शहरं
Join us  
Trending Stories
1
अहिल्यानगर येथे रांगोळीवरून तणाव, CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “जाणीवपूर्वक...”
2
बैलाला साखळी घालतात तसे दिसते; अजित पवार ज्वेलरी शॉपच्या उद्घाटनाला गेले, गोल्डमॅन म्हणून वावरणाऱ्यांना फटकारले
3
एका सल्ल्यासाठी ₹११ कोटी! पीकेंच्या कमाईचे आकडे पाहून चक्रावून जाल; ₹९८ कोटी दान केले...
4
'त्या नारी शक्तीचे एक उदाहरण...', पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जॉर्जिया मेलोनी यांच्या आत्मचरित्राला प्रस्तावना लिहिली
5
प्रशांत किशोर यांची 3 वर्षांची कमाई बघून थक्क व्हाल, जन सूरज पक्षाला डोनेट केले तब्बल 98 कोटी!
6
अरेरे! लहान वयात केस पिकले, नारळाच्या तेलात 'हे' मिसळा; चिंता सोडा, पांढऱ्या केसांना टाटा करा
7
'तुला तुरुंगामध्ये टाकेन हा, मी तुला सांगतोय'; अजित पवारांच्या संतापाचा कडेलोट, दीड कोटींच्या उधारीचं प्रकरण काय?
8
'हे' मेड इन इंडिया मॅसेजिंग अ‍ॅप घेणार WhatsApp ची जागा? दुर्गम भागातील लोकांना होणार फायदा?
9
एशिया कप 2025 चा हिरो: विजयाचा तिलक लावला खरा, पण कुटुंबाचे २०२२ पर्यंत स्वत:चे घर नव्हते...; वडील इलेक्ट्रीशिअन...
10
ऑटो कंपन्यांचे पाकिस्तानातून पलायन! सरकारकडून सेकंड हॅन्ड गाड्यांना आयात करण्यासाठी परवानगी
11
PM मोदींच्या 'X' पोस्टने पाकिस्तानचे मंत्री मोहसिन नकवी अन् ख्वाजा आसिफचा 'थयथयाट', म्हणाले...
12
वनप्लस १३ नंतर १४ नाही, थेट १५ सिरीज बाजारात आणणार; भारतात कधी लाँच होणार... 
13
Ahilyanagar: मुस्लीम धर्मगुरूंच्या नावाची रस्त्यावर रांगोळी; अहिल्यानगरमध्ये तणाव, 'रास्ता रोको'नंतर लाठीचार्ज
14
सणासुदीच्या काळात सावध राहा! सायबर गुन्हेगार AI वापरुन करतायेत फसवणूक; कसं राहाल सुरक्षित?
15
IND vs PAK : क्रिकेटमध्ये राजकारण आणणारा तू पहिला कॅप्टन! सूर्यानं पाक पत्रकाराला असा दिला रिप्लाय (VIDEO)
16
'अगदी बरोबर केलं...!'; पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेल्या विनय नरवाल यांचे वडील टीम इंडियावर खुश!
17
आता टीम इंडियाला मिळणार नाही आशिया चषकाची ट्रॉफी? काय आहे ICCचा नियम, जाणून घ्या
18
जन्मदातीने सोडलं, परदेशी जोडप्यानं सांभाळलं; ३८ वर्षांनी स्वित्झर्लंडची नताशा मुंबईत, खऱ्या आईला भेटली
19
भारताविरोधात लढत होता पाकिस्तानी नेव्हीचा अधिकारी, खेळलाही...; पण गुडघे टेकत पराभूत झाला...
20
ज्यांनी भावाची चौकशी केली नाही, ते गावाची काय करणार; शिवाजी सावंतांचा तानाजी सावंतांवर आरोप

१८, २२ मजली इमारतींसाठी अग्निशमन यंत्रणा कुठे आहे?

By | Updated: December 2, 2020 04:07 IST

औरंगाबाद : नागरिकांना स्वस्तात घरे मिळावी या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने उंच उंच इमारती उभारण्यास नवीन नियमावलीनुसार परवानगी दिली आहे. ...

