शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
2
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
3
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
4
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
5
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
6
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!
7
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!
8
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
9
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
10
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
11
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
12
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
13
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
14
पंकज भोयर वर्धेबरोबरच भंडाऱ्याचेही पालकमंत्री, सावकारे यांची बुलढाण्याचे सहपालकमंत्रीपदी नियुक्ती
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
16
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
17
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
18
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
19
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
20
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ

पाण्याचे टॅँकर ही गरज कोणाची, सर्वसामान्यांची की राजकारण्यांची?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:02 IST

मुजीब देवणीकर औरंगाबाद : मागील दोन दशकांमध्ये शहर चारही दिशांनी प्रचंड वाढले. वाढत्या लोकसंख्येला पाणी कमी पडू लागले तरी ...

मुजीब देवणीकर

औरंगाबाद : मागील दोन दशकांमध्ये शहर चारही दिशांनी प्रचंड वाढले. वाढत्या लोकसंख्येला पाणी कमी पडू लागले तरी मनपा प्रशासनाने नवीन जलकुंभ, जलवाहिन्या टाकल्या नाहीत. त्यामुळे शहरातील दोनशेपेक्षा अधिक वसाहती आज पाण्याविना आहेत. या वसाहतींना टॅँकरद्वारे पाणी देण्याचे धोरण आठ वर्षांपूर्वी स्वीकारण्यात आले. एक प्रकारे ही राजकीय मंडळींचीच सोय होती. कारण ठेका राजकीय मंडळींनाच देण्यात आला. टॅँकरद्वारे होणाऱ्या पाणीपुरवठ्यावर दरवर्षी मनपा तब्बल ५ कोटी रुपये खर्च करीत आहे.

पाण्यासारखा पैसा खर्च करूनही अनेक वसाहतींना पाणी मिळत नाही. आठ दिवसांतून एकदा एक ड्रम पाणी देण्यात येते. संबंधित नागरिकाने मनपाकडे ॲडव्हान्समध्ये पाण्याचे पैसे भरलेले असतील तरच पाणी देण्यात येते. एका कुटुंबाला एक ड्रम पाणी दिल्याने काय साध्य होते? याचा विचार मनपाने केला नाही. गोरगरीब नागरिकांनी पैसे भरले नाहीत, तर त्यांना पाणी दिले जात नाही. विरोधी आणि सत्ताधारी पक्षातील मंडळी मिळून पाणीपुरवठ्याचा ठेका चालवत होते. सत्ताधारी पक्षातील मंडळींनी नातेवाइकांच्या नावावर ठेका मिळविला आहे.

शहराला लागणारे टॅँकर व खर्च

२०१८- टँकर फेऱ्या - १,६४,२५०- खर्च- ४.७० कोटी

२०१९- टॅँकर फेऱ्या- १,५५, ४६७- खर्च -५ कोटी

२०२०- टँकर फेऱ्या- १,७०,६७०- खर्च- ५.५० कोटी

२०२१- टँकर फेऱ्या- ८५,३२,३२३ खर्च- ६ कोटी

टँकरचे पाणी कोणासाठी?

गुंठेवारी वसाहती, जिथे पाण्याची सोय नाही, तेथील लोकांसाठी टँकरची कल्याणकारी योजना सुरू केली. राजकीय मंडळींनी ठेका घेणे हेसुद्धा चुकीचेच आहे; पण अलीकडे जिथे नळाने पाणीपुरवठा होतो तेथेही टॅँकरने पाणी देण्यात येत असल्याचे निदर्शनास येत आहे. हे चुकीचे आहे. मनपाचे पाणी फिल्टर केलेले व महाग असते. त्याचा वापर फक्त पिण्यासाठीच झाला पाहिजे.

-नंदकुमार घोडेले, माजी महापौर

पाण्याचा मोठा आर्थिक घोटाळा

टॅँकरद्वारे पाणीपुरवठा करणारा एक मोठा घोटाळा आहे. कोट्यवधी रुपयांची कमाई काही मंडळी टँकरच्या माध्यमातून करीत आहे. मंगल कार्यालये, रुग्णालये, ढाबे आदी व्यावसायिक ठिकाणी दररोज लाखो रुपयांच्या पाण्याची विक्री होते. त्यामुळे शहराला आठ ते दहा दिवसांनंतर पाणीपुरवठा होतोय. हा ठेका मिळविण्यापूर्वी सत्ताधारी आघाडीवर होते. आता तर पालकमंत्र्यांपर्यंत विषय गेला होता.

-नासेर सिद्दीकी, माजी विरोधी पक्षनेता

टँकरचे पाणी कुठे मुरते?

टॅँकरद्वारे गोरगरीब नागरिकांना आम्ही पिण्यासाठी पाणी देतोय हे थोतांड आहे. गुंठेवारीतील कोणत्याही वसाहतीत जाऊन शहनिशा केली, तर मनपाच्या कंत्राटदाराची मनमानी, कर्मचाऱ्यांचा मस्तवालपणा निदर्शनास येईल. ५० रुपये ड्रमद्वारे अक्षरश: पाण्याची विक्री केली जाते. महापालिकेचा एकही अधिकारी, कर्मचारी, राजकीय मंडळी त्यांच्यावर कारवाई करीत नाही. गोरगरिबांना एवढे पैसे देऊन पाणी घेणे परवडत नाही.

-गणेश बनकर, विश्रांतीनगर

पहाटे शहराबाहेर महापालिकेचे टँकर कशासाठी जातात. शहराबाहेर पहाटे कोणत्या वसाहतींना पाणीपुरवठा होतो. याचे उत्तर महापालिकेने द्यायला हवे. मागील अनेक वर्षांपासून पाण्याचा अक्षरश: काळाबाजार सुरू आहे. महापालिका प्रशासन, सत्ताधारी सर्व मूग गिळून गप्प का? आहेत.

-राहुल जाधव, जाधववाडी