शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Best Bus Accident: भांडुपमध्ये भीषण अपघात! रिव्हर्स घेताना 'बेस्ट' बसनं प्रवाशांना चिरडलं; ४ जण ठार, ९ जखमी
2
Nashik: नाशिकमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेसेना एकत्र लढणार; भाजपचं काय?
3
TMC: ठाण्यात महायुतीचं जागावाटप फायनल; शिंदेसेना ८७ तर भाजप ४० जागा लढणार!
4
शिवीगाळ, दमदाटी, धक्काबुक्की...;  एबी फॉर्मवरून काँग्रेस कार्यालयात कार्यकर्त्यांमध्ये राडा!
5
Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये शिंदेसेनेची महायुतीकडं पाठ, स्वबळावर लढणार, गणित कुठं बिघडलं?
6
 Mira Bhayandar: भाजपच्या 'त्या' निर्णयामुळे आमदारपुत्र तकशील मेहतांची उमेदवारी धोक्यात!
7
Municipal Election: भाजपचा मोठा निर्णय; मंत्री, खासदार आणि आमदारांच्या नातेवाईकांना महापालिकेचं तिकीट नाही!
8
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
9
तीन कोटींचा विमा आणि सरकारी नोकरीसाठी मुलाने रचला भयंकर कट, वडिलांना सर्पदंश करवला, त्यानंतर...
10
संभाजीनगरात 'हायव्होल्टेज' ड्रामा; जंजाळांच्या डोळ्यात अश्रू, शिरसाटांच्या घराबाहेर कार्यकर्ते जमा
11
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
12
BMC Elections: किशोरी पेडणेकर यांना अखेर एबी फॉर्म मिळाला; उमेदवारी मिळताच ठाकरेंची रणरागिनी गरजली!
13
जेवणावळीत ऐनवेळी भात संपला, संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी मिळेल त्यावर ताव मारला, व्हिडीओ व्हायरल  
14
पॉलिटिकल 'स्टेटस' ठेवाल तर सरकारी नोकरी गमावून बसाल ! कर्मचाऱ्यांसाठी काय नियम ?
15
वर्षानुवर्षे द्वेष मनात विषासारखा पेरला जातो..; एंजेल चकमाच्या मृत्यूवर राहुल-अखिलेश संतापले
16
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
17
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
18
Kishori Pednekar: अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
19
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
20
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
Daily Top 2Weekly Top 5

पाण्याचे टॅँकर ही गरज कोणाची, सर्वसामान्यांची की राजकारण्यांची?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:02 IST

मुजीब देवणीकर औरंगाबाद : मागील दोन दशकांमध्ये शहर चारही दिशांनी प्रचंड वाढले. वाढत्या लोकसंख्येला पाणी कमी पडू लागले तरी ...

मुजीब देवणीकर

औरंगाबाद : मागील दोन दशकांमध्ये शहर चारही दिशांनी प्रचंड वाढले. वाढत्या लोकसंख्येला पाणी कमी पडू लागले तरी मनपा प्रशासनाने नवीन जलकुंभ, जलवाहिन्या टाकल्या नाहीत. त्यामुळे शहरातील दोनशेपेक्षा अधिक वसाहती आज पाण्याविना आहेत. या वसाहतींना टॅँकरद्वारे पाणी देण्याचे धोरण आठ वर्षांपूर्वी स्वीकारण्यात आले. एक प्रकारे ही राजकीय मंडळींचीच सोय होती. कारण ठेका राजकीय मंडळींनाच देण्यात आला. टॅँकरद्वारे होणाऱ्या पाणीपुरवठ्यावर दरवर्षी मनपा तब्बल ५ कोटी रुपये खर्च करीत आहे.