औरंगाबाद : नागरिकांना स्वस्तात घरे मिळावी या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने उंच उंच इमारती उभारण्यास नवीन नियमावलीनुसार परवानगी दिली आहे. औरंगाबाद शहरात ७० फूट म्हणजेच २२ मजल्यापर्यंत भविष्यात इमारती उभारता येऊ शकतात. मात्र त्यापूर्वी महापालिकेला आपली अग्निशमन यंत्रणा अद्यावत करावी लागेल. सध्या महापालिकेकडे पाचव्या मजल्यापर्यंत जाण्यासाठी कोणतीही यंत्रणा उपलब्ध नाही. मोठ्या इमारतींची आग विझविण्यासाठी लागणारी यंत्रणा मिळावी म्हणून मागील दहा वर्षांपासून फाईल सुरु आहे.

शहराच्या चारही बाजूने मोठ मोठे डोंगर आहेत. सध्या नागरिक शहराच्या चारही बाजूने लांब लांबपर्यंत राहण्यासाठी जात आहेत. शहरातच नागरिकांना स्वस्तात घरे उपलब्ध झाल्यास ते लांबपर्यंत राहण्यासाठी जाणार नाहीत. शहरातील सर्वात मोठी बांधकाम व्यावसायिक संघटना क्रेडाईने मागील काही दिवसांपासून उंच उंच इमारतींसाठी महापालिका आणि राज्य शासनाकडे आग्रह धरला आहे. सध्या महापालिकेला ३६ मीटर म्हणजे ११ ते १२ मजले इमारत उभारण्याची परवानगी देण्याचे अधिकार आहेत. नवीन नियमावलीनुसार शहरात २२ मजल्यापर्यंत म्हणजे ७० मीटरपर्यंत बांधकामे करण्यास परवानगी द्यावी असा व्यावसायिकांचा आग्रह आहे. मात्र त्यासाठी महापालिकेला सर्वात अगोदर अग्निशमन यंत्रणा मजबूत करावी लागणार आहे. राज्यातील मोठ्या शहरांमध्ये मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक आदी महापालिकांनी अगोदर अग्निशमन यंत्रणा मजबूत करून मोठ्या इमारती उभारण्यास परवानगी दिलेली आहे. औरंगाबाद शहरात सध्या आठ ते दहा मजल्यापर्यंत इमारती उभ्या राहत आहेत. आज या इमारतींमध्ये आग लागल्यास महापालिका काहीच करू शकत नाही. महापालिकेकडे तीन मजल्यापर्यंत पोहोचण्यासाठी शिडी उपलब्ध आहे. अशा परिस्थितीत ७० मीटरचा विचारच महापालिका करू शकत नाही.

दहा वर्षांपासून यंत्रणा खरेदीचा प्रस्ताव

शहरात उंच इमारती तयार होत असतानाच अद्ययावत यंत्रणा खरेदी करण्यासाठी तत्कालिन अग्निशामन अधिकाऱ्यांनी प्रशासनाकडे प्रस्ताव पाठविला. १४ ते १५ कोटी रुपये खर्च करून अद्यावत वाहन महापालिकेला खरेदी करता येऊ शकते. मात्र ही फाईल दहा वर्षांपासून यांत्रिकी विभागात धूळखात आहे. यांत्रिकी विभागातील अधिकाऱ्यांना भारतीय बनावटीची यंत्रणा हवी आहे. अग्निशमन विभागाने विदेशी यंत्रणा खरेदी करावी असा आग्रह धरला होता.

डिझास्टर मॅनेजमेंटचा विचार करावा लागेल

शहराच्या भागात कोणतीही इमारत उभी करायची आहे तेथे अंडरग्राउंड विजेची यंत्रणा असली पाहिजे. त्या इमारतीपर्यंत अग्निशमन विभागाचे वाहन पोहोचू शकते का, याचीसुद्धा पाहणी करावी लागेल. बांधकाम परवानगी देताना महापालिकेने डिझास्टर मॅनेजमेंट अंतर्गत अग्निशमन अधिकाऱ्याची संमती घेतली पाहिजे. राज्यातील इतर शहरांमध्ये याच पद्धतीने कामकाज चालते.

यंत्रणा खरेदीचा प्रस्ताव अनेक वर्षांपासून

अग्निशमन विभागाकडे अद्यावत असे कोणतेही तंत्रज्ञान नाही. मागील अनेक वर्षांपासून उपलब्ध साधनसामग्रीवर आग विझविण्याचे काम सुरू आहे. मागील दहा वर्षांपासून अद्ययावत यंत्रणा खरेदी करावी असा प्रस्ताव दिलेला आहे मात्र त्यावर कोणताही निर्णय झालेला नाही.

आर. के. सुरे, प्रमुख अग्निशमन अधिकारी.