शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
3
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
4
'त्या प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
5
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
6
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
7
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
8
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
9
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
10
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
11
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
12
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
13
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
14
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
15
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
16
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
17
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
18
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
19
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
20
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

पांढऱ्या सोन्यावर बळीराजाचा पुन्हा ‘सट्टा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2018 00:35 IST

मका, मूग, बाजरीत घट : तालुक्यात ६० टक्के पेरणी; नुकसान होऊनही कपाशीचा पेरा वाढला

मोबीन खानवैजापूर : तालुक्यात यंदाच्या खरीप हंगामात ८१ हजार २२ हेक्टर (६० टक्के) क्षेत्रावर पेरणी झाली आहे. गेल्या वर्षी बोंडअळीमुळे तालुक्यातील शंभर टक्के कपाशीचे क्षेत्र उद्ध्वस्त झाले होते. त्यामुळे कपाशीच्या पेºयात मोठी घट होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. मात्र, तसे न होता बळीराजाने पांढºया सोन्यावर पुन्हा सर्वाधिक सट्टा लावला आहे, तर मका, मूग, बाजरीच्या क्षेत्रात घट झाल्याची माहिती तालुका कृषि अधिकाºयांनी दिली.तालुक्यात यंदा खरीपाचे सरासरी क्षेत्र १ लाख ३५ हजार ५६९ हेक्टर आहे. जूनच्या पहिल्या पंधरवड्यात झालेल्या पावसानंतर तसेच त्यानंतर पडलेल्या खंडानंतर आलेल्या पावसानंतर तालुक्यातील शेतकºयांनी पेरणी सुरू केली. ४ जुलैपर्यंत तालुक्यातील वैजापूर ( ९६७३), लासूरगाव (२३५२), लाडगाव (५९६८), महालगाव ( ९९५१ ), खंडाळा (१२९४१ ), शिऊर (१०१५०), गारज (६६५६), नागमठाण (२७५६), बोरसर (७८००), लोणी (१२७६४) अशा सर्व दहा महसुली मंडळात एकूण ८१ हजार २२ हेक्टरवर म्हणजेच सरासरी क्षेत्राच्या ६० टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. यंदा कपाशीच्या क्षेत्रात वाढ झाली आहे. मका, मूग, बाजरीच्या क्षेत्रात घट झाली आहे. कपाशीची लागवड ५१ हजार ६४८ हेक्टर, मक्याची २१ हजार १९८ हेक्टर, बाजरी ३ हजार २९३ हेक्टर, सोयाबीन २९३ हेक्टर, भुईमुग १३४७ हेक्टर, मूग १५२८ हेक्टर, उडीद ४३ हेक्टर, तूर २४४ हेक्टर पेरणी क्षेत्राचा समावेश आहे.पावसाअभावी दुबार पेरणीचे संकटमृग नक्षत्राच्या सुरुवातीला बरसलेल्या जोरदार पावसाने आता मात्र दडी मारल्याने तालुक्यावर दुबार पेरणीच्या संकटाचे सावट आहे. तालुक्यात आतापर्यंत सुमारे ६० टक्के क्षेत्रावर पेरणी झाली असून, पावसाने ओढ दिल्याने ती वाया जाण्याचा धोका आहे. यामुळे तालुक्यातील चिंतातूर शेतकरी आभाळाकडे डोळे लावून बसले आहेत. पावसाअभावी अनेक मंडळातील पिकांनी माना टाकल्या आहेत. महालगाव, खंडाळा, शिऊर, लोणी मंडळात दुबार पेरणीशिवाय शेतकºयांपुढे दुसरा पर्याय नाही. तालुक्यात ६० टक्के पेरणी झाल्याची नोंद कृषि विभागाच्या दरबारी आहे. उर्वरित ४० टक्यांच्या ठिकाणी न झालेल्या पेरण्या आणि पाऊस रुसल्याने खुंटलेली पिकांची वाढ यामुळे शेतकरी चिंताग्रस्त आहे. गारज व लासूरगाव परिसरात पावसाअभावी पेरण्या ठप्प पडल्या आहेत.धरणे अजूनही कोरडेचतालुक्यात दहा ठिकाणी लघु व मध्यम प्रकल्प आहेत. मात्र पावसाला एक महिना उलटूनही बहुतांश धरणे मृत साठ्यातच जमा असल्याचे दिसते.नारंगी सारंगी प्रकल्प, जरूळ लघु तलाव, गाढेपिंपळगाव, सटाणा, खंडाळा, बिलोणी, बोरदहेगाव, वांजरगाव हे लघु तलाव कोरडेच असून मन्याड साठवण तलावात ३४.३३ टक्के, कोल्ही मध्यम प्रकल्पात ७.३ टक्के पाणी आहे.मंडळनिहाय झालेला पाऊसवैजापूर -१०३ मि.मी.खंडाळा -४८ मि.मी.शिऊर -९६ मि.मी.लोणी -५८ मि.मी.गारज -४९ मि.मी.नागमठाण -८० मि.मी.बोरसर-६४ मि.मी.महालगाव -१३१ मि.मी.लाड़गाव -१०७ मि.मी.लासूरगाव -६७ मि.मी.पावसाने दडी दिल्याने तालुक्यात केवळ ६० टक्के पेरण्या झाल्या असून ४० टक्के पेरण्या थांबल्या आहेत. यंदा तालुक्यात शेतकºयांनी पुन्हा ५१ हजार हेक्टरवर कपाशीची लागवड करुन पांढºया सोन्यावर विश्वास दाखविला आहे.-अनिल कुलकर्णी, तालुका कृषी अधिकारी

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रcottonकापूस