शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
2
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
3
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
4
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
5
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
6
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
7
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
8
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
9
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
10
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
11
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
12
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
13
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
14
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
15
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
16
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
17
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
18
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
19
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
20
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
Daily Top 2Weekly Top 5

सीटी गेस्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:02 IST

जिल्हा परिषदेच्या हजारो शाळांतून लाखो विद्यार्थी शिकतात. त्यांचे भवितव्य घडवण्यासाठी शासन, प्रशासन, शिक्षक विविध अभिनव उपक्रम राबवितात. त्यामुळे खेड्यापाड्यातील ...

जिल्हा परिषदेच्या हजारो शाळांतून लाखो विद्यार्थी शिकतात. त्यांचे भवितव्य घडवण्यासाठी शासन, प्रशासन, शिक्षक विविध अभिनव उपक्रम राबवितात. त्यामुळे खेड्यापाड्यातील वाडीवस्तीवरील मुलेही यशाची शिखरे गाठतात. मात्र, त्याचा कुठेही गवगवा होत नाही. जिल्हा परिषदेच्या शाळांत शिकणाऱ्या मुलांत कुठेतरी इथे शिकण्याचा न्यूनगंड जाणवतो. तो नाहीसा करून मुलांचे मनोबल वाढवण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. मंगेश गोंदावले यांनी माजी विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी अभिनव उपक्रम हाती घेतला आहे.

जिल्हा परिषद आपल्या शाळांचा, शिक्षणाचा दर्जा वाढावा यासाठी मेहनत घेत असते. परंतु येथे शिक्षणाऱ्या मुलांना साधनांच्या कमतरतेबरोबरच आणखी एका गोष्टीची कमतरता जाणवते. ती म्हणजे आत्मविश्वास आणि या न्यूनगंडाचे महत्त्वाचे कारण म्हणजे जिल्हा परिषद शाळांचा कोणताही ब्रँड नाही. या शाळात शिकून आयुष्यात यशस्वी झालेल्यांची कोणतीही जाहिरात नाही. आपण जिल्हा परिषद शाळांमधून शिक्षणाची सुरुवात करून आयुष्यात जे यश मिळविले ते आमच्या मुलांसोबत शेअर करून त्यांचा आत्मविश्वास वाढवायला मदत करा. आपले हे पाऊल अनेक मुलांच्या आयुष्यात गुणात्मक बदल करू शकेल, असा विश्वास डाॅ. गोंदावले यांनी व्यक्त केला. जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकून यशस्वी झालेल्या माजी विद्यार्थ्यांचा लोकसहभाग कसा मिळवता येईल. मुलांचे मनोबल शाळांची गुणवत्ता वाढविण्यासाठी काय करता येईल. त्यात लोकसहभाग काय असेल यासंबंधी https://forms.gle/bHdorq2XpxmuTvDb7 या लिंकवर माहीती भरा आम्ही आपल्या प्रतिसादाची वाट पाहत आहोत, असे आवाहन करून राज्यात एक वेगळा प्रयोग राबविण्यास सुरुवात केली आहे.

गेल्या वर्षी साडेचार हजार विद्यार्थी जिल्हा परिषदेच्या २१३१ शाळांत वाढले. यावर्षी इंग्रजी, खासगी शाळा सोडून जिल्हा परिषदेच्या शाळांत प्रवेशाचा हा आकडा यावर्षी दहा हजार पार जाण्याची शक्यता शिक्षण विभागाने व्यक्त केली. सुंदर माझी शाळा, शाळांत डेन्सफाॅरेस्ट यासह विविध उपक्रमशील शिक्षकांना प्रोत्साहन दिल्याने झेडपी लाइव्हसह वेगवेगळ्या उपक्रमांतून औरंगाबादची वेगळी ओळख जिल्हा परिषदेचे शिक्षक करत आहेत. मूलभूत सोयी-सुविधा वाढविण्यावर भर दिल्याने शाळांचा चेहरामोहरा बदलत आहे. विद्यार्थी गुणवंत असताना या शाळांचे शिक्षणाचे ब्रॅण्डिंग करण्यात त्यांनी देश विदेशात पसरलेल्या जिल्हा परिषद शाळांतून शिकलेल्या माजी विद्यार्थ्यांना साद घातली आहे. त्याला चांगला प्रतिसाद मिळायला सुरुवात झाली आहे. तो प्रतिसाद जिल्हा परिषद शाळांचे ब्रॅण्डिंग तर करेल शिवाय विद्यार्थ्यांचेही मनोबलही वाढवेल, असा डाॅ. गोंदावले यांना विश्वास आहे. कोरोनाच्या महामारीतून सावरताना जिल्हा परिषदेच्या शाळांकडेही सीईओंनी लक्ष घातल्याने आता शिक्षकांतही वेगवेगळ्या उपक्रमांसाठी, गुणवत्ता वाढीसाठी उत्साह संचारल्याचे दिसत आहे. भौतिक सुविधांची वाढ लोकसहभागातून शक्य असल्याची आदर्श उदाहरणेही त्यांनी निर्माण केल्याने सुंदर माझी शाळा उपक्रमात लोकसहभाग वाढल्याने शाळांच्या सुविधा वाढून रूपही बदलत आहे.

---

-डाॅ. मंगेश गोंदावले,

मुख्य कार्यकारी अधिकारी

जिल्हा परिषद औरंगाबाद