शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
3
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
4
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
5
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
6
ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
7
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
8
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
9
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
10
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
11
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
12
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
13
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
14
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
15
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
16
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
17
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
18
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
19
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
20
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद

मनपाने वसूल केलेला कर जातोय कुणीकडे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:02 IST

औरंगाबाद : नगरसेवकपद गेल्यानंतर सातारा- देवळाईत मनपाने कोणतेही नवीन काम सुरू केले नाही. राज्य शासनाकडून मंजूर कामेच सुरू आहेत. ...

औरंगाबाद : नगरसेवकपद गेल्यानंतर सातारा- देवळाईत मनपाने कोणतेही नवीन काम सुरू केले नाही. राज्य शासनाकडून मंजूर कामेच सुरू आहेत. मग वसूल केलेला कर जातोय कुणीकडे, असा सवाल नागरिकांतून उपस्थित होत आहे.

सातारा- देवळाईचा विकास व्हावा म्हणून परिसर मनपात विलीन करण्यात आला होता. त्यानुसार काहीही निर्णयात्मक काम झालेली नसल्याने निराशा झालेली आहे. दोन्ही वॉर्डांतील विविध कॉलन्यांतील नागरिकांना मूलभूत सेवासुविधादेखील मनपाने उपलब्ध करून दिलेल्या नाहीत. शासनाने मंजूर केलेल्या योजनेतूनच रस्ते, पाणी, तसेच ड्रेनेजलाइनचे काम हाती घेतले आहे. कराच्या रूपाने सिडकोकडील साडेआठ कोटींच्या निधीतून मोजकेच रस्ते तयार करण्यात आले. त्यानंतर मनपाने कोणतेच विकासकाम हाती घेतले नाही.

मनपाला कार्यालयासाठी जागा सापडेना...

मनपा आयुक्तांनी सातारा- देवळाई वॉर्ड कार्यालयास भेट दिली. त्यावेळी रोडवर कार्यालयासाठी जागा शोधण्यास परवानगी दिली आहे. जागेचा शोध सुरू आहे; परंतु अद्याप प्रशस्त जागा मिळालेली नाही. ही शोकांतिका असून, वॉर्डातील विकासकामे कधी करणार, असा सवाल उपस्थित होत आहे.

मग कामे कधी?

जी कामे सुरू आहेत, ती राज्य शासनाच्या निधीतून असून, परिसरातील विकासकामांकडे दुर्लक्ष केले जात आहे. मनपावर प्रशासकीय कारभार आहे; परंतु स्मार्ट सिटीत सातारा- देवळाई परिसर दुर्लक्षित ठेवलेला आहे.

-सायली जमादार (माजी नगरसेविका)

साधे उद्यानही फुलविले नाही

सातारा- देवळाई परिसरात बालकांसाठी उद्यान विकसित करण्यासाठी मनपाने संग्रामनगरलगत मोकळ्या जागेची निवड केली होती, तेथे साधे एक झाडदेखील लावण्यात आलेले नाही. विकासकामे करणार कधी.

-प्रा. भारती भांडेकर

स्वत:चा निधी वापरणार कधी?

सातारा- देवळाई परिसरात मनपा आहे की नाही, असाच प्रश्न नागरिकांना पडलेला आहे. कचरा सफाई वगळता विकासकामात कोणताही सहभाग मनपाने घेतलेला नाही. कराच्या रूपाने जमा होणारा पैसा सातारा- देवळाईत का वापरत नाहीत, असा सवाल रमेश बाहुले, सोमीनाथ सिराणे, जमील पटेल, नामदेव बाजड आदींनी उपस्थित केला आहे.