शहरं
Join us  
Trending Stories
1
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
2
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
3
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
4
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
5
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
6
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
7
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
8
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
9
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
11
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
12
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
13
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
14
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
15
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
16
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
17
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
18
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
19
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
20
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...

खासगी हॉस्पिटलमध्ये दिलेल्या व्हेंटिलेटरचे ऑडिट करणार कोण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 04:04 IST

औरंगाबाद : पंतप्रधान सहायता निधीतून औरंगाबाद जिल्ह्यासाठी आलेल्या व्हेंटिलेटरचा मुद्दा सध्या गाजतो आहे. हे व्हेंटिलेटर निकृष्ट की उत्कृष्ट, यावरून ...

औरंगाबाद : पंतप्रधान सहायता निधीतून औरंगाबाद जिल्ह्यासाठी आलेल्या व्हेंटिलेटरचा मुद्दा सध्या गाजतो आहे. हे व्हेंटिलेटर निकृष्ट की उत्कृष्ट, यावरून जोरदार राजकारण पेटले असून, सरकारी व्हेंटिलेटर खासगी हॉस्पिटलला दिले, त्याचे ऑडिट कसे आणि कोण करणार, असा नवीन मुद्दा आता समोर आला आहे.

विशेष म्हणजे खासगी हॉस्पिटल्सने त्या व्हेंटिलेटरचे बिल रुग्णांकडे किती आकारले, बिलात त्याची नोंद आहे की नाही, हे देखील तपासण्याची गरज आता निर्माण झाली आहे.

विभागीय प्रशासनातील वरिष्ठ सुत्रांनी सांगितले, १५० व्हेंटिलेटर केंद्र शासनाकडून आल्यानंतर त्यातील ५५ व्हेंटिलेटर विभागात देण्यासाठी स्वत: घाटी प्रशासनानेच तयारी दर्शवली. विभागात काही ठिकाणी ते व्हेंटिलेटर गरजेचे होते, म्हणून ते उपलब्ध करून देणे हा काही गुन्हा नाही. शासनाची यंत्रणा शासनाने वापरल्यास काही हरकत नाही. परंतु, स्थानिक पातळीवर व्हेंटिलेटर देण्याबाबत आमचा काहीही संबंध नाही.

ते व्हेंटिलेटर विभागीय प्रशासनाने पाहिलेले नाहीत. घाटीला व्हेंटिलेटर आल्यावर अधिष्ठातांनी जास्तीचे व्हेंटिलेटर आहेत, कुणाला द्यायचे असतील तर द्या. ५५ व्हेंटिलेटर विभागात जिल्ह्यांना दिले. विभागीय आयुक्तांनी याबाबत स्वत: मागणी केलेली नाही. परंतु, विभागीय प्रशासनाला ते देण्याचा अधिकार आहे.

खासगी हॉस्पिटल्स कोरोना रुग्णांकडून जास्तीचे बिल आकारत असल्यामुळे त्यांना नोटीस देण्यात येत आहे. परंतु, त्यात व्हेंटिलेटर कोणते वापरले, याबाबत काहीही तपासणी केली जात नाही. दरम्यान, विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी प्रकरणात काहीही ठोस प्रतिक्रिया दिली नाही.

व्हेंटिलेटरवर कुणाचे उपचार केले याचे ऑडिट व्हावे

खासदार इम्तियाज जलील म्हणाले, एमजीएम, एशियन हॉस्पिटल, पॅसिफिक, सिग्मा आदी हॉस्पिटल्सना व्हेंटिलेटर दिले आहेत. तसेच नवीन काही कोविड हॉस्पिटल्सनादेखील देण्यात आले. या व्हेंटिलेटरने गरीब आणि गरजू कोरोना रुग्णांवर उपचार केले आहेत की नाहीत, हे तपासण्यासाठी प्रशासनाकडे कोणतीही यंत्रणा नाही. जिल्हाधिकारी, घाटी, मनपा यापैकी कोणत्याही यंत्रणेने यासाठी प्रयत्न केलेले नाहीत. याचे ऑडिट झाले पाहिजे. नेमके हे व्हेंटिलेटर कोणासाठी वापरले जात आहेत. त्यावर उपचार करणाऱ्या रुग्णांकडून बिलात पैसे आकारले जात आहेत. हे पूर्वीच होणे गरजेचे होते. परंतु, लोकप्रतिनिधींनी हा मुद्दा उपस्थित केल्यानंतर सगळे समोर आले. घाटीच्या अधिष्ठातांना याबाबत जबाबदार धरण्यात येईल. त्या खुलेआम सांगत आहेत की, व्हेंटिलेटर उघडले नाहीत ते काही कामाचे नाहीत. पीएम केअर फंडाव्यतिरिक्त इतर व्हेंटिलेटर आले होते. ते कुठे गेले, हे देखील समोर आले पाहिजे. घाटीची क्षमता १३० व्हेंटिलेटरची आहे, तेथे ३०० व्हेंटिलेटर बसवले जाऊ शकत नाहीत. त्यामुळे सर्वानुमते याचा विचार होणे गरजेचे होते.