शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
2
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
3
Nashik: शिंदेंचा घाव, ठाकरेंच्या शिवसेनेला पडलं भगदाड! उरले फक्त नऊ माजी नगरसेवक
4
एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
5
सोन्याचे दर घसरले, पण चांदीचा विक्रम; किंमत १ लाख १२ हजारांवर; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट रेट
6
"आता वेळ आलीय..."; लोकप्रिय अभिनेत्रीसोबत मोठा स्कॅम, स्टायलिस्ट सांगून फसवलं
7
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
8
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
9
जिवंत रुग्णाला मृत घोषित केले; डॉक्टरांकडे महापालिकेने मागितला खुलासा
10
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक
11
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
12
सोने सोडा चांदीमध्येही बंपर कमाईची संधी! पुढील ६ महिन्यांत किंमत दुप्पट होणार? कोणी केला दावा?
13
केदारनाथ यात्रेला निघालेले भाविक दरीत कोसळले; दोघांचा मृत्यू, तीन जखमी
14
...तर पाकिस्तानातील अण्वस्त्र ठिकाणे उद्ध्वस्त झाली असती; इस्त्रायलची ऑफर भारताने का नाकारली?
15
पुणे, चंद्रपूर, नंदूरबार, धाराशिव; शरद पवार गट, उद्धवसेनेला खिंडार, माजी नगरसेवक शिंदे गटात
16
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
17
Mukesh Ambani : मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
18
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
19
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
20
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर

पांढऱ्या सोन्यावर बळीराजाचा पुन्हा ‘सट्टा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2018 00:35 IST

मका, मूग, बाजरीत घट : तालुक्यात ६० टक्के पेरणी; नुकसान होऊनही कपाशीचा पेरा वाढला

मोबीन खानवैजापूर : तालुक्यात यंदाच्या खरीप हंगामात ८१ हजार २२ हेक्टर (६० टक्के) क्षेत्रावर पेरणी झाली आहे. गेल्या वर्षी बोंडअळीमुळे तालुक्यातील शंभर टक्के कपाशीचे क्षेत्र उद्ध्वस्त झाले होते. त्यामुळे कपाशीच्या पेºयात मोठी घट होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. मात्र, तसे न होता बळीराजाने पांढºया सोन्यावर पुन्हा सर्वाधिक सट्टा लावला आहे, तर मका, मूग, बाजरीच्या क्षेत्रात घट झाल्याची माहिती तालुका कृषि अधिकाºयांनी दिली.तालुक्यात यंदा खरीपाचे सरासरी क्षेत्र १ लाख ३५ हजार ५६९ हेक्टर आहे. जूनच्या पहिल्या पंधरवड्यात झालेल्या पावसानंतर तसेच त्यानंतर पडलेल्या खंडानंतर आलेल्या पावसानंतर तालुक्यातील शेतकºयांनी पेरणी सुरू केली. ४ जुलैपर्यंत तालुक्यातील वैजापूर ( ९६७३), लासूरगाव (२३५२), लाडगाव (५९६८), महालगाव ( ९९५१ ), खंडाळा (१२९४१ ), शिऊर (१०१५०), गारज (६६५६), नागमठाण (२७५६), बोरसर (७८००), लोणी (१२७६४) अशा सर्व दहा महसुली मंडळात एकूण ८१ हजार २२ हेक्टरवर म्हणजेच सरासरी क्षेत्राच्या ६० टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. यंदा कपाशीच्या क्षेत्रात वाढ झाली आहे. मका, मूग, बाजरीच्या क्षेत्रात घट झाली आहे. कपाशीची लागवड ५१ हजार ६४८ हेक्टर, मक्याची २१ हजार १९८ हेक्टर, बाजरी ३ हजार २९३ हेक्टर, सोयाबीन २९३ हेक्टर, भुईमुग १३४७ हेक्टर, मूग १५२८ हेक्टर, उडीद ४३ हेक्टर, तूर २४४ हेक्टर पेरणी क्षेत्राचा समावेश आहे.पावसाअभावी दुबार पेरणीचे संकटमृग नक्षत्राच्या सुरुवातीला बरसलेल्या जोरदार पावसाने आता मात्र दडी मारल्याने तालुक्यावर दुबार पेरणीच्या संकटाचे सावट आहे. तालुक्यात आतापर्यंत सुमारे ६० टक्के क्षेत्रावर पेरणी झाली असून, पावसाने ओढ दिल्याने ती वाया जाण्याचा धोका आहे. यामुळे तालुक्यातील चिंतातूर शेतकरी आभाळाकडे डोळे लावून बसले आहेत. पावसाअभावी अनेक मंडळातील पिकांनी माना टाकल्या आहेत. महालगाव, खंडाळा, शिऊर, लोणी मंडळात दुबार पेरणीशिवाय शेतकºयांपुढे दुसरा पर्याय नाही. तालुक्यात ६० टक्के पेरणी झाल्याची नोंद कृषि विभागाच्या दरबारी आहे. उर्वरित ४० टक्यांच्या ठिकाणी न झालेल्या पेरण्या आणि पाऊस रुसल्याने खुंटलेली पिकांची वाढ यामुळे शेतकरी चिंताग्रस्त आहे. गारज व लासूरगाव परिसरात पावसाअभावी पेरण्या ठप्प पडल्या आहेत.धरणे अजूनही कोरडेचतालुक्यात दहा ठिकाणी लघु व मध्यम प्रकल्प आहेत. मात्र पावसाला एक महिना उलटूनही बहुतांश धरणे मृत साठ्यातच जमा असल्याचे दिसते.नारंगी सारंगी प्रकल्प, जरूळ लघु तलाव, गाढेपिंपळगाव, सटाणा, खंडाळा, बिलोणी, बोरदहेगाव, वांजरगाव हे लघु तलाव कोरडेच असून मन्याड साठवण तलावात ३४.३३ टक्के, कोल्ही मध्यम प्रकल्पात ७.३ टक्के पाणी आहे.मंडळनिहाय झालेला पाऊसवैजापूर -१०३ मि.मी.खंडाळा -४८ मि.मी.शिऊर -९६ मि.मी.लोणी -५८ मि.मी.गारज -४९ मि.मी.नागमठाण -८० मि.मी.बोरसर-६४ मि.मी.महालगाव -१३१ मि.मी.लाड़गाव -१०७ मि.मी.लासूरगाव -६७ मि.मी.पावसाने दडी दिल्याने तालुक्यात केवळ ६० टक्के पेरण्या झाल्या असून ४० टक्के पेरण्या थांबल्या आहेत. यंदा तालुक्यात शेतकºयांनी पुन्हा ५१ हजार हेक्टरवर कपाशीची लागवड करुन पांढºया सोन्यावर विश्वास दाखविला आहे.-अनिल कुलकर्णी, तालुका कृषी अधिकारी

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रcottonकापूस