शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूरमध्ये ८ विमाने पडली'; 'टॅरिफ'ने भारत-पाक युद्ध थांबवल्याचा ट्रम्प यांचा नवा गौप्यस्फोट
2
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
3
“शेतकऱ्यांना मोफत नको म्हणणाऱ्या अजित पवारांना फुकटात जमिनी लाटण्याचा भस्म्या”: काँग्रेस
4
एकनाथ शिंदेंचा अजितदादांना धक्का! २५ सरपंच, पदाधिकाऱ्यांसह बड्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश
5
राजस्थानमध्ये पकडला गेला 'ओसामा'; इंटरनेट कॉलिंगवर ४ वर्षांपासून होता अफगाणिस्तानातील दहशतवाद्यांच्या संपर्कात
6
राणेंच्या काॅलेजमध्ये MBBS प्रवेशासाठी मागितले ९ लाख रुपये, CETने दिले चाैकशीचे आदेश
7
३ राजयोगात कार्तिक संकष्ट चतुर्थी: ८ राशींवर बाप्पा-धनलक्ष्मी कृपा; पैसा-पदोन्नती-भाग्योदय!
8
अग्रलेख: लोकशाहीवरच प्रश्नचिन्ह! एच-फाईल्स अन् निवडणूक प्रक्रियेवरील विश्वासालाच तडा
9
गंगर कन्स्ट्रक्शनवर १०० कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल; एकच फ्लॅट दोघांना विकला!
10
हास्यास्पद खर्चमर्यादा अन् पैशांची उधळपट्टी... आगामी निवडणुकांमध्ये रंगणार वर्चस्वाची लढाई
11
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
12
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
13
तोपर्यंत 'त्या' नागरिकाला मतदानाचा अधिकार नाही; युवतीच्या अर्जावर ६ आठवड्यांत निर्णय घ्या!
14
नेरळ-माथेरान मिनी ट्रेनचे इंजिन पुन्हा धडधडले; मोठ्यांसह बच्चेकंपनी खूश; वेळापत्रकही जाहीर
15
शिंदेसेनेला अंगावर घेणारे भाजपाचे आमदार संजय केळकर निवडणूक प्रमुख; महायुतीची शक्यता दुरावली
16
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
17
शिंदेसेना-भाजपचे परस्परांना युती तोडून टाकण्याचे आव्हान; दोन्ही गटांची एकमेकांवर टीकास्त्र
18
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
19
येत्या ११ नोव्हेंबरला प्रभागात कोणाची लागणार लॉटरी? मुंबईकरांसह सर्वपक्षीय नगरसेवकांचे लक्ष
20
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास

पाण्याचे टॅँकर ही गरज कोणाची, सर्वसामान्यांची की राजकारण्यांची?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:02 IST

मुजीब देवणीकर औरंगाबाद : मागील दोन दशकांमध्ये शहर चारही दिशांनी प्रचंड वाढले. वाढत्या लोकसंख्येला पाणी कमी पडू लागले तरी ...

मुजीब देवणीकर

औरंगाबाद : मागील दोन दशकांमध्ये शहर चारही दिशांनी प्रचंड वाढले. वाढत्या लोकसंख्येला पाणी कमी पडू लागले तरी मनपा प्रशासनाने नवीन जलकुंभ, जलवाहिन्या टाकल्या नाहीत. त्यामुळे शहरातील दोनशेपेक्षा अधिक वसाहती आज पाण्याविना आहेत. या वसाहतींना टॅँकरद्वारे पाणी देण्याचे धोरण आठ वर्षांपूर्वी स्वीकारण्यात आले. एक प्रकारे ही राजकीय मंडळींचीच सोय होती. कारण ठेका राजकीय मंडळींनाच देण्यात आला. टॅँकरद्वारे होणाऱ्या पाणीपुरवठ्यावर दरवर्षी मनपा तब्बल ५ कोटी रुपये खर्च करीत आहे.

