शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
2
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
3
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
4
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
5
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
6
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
7
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
8
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
10
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
11
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
12
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
13
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
14
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
15
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
16
सुट्टीसाठी तळमळणाऱ्या मंत्र्यांना ‘डिसेंबर’ हुडहुडी!
17
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
18
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
19
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
20
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

१८, २२ मजली इमारतींसाठी अग्निशमन यंत्रणा कुठे आहे?

By | Updated: December 2, 2020 04:07 IST

औरंगाबाद : नागरिकांना स्वस्तात घरे मिळावी या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने उंच उंच इमारती उभारण्यास नवीन नियमावलीनुसार परवानगी दिली आहे. ...

औरंगाबाद : नागरिकांना स्वस्तात घरे मिळावी या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने उंच उंच इमारती उभारण्यास नवीन नियमावलीनुसार परवानगी दिली आहे. औरंगाबाद शहरात ७० फूट म्हणजेच २२ मजल्यापर्यंत भविष्यात इमारती उभारता येऊ शकतात. मात्र त्यापूर्वी महापालिकेला आपली अग्निशमन यंत्रणा अद्यावत करावी लागेल. सध्या महापालिकेकडे पाचव्या मजल्यापर्यंत जाण्यासाठी कोणतीही यंत्रणा उपलब्ध नाही. मोठ्या इमारतींची आग विझविण्यासाठी लागणारी यंत्रणा मिळावी म्हणून मागील दहा वर्षांपासून फाईल सुरु आहे.

शहराच्या चारही बाजूने मोठ मोठे डोंगर आहेत. सध्या नागरिक शहराच्या चारही बाजूने लांब लांबपर्यंत राहण्यासाठी जात आहेत. शहरातच नागरिकांना स्वस्तात घरे उपलब्ध झाल्यास ते लांबपर्यंत राहण्यासाठी जाणार नाहीत. शहरातील सर्वात मोठी बांधकाम व्यावसायिक संघटना क्रेडाईने मागील काही दिवसांपासून उंच उंच इमारतींसाठी महापालिका आणि राज्य शासनाकडे आग्रह धरला आहे. सध्या महापालिकेला ३६ मीटर म्हणजे ११ ते १२ मजले इमारत उभारण्याची परवानगी देण्याचे अधिकार आहेत. नवीन नियमावलीनुसार शहरात २२ मजल्यापर्यंत म्हणजे ७० मीटरपर्यंत बांधकामे करण्यास परवानगी द्यावी असा व्यावसायिकांचा आग्रह आहे. मात्र त्यासाठी महापालिकेला सर्वात अगोदर अग्निशमन यंत्रणा मजबूत करावी लागणार आहे. राज्यातील मोठ्या शहरांमध्ये मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक आदी महापालिकांनी अगोदर अग्निशमन यंत्रणा मजबूत करून मोठ्या इमारती उभारण्यास परवानगी दिलेली आहे. औरंगाबाद शहरात सध्या आठ ते दहा मजल्यापर्यंत इमारती उभ्या राहत आहेत. आज या इमारतींमध्ये आग लागल्यास महापालिका काहीच करू शकत नाही. महापालिकेकडे तीन मजल्यापर्यंत पोहोचण्यासाठी शिडी उपलब्ध आहे. अशा परिस्थितीत ७० मीटरचा विचारच महापालिका करू शकत नाही.

दहा वर्षांपासून यंत्रणा खरेदीचा प्रस्ताव

शहरात उंच इमारती तयार होत असतानाच अद्ययावत यंत्रणा खरेदी करण्यासाठी तत्कालिन अग्निशामन अधिकाऱ्यांनी प्रशासनाकडे प्रस्ताव पाठविला. १४ ते १५ कोटी रुपये खर्च करून अद्यावत वाहन महापालिकेला खरेदी करता येऊ शकते. मात्र ही फाईल दहा वर्षांपासून यांत्रिकी विभागात धूळखात आहे. यांत्रिकी विभागातील अधिकाऱ्यांना भारतीय बनावटीची यंत्रणा हवी आहे. अग्निशमन विभागाने विदेशी यंत्रणा खरेदी करावी असा आग्रह धरला होता.

डिझास्टर मॅनेजमेंटचा विचार करावा लागेल

शहराच्या भागात कोणतीही इमारत उभी करायची आहे तेथे अंडरग्राउंड विजेची यंत्रणा असली पाहिजे. त्या इमारतीपर्यंत अग्निशमन विभागाचे वाहन पोहोचू शकते का, याचीसुद्धा पाहणी करावी लागेल. बांधकाम परवानगी देताना महापालिकेने डिझास्टर मॅनेजमेंट अंतर्गत अग्निशमन अधिकाऱ्याची संमती घेतली पाहिजे. राज्यातील इतर शहरांमध्ये याच पद्धतीने कामकाज चालते.

यंत्रणा खरेदीचा प्रस्ताव अनेक वर्षांपासून

अग्निशमन विभागाकडे अद्यावत असे कोणतेही तंत्रज्ञान नाही. मागील अनेक वर्षांपासून उपलब्ध साधनसामग्रीवर आग विझविण्याचे काम सुरू आहे. मागील दहा वर्षांपासून अद्ययावत यंत्रणा खरेदी करावी असा प्रस्ताव दिलेला आहे मात्र त्यावर कोणताही निर्णय झालेला नाही.

आर. के. सुरे, प्रमुख अग्निशमन अधिकारी.