शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

औरंगाबादच्या कच-याचा प्रश्न कोण सोडवणार ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2018 00:15 IST

शहरातील कचरा कोंडीचा प्रश्न महापालिकेला मागील सहा दिवसांमध्ये सोडविता आला नाही. मेटाकुटीला आलेल्या मनपाने बुधवारी याप्रश्नी तोडगा काढावा म्हणून शासनालाच विनंती केली. राज्य शासनानेही त्वरित विभागीय आयुक्तांना सूचना देऊन युद्धपातळीवर कच-याचा प्रश्न सोडवावा, अशा सूचना दिल्या. रात्री उशिरा मनपा, महसूल आणि पोलीस प्रशासनाचे एक पथक नारेगाव येथे आंदोलनकर्त्यांसोबत चर्चा करण्यासाठी पोहोचले. आंदोलनकर्त्यांनी विभागीय आयुक्तांच्या पथकासमोरही आंदोलन मागे घेण्यास नकार दिला.

ठळक मुद्देकच-याचा विषय शासन दरबारी

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : शहरातील कचरा कोंडीचा प्रश्न महापालिकेला मागील सहा दिवसांमध्ये सोडविता आला नाही. मेटाकुटीला आलेल्या मनपाने बुधवारी याप्रश्नी तोडगा काढावा म्हणून शासनालाच विनंती केली. राज्य शासनानेही त्वरित विभागीय आयुक्तांना सूचना देऊन युद्धपातळीवर कच-याचा प्रश्न सोडवावा, अशा सूचना दिल्या. रात्री उशिरा मनपा, महसूल आणि पोलीस प्रशासनाचे एक पथक नारेगाव येथे आंदोलनकर्त्यांसोबत चर्चा करण्यासाठी पोहोचले. आंदोलनकर्त्यांनी विभागीय आयुक्तांच्या पथकासमोरही आंदोलन मागे घेण्यास नकार दिला. मात्र, उद्या नारेगावात कचरा टाकण्यात येणार असल्याचे अल्टिमेटम आंदोलकांना देण्यात आले.१६ फेब्रुवारीपासून नारेगाव भागातील शेतकºयांनी कचरा डेपो हटाव, या मुख्य मागणीसाठी आंदोलन सुरू केले आहे. मागील सहा दिवसांमध्ये शहरातील कचºयाचे एकही ट्रक नारेगावात गेले नाही. शहरात जवळपास २४०० मेट्रिक टन कचरा पडून आहे. मनपाने विविध वसाहतींमधून उचलेला कचरा मध्यवर्ती जकात नाका येथे आणून टाकण्यात येत आहे. येथेही आता प्रचंड दुर्गंधी सुटली आहे. बुधवारी महापौर नंदकुमार घोडेले यांनी पालकमंत्री डॉ.दीपक सावंत यांना कचरा प्रश्नाची वस्तुस्थिती सांगितली. त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे हा निरोप पोहोचवला. त्यानंतर विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांना या प्रकरणात लक्ष घालण्याचे आदेश शासनाने दिले. सायंकाळी पाच वाजता विभागीय आयुक्तांकडे एका व्यापक बैठकीचे आयोजन केले होते. बैठकीत नारेगाव येथील आंदोलकांसोबत एकदा चर्चा करण्याचा निर्णय घेण्यात आला. विभागीय आयुक्तांनी आंदोलकांसोबत चर्चा करण्यासाठी सहा जणांचे शिष्टमंडळ नेमले. यामध्ये मनपाचे कार्यकारी अभियंता सिकंदर अली, डी.पी. कुलकर्णी, उपविभागीय आधिकारी शशिकांत हदगल, अप्पर तहसीलदार रमेश मुंडलोड, तहसीलदार सतीश सोनी यांचा समावेश होता. शिष्टमंडळ रात्री उशिरा नारेगाव येथे आंदोलकांसोबत चर्चा करण्यासाठी गेले. त्यांनी कचºयावर प्रक्रिया करण्यासाठी यंत्रसामुग्री उभारण्यासाठी दोन महिने लागणार आहेत. तोपर्यंत मुभा द्यावी, अशी विनंती केली. आंदोलकांनी ही विनंती फेटाळून लावली.