पाण्यासारखा पैसा खर्च करूनही अनेक वसाहतींना पाणी मिळत नाही. आठ दिवसांतून एकदा एक ड्रम पाणी देण्यात येते. संबंधित नागरिकाने मनपाकडे ॲडव्हान्समध्ये पाण्याचे पैसे भरलेले असतील तरच पाणी देण्यात येते. एका कुटुंबाला एक ड्रम पाणी दिल्याने काय साध्य होते? याचा विचार मनपाने केला नाही. गोरगरीब नागरिकांनी पैसे भरले नाहीत, तर त्यांना पाणी दिले जात नाही. विरोधी आणि सत्ताधारी पक्षातील मंडळी मिळून पाणीपुरवठ्याचा ठेका चालवत होते. सत्ताधारी पक्षातील मंडळींनी नातेवाइकांच्या नावावर ठेका मिळविला आहे.

शहराला लागणारे टॅँकर व खर्च

२०१८- टँकर फेऱ्या - १,६४,२५०- खर्च- ४.७० कोटी

२०१९- टॅँकर फेऱ्या- १,५५, ४६७- खर्च -५ कोटी

२०२०- टँकर फेऱ्या- १,७०,६७०- खर्च- ५.५० कोटी

२०२१- टँकर फेऱ्या- ८५,३२,३२३ खर्च- ६ कोटी

टँकरचे पाणी कोणासाठी?

गुंठेवारी वसाहती, जिथे पाण्याची सोय नाही, तेथील लोकांसाठी टँकरची कल्याणकारी योजना सुरू केली. राजकीय मंडळींनी ठेका घेणे हेसुद्धा चुकीचेच आहे; पण अलीकडे जिथे नळाने पाणीपुरवठा होतो तेथेही टॅँकरने पाणी देण्यात येत असल्याचे निदर्शनास येत आहे. हे चुकीचे आहे. मनपाचे पाणी फिल्टर केलेले व महाग असते. त्याचा वापर फक्त पिण्यासाठीच झाला पाहिजे.

-नंदकुमार घोडेले, माजी महापौर

पाण्याचा मोठा आर्थिक घोटाळा

टॅँकरद्वारे पाणीपुरवठा करणारा एक मोठा घोटाळा आहे. कोट्यवधी रुपयांची कमाई काही मंडळी टँकरच्या माध्यमातून करीत आहे. मंगल कार्यालये, रुग्णालये, ढाबे आदी व्यावसायिक ठिकाणी दररोज लाखो रुपयांच्या पाण्याची विक्री होते. त्यामुळे शहराला आठ ते दहा दिवसांनंतर पाणीपुरवठा होतोय. हा ठेका मिळविण्यापूर्वी सत्ताधारी आघाडीवर होते. आता तर पालकमंत्र्यांपर्यंत विषय गेला होता.

-नासेर सिद्दीकी, माजी विरोधी पक्षनेता

टँकरचे पाणी कुठे मुरते?

टॅँकरद्वारे गोरगरीब नागरिकांना आम्ही पिण्यासाठी पाणी देतोय हे थोतांड आहे. गुंठेवारीतील कोणत्याही वसाहतीत जाऊन शहनिशा केली, तर मनपाच्या कंत्राटदाराची मनमानी, कर्मचाऱ्यांचा मस्तवालपणा निदर्शनास येईल. ५० रुपये ड्रमद्वारे अक्षरश: पाण्याची विक्री केली जाते. महापालिकेचा एकही अधिकारी, कर्मचारी, राजकीय मंडळी त्यांच्यावर कारवाई करीत नाही. गोरगरिबांना एवढे पैसे देऊन पाणी घेणे परवडत नाही.

-गणेश बनकर, विश्रांतीनगर

पहाटे शहराबाहेर महापालिकेचे टँकर कशासाठी जातात. शहराबाहेर पहाटे कोणत्या वसाहतींना पाणीपुरवठा होतो. याचे उत्तर महापालिकेने द्यायला हवे. मागील अनेक वर्षांपासून पाण्याचा अक्षरश: काळाबाजार सुरू आहे. महापालिका प्रशासन, सत्ताधारी सर्व मूग गिळून गप्प का? आहेत.

-राहुल जाधव, जाधववाडी