शहरं
Join us  
Trending Stories
1
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
2
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
3
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
4
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
5
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
6
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
7
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त
8
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
9
तुमचा गॅस एजन्सीवाला चांगली सेवा देत नाही? मोबाईल सिमप्रमाणे आता LPG गॅस कंपनी बदला
10
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
11
गर्दीवर दगडफेक, पोलिसांकडून लाठीमार, करूरमधील चेंगराचेंगरीबाबत विजयच्या पक्षाला वेगळाच संशय, केली अशी मागणी 
12
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
13
Triptii Dimri : "आयुष्यात रोमान्स करण्यासाठी..."; करोडपती बिझनेसमनच्या प्रेमात आहे अभिनेत्री, गुपचूप करतेय डेट?
14
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
15
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
16
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
17
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
18
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न
19
"सरकार मायबाप… आता कसं जगायचं?", अतिवृष्टीने हिरवी स्वप्नं चुराडली; राहेरीतील शेतकऱ्यांचा हंबरडा
20
प्रणितकडे इशारा करत वरुण धवन म्हणाला, 'इसने मेरा भी मजाक उडाया है!', कॉमेडियन म्हणतो...

औरंगाबादच्या कच-याचा प्रश्न कोण सोडवणार ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2018 00:15 IST

शहरातील कचरा कोंडीचा प्रश्न महापालिकेला मागील सहा दिवसांमध्ये सोडविता आला नाही. मेटाकुटीला आलेल्या मनपाने बुधवारी याप्रश्नी तोडगा काढावा म्हणून शासनालाच विनंती केली. राज्य शासनानेही त्वरित विभागीय आयुक्तांना सूचना देऊन युद्धपातळीवर कच-याचा प्रश्न सोडवावा, अशा सूचना दिल्या. रात्री उशिरा मनपा, महसूल आणि पोलीस प्रशासनाचे एक पथक नारेगाव येथे आंदोलनकर्त्यांसोबत चर्चा करण्यासाठी पोहोचले. आंदोलनकर्त्यांनी विभागीय आयुक्तांच्या पथकासमोरही आंदोलन मागे घेण्यास नकार दिला.

ठळक मुद्देकच-याचा विषय शासन दरबारी

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : शहरातील कचरा कोंडीचा प्रश्न महापालिकेला मागील सहा दिवसांमध्ये सोडविता आला नाही. मेटाकुटीला आलेल्या मनपाने बुधवारी याप्रश्नी तोडगा काढावा म्हणून शासनालाच विनंती केली. राज्य शासनानेही त्वरित विभागीय आयुक्तांना सूचना देऊन युद्धपातळीवर कच-याचा प्रश्न सोडवावा, अशा सूचना दिल्या. रात्री उशिरा मनपा, महसूल आणि पोलीस प्रशासनाचे एक पथक नारेगाव येथे आंदोलनकर्त्यांसोबत चर्चा करण्यासाठी पोहोचले. आंदोलनकर्त्यांनी विभागीय आयुक्तांच्या पथकासमोरही आंदोलन मागे घेण्यास नकार दिला. मात्र, उद्या नारेगावात कचरा टाकण्यात येणार असल्याचे अल्टिमेटम आंदोलकांना देण्यात आले.१६ फेब्रुवारीपासून नारेगाव भागातील शेतकºयांनी कचरा डेपो हटाव, या मुख्य मागणीसाठी आंदोलन सुरू केले आहे. मागील सहा दिवसांमध्ये शहरातील कचºयाचे एकही ट्रक नारेगावात गेले नाही. शहरात जवळपास २४०० मेट्रिक टन कचरा पडून आहे. मनपाने विविध वसाहतींमधून उचलेला कचरा मध्यवर्ती जकात नाका येथे आणून टाकण्यात येत आहे. येथेही आता प्रचंड दुर्गंधी सुटली आहे. बुधवारी महापौर नंदकुमार घोडेले यांनी पालकमंत्री डॉ.दीपक सावंत यांना कचरा प्रश्नाची वस्तुस्थिती सांगितली. त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे हा निरोप पोहोचवला. त्यानंतर विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांना या प्रकरणात लक्ष घालण्याचे आदेश शासनाने दिले. सायंकाळी पाच वाजता विभागीय आयुक्तांकडे एका व्यापक बैठकीचे आयोजन केले होते. बैठकीत नारेगाव येथील आंदोलकांसोबत एकदा चर्चा करण्याचा निर्णय घेण्यात आला. विभागीय आयुक्तांनी आंदोलकांसोबत चर्चा करण्यासाठी सहा जणांचे शिष्टमंडळ नेमले. यामध्ये मनपाचे कार्यकारी अभियंता सिकंदर अली, डी.पी. कुलकर्णी, उपविभागीय आधिकारी शशिकांत हदगल, अप्पर तहसीलदार रमेश मुंडलोड, तहसीलदार सतीश सोनी यांचा समावेश होता. शिष्टमंडळ रात्री उशिरा नारेगाव येथे आंदोलकांसोबत चर्चा करण्यासाठी गेले. त्यांनी कचºयावर प्रक्रिया करण्यासाठी यंत्रसामुग्री उभारण्यासाठी दोन महिने लागणार आहेत. तोपर्यंत मुभा द्यावी, अशी विनंती केली. आंदोलकांनी ही विनंती फेटाळून लावली.