पाण्यासारखा पैसा खर्च करूनही अनेक वसाहतींना पाणी मिळत नाही. आठ दिवसांतून एकदा एक ड्रम पाणी देण्यात येते. संबंधित नागरिकाने मनपाकडे ॲडव्हान्समध्ये पाण्याचे पैसे भरलेले असतील तरच पाणी देण्यात येते. एका कुटुंबाला एक ड्रम पाणी दिल्याने काय साध्य होते? याचा विचार मनपाने केला नाही. गोरगरीब नागरिकांनी पैसे भरले नाहीत, तर त्यांना पाणी दिले जात नाही. विरोधी आणि सत्ताधारी पक्षातील मंडळी मिळून पाणीपुरवठ्याचा ठेका चालवत होते. सत्ताधारी पक्षातील मंडळींनी नातेवाइकांच्या नावावर ठेका मिळविला आहे.

शहराला लागणारे टॅँकर व खर्च

२०१८- टँकर फेऱ्या - १,६४,२५०- खर्च- ४.७० कोटी

२०१९- टॅँकर फेऱ्या- १,५५, ४६७- खर्च -५ कोटी

२०२०- टँकर फेऱ्या- १,७०,६७०- खर्च- ५.५० कोटी

२०२१- टँकर फेऱ्या- ८५,३२,३२३ खर्च- ६ कोटी

टँकरचे पाणी कोणासाठी?

गुंठेवारी वसाहती, जिथे पाण्याची सोय नाही, तेथील लोकांसाठी टँकरची कल्याणकारी योजना सुरू केली. राजकीय मंडळींनी ठेका घेणे हेसुद्धा चुकीचेच आहे; पण अलीकडे जिथे नळाने पाणीपुरवठा होतो तेथेही टॅँकरने पाणी देण्यात येत असल्याचे निदर्शनास येत आहे. हे चुकीचे आहे. मनपाचे पाणी फिल्टर केलेले व महाग असते. त्याचा वापर फक्त पिण्यासाठीच झाला पाहिजे.

-नंदकुमार घोडेले, माजी महापौर

पाण्याचा मोठा आर्थिक घोटाळा

टॅँकरद्वारे पाणीपुरवठा करणारा एक मोठा घोटाळा आहे. कोट्यवधी रुपयांची कमाई काही मंडळी टँकरच्या माध्यमातून करीत आहे. मंगल कार्यालये, रुग्णालये, ढाबे आदी व्यावसायिक ठिकाणी दररोज लाखो रुपयांच्या पाण्याची विक्री होते. त्यामुळे शहराला आठ ते दहा दिवसांनंतर पाणीपुरवठा होतोय. हा ठेका मिळविण्यापूर्वी सत्ताधारी आघाडीवर होते. आता तर पालकमंत्र्यांपर्यंत विषय गेला होता.

-नासेर सिद्दीकी, माजी विरोधी पक्षनेता

टँकरचे पाणी कुठे मुरते?

टॅँकरद्वारे गोरगरीब नागरिकांना आम्ही पिण्यासाठी पाणी देतोय हे थोतांड आहे. गुंठेवारीतील कोणत्याही वसाहतीत जाऊन शहनिशा केली, तर मनपाच्या कंत्राटदाराची मनमानी, कर्मचाऱ्यांचा मस्तवालपणा निदर्शनास येईल. ५० रुपये ड्रमद्वारे अक्षरश: पाण्याची विक्री केली जाते. महापालिकेचा एकही अधिकारी, कर्मचारी, राजकीय मंडळी त्यांच्यावर कारवाई करीत नाही. गोरगरिबांना एवढे पैसे देऊन पाणी घेणे परवडत नाही.

-गणेश बनकर, विश्रांतीनगर

पहाटे शहराबाहेर महापालिकेचे टँकर कशासाठी जातात. शहराबाहेर पहाटे कोणत्या वसाहतींना पाणीपुरवठा होतो. याचे उत्तर महापालिकेने द्यायला हवे. मागील अनेक वर्षांपासून पाण्याचा अक्षरश: काळाबाजार सुरू आहे. महापालिका प्रशासन, सत्ताधारी सर्व मूग गिळून गप्प का? आहेत.

-राहुल जाधव, जाधववाडी