश्न सोडवावा, अशा सूचना दिल्या. रात्री उशिरा मनपा, महसूल आणि पोलीस प्रशासनाचे एक पथक नारेगाव येथे आंदोलनकर्त्यांसोबत चर्चा करण्यासाठी पोहोचले. आंदोलनकर्त्यांनी विभागीय आयुक्तांच्या पथकासमोरही आंदोलन मागे घेण्यास नकार दिला. मात्र, उद्या नारेगावात कचरा टाकण्यात येणार असल्याचे अल्टिमेटम आंदोलकांना देण्यात आले.१६ फेब्रुवारीपासून नारेगाव भागातील शेतकºयांनी कचरा डेपो हटाव, या मुख्य मागणीसाठी आंदोलन सुरू केले आहे. मागील सहा दिवसांमध्ये शहरातील कचºयाचे एकही ट्रक नारेगावात गेले नाही. शहरात जवळपास २४०० मेट्रिक टन कचरा पडून आहे. मनपाने विविध वसाहतींमधून उचलेला कचरा मध्यवर्ती जकात नाका येथे आणून टाकण्यात येत आहे. येथेही आता प्रचंड दुर्गंधी सुटली आहे. बुधवारी महापौर नंदकुमार घोडेले यांनी पालकमंत्री डॉ.दीपक सावंत यांना कचरा प्रश्नाची वस्तुस्थिती सांगितली. त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे हा निरोप पोहोचवला. त्यानंतर विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांना या प्रकरणात लक्ष घालण्याचे आदेश शासनाने दिले. सायंकाळी पाच वाजता विभागीय आयुक्तांकडे एका व्यापक बैठकीचे आयोजन केले होते. बैठकीत नारेगाव येथील आंदोलकांसोबत एकदा चर्चा करण्याचा निर्णय घेण्यात आला. विभागीय आयुक्तांनी आंदोलकांसोबत चर्चा करण्यासाठी सहा जणांचे शिष्टमंडळ नेमले. यामध्ये मनपाचे कार्यकारी अभियंता सिकंदर अली, डी.पी. कुलकर्णी, उपविभागीय आधिकारी शशिकांत हदगल, अप्पर तहसीलदार रमेश मुंडलोड, तहसीलदार सतीश सोनी यांचा समावेश होता. शिष्टमंडळ रात्री उशिरा नारेगाव येथे आंदोलकांसोबत चर्चा करण्यासाठी गेले. त्यांनी कचºयावर प्रक्रिया करण्यासाठी यंत्रसामुग्री उभारण्यासाठी दोन महिने लागणार आहेत. तोपर्यंत मुभा द्यावी, अशी विनंती केली. आंदोलकांनी ही विनंती फेटाळून लावली.