शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

‘व्हीव्हीपॅट’ यंत्रावर दिसणार कोणाला मतदान केले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2018 22:52 IST

आगामी लोकसभा निवडणुकीत ‘ईव्हीएम’सह ‘व्हीव्हीपॅट’ यंत्राद्वारे मतदान प्रक्रिया राबविली जाणार आहे. आपण कोणाला मतदान केले ते लगेच ‘व्हीव्हीपॅट’ यंत्रावर सात सेकंद मतदारास दिसणार आहे.

ठळक मुद्देनिवडणुकीतील पारदर्शकता : मुख्य निवडणूक अधिकारी अश्वनीकुमार यांनी घेतला आढावा

औरंगाबाद : आगामी लोकसभा निवडणुकीत ‘ईव्हीएम’सह ‘व्हीव्हीपॅट’ यंत्राद्वारे मतदान प्रक्रिया राबविली जाणार आहे. आपण कोणाला मतदान केले ते लगेच ‘व्हीव्हीपॅट’ यंत्रावर सात सेकंद मतदारास दिसणार आहे. या यंत्राची प्रात्यक्षिके ग्रामीण तसेच शहरी भागांत करून त्यासंबंधीची व्यापक जनजागृती करावी, असे निर्देश प्रधान सचिव तथा राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी अश्वनीकुमार यांनी आज येथे दिले.अश्वनीकुमार यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी विभागीय आयुक्त कार्यालयात लोकसभा निवडणूक तयारीसंदर्भात आढावा बैठक झाली. या बैठकीस सहमुख्य निवडणूक अधिकारी अनिल वळवी, एस.एस. बोरकर, विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांच्यासह विभागातील आठही जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थिती होते. यावेळी त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना काही सूचना केल्या.यावेळी अश्वनीकुमार यांनी निवडणूक प्रक्रिया निर्भय व पारदर्शक वातावरणात पार पडण्यासाठी प्रशासनाने कटाक्षाने काम करणे आवश्यक असून, आगामी लोकसभा निवडणूक ही ईव्हीएमसह व्हीव्हीपॅट यंत्राद्वारे होणार आहे. मतदारांना पारदर्शक मतदानाचा अनुभव देणाºया या यंत्रामुळे मतदान प्रक्रियेची विश्वासहार्हता वाढणार आहे. त्यामुळे या यंत्राबाबत व्यापक जनजागृती करावी. अचूक व गुणवत्तापूर्ण मतदान होण्यासाठी सर्व पात्र मतदारांना मतदानाचा हक्क बजावता येईल, यादृष्टीने मतदार यादी शुद्धीकरण दर्जेदार होण्यास प्राधान्य द्यावे. विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत मतदार यादी शुद्धीकरण कार्यक्रम जिल्ह्यात राबविण्यात आला असून, त्यातून अद्ययावत केलेल्या प्राथमिक मतदार याद्यांची तपासणी मतदान केंद्र अधिकारी (बीएलओ) आणि राजकीय पक्षांच्या मतदान केंद्र प्रतिनिधींमार्फत करून सर्वार्थाने निर्दोष मतदार यादी तयार होईल, याकडे लक्ष द्यावे, अशा सूचना दिल्या.बीएलओंनी घरोघरी जाऊन केलेल्या मतदार नोंदणी प्रक्रियेत त्यावेळी ज्या मतदारांची नोंदणी राहून गेली असेल, त्यांच्या नावांची नोंदणी मतदार यादीत कटाक्षाने करून घ्यावी. उपविभागीय आणि तहसील स्तरावर बीएलओ आणि बीएलए यांच्या बैठका घेऊन मतदार यादी तपासणी लवकरात लवकर करून घ्यावी. मतदान केंद्रांवरील सुविधांबाबत तपासणी करून आवश्यक सुविधांची उपलब्धता होण्याच्या दृष्टीने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.चौकटमयत मतदारांच्या स्वतंत्र नोंदीमतदारांना ओळखपत्रांचे वाटप झाले आहे का, याची खातरजमा करून घ्यावी. दुबार नोंदणी झालेल्या मतदारांची त्रुटी दूर करणे, मयत आणि कायम स्थलांतरित मतदारांची नोंद ठेवणे, दिव्यांग मतदारांची नोंदणी अधिकाधिक करण्यावर भर देणे, दिव्यांग मतदारांची नावे चिन्हांकित करणे, अयोग्य आणि अस्पष्ट छायाचित्रांची दुरुस्ती करणे आदींचा आढावा घेत राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी अश्वनीकुमार यांनी ही कामे काळजीपूर्वक करण्याच्या सूचना अधिकाºयांना दिल्या.

टॅग्स :ElectionनिवडणूकAurangabad collector officeजिल्हाधिकारी कार्यालय औरंगाबाद