शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

पीएम- केअर्सचा पैसा कोठे गेला : ममता बॅनर्जी यांचा सवाल

By | Updated: December 3, 2020 04:08 IST

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर त्यांनी सांगितले की, पीएम केअर्स फंडाचा पैसा कोठे गेला? या निधीच्या भविष्याबाबत कोणाला माहिती आहे का? ...

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर त्यांनी सांगितले की, पीएम केअर्स फंडाचा पैसा कोठे गेला? या निधीच्या भविष्याबाबत कोणाला माहिती आहे का? लाखो, करोडो रुपये कोठे गेले? याचे ऑडिट का? करण्यात आले नाही? केंद्र सरकार आम्हाला केवळ उपदेश करीता आहे. या सरकारने कोरोना महामारीशी लढण्यासाठी आम्हाला काय दिले, असे अनेक सवाल उपस्थित केले आहेत.

राज्यातील विधानसभा निवडणुका जवळ आल्यामुळे राज्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. राज्यातील २९४ जागांसाठी पुढील वर्षीच्या एप्रिल-मे महिन्यात निवडणुका होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षांनी दावा केला आहे की, राज्यातील कायदा-व्यवस्थेची स्थिती देशातील इतर राज्यांपेक्षा खूपच चांगली आहे.

उत्तर भारतात सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाबाबत त्या म्हणाल्या की, कृषी विधेयकांच्या मुद्द्यांवर भाजपला दुसरा कोणताही पक्ष साथ देत नाही. तरीही हा पक्ष अडून बसला आहे.

.................................

तृणमूल सरकारने सुरू केली द्वारे सरकार मोहीम

२०२१ मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालमधील तृणमूल सरकारने द्वारे सरकार मोहीम सुरू केली आहे. राज्याच्या ११ सरकारी कल्याणकारी योजनांचा लाभ घेण्यापासून कोणीही वंचित राहू नये, यासाठी ही मोहीम सुरू केली आहे. ती २० जानेवारीपर्यंत चालणार आहे.

लोकांनी योजनांचा लाभ घेण्यासाठी राज्यातील सर्व पंचायती व नगरपालिकेच्या वॉर्डांमध्ये स्थापित २०,००० शिबिरांमध्ये रांगा लावल्या होत्या. दोन महिन्यांतील चार टप्प्यांत हा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.

ममतांनी ट्वीटद्वारे म्हटले आहे की, राज्य सरकारच्या द्वारे सरकार पुढाकाराद्वारे लोकांना त्यांच्या दारापर्यंत सरकारी सेवा पोहोचवली जाईल. विविध शिबिरांमध्ये जोरात काम सुरू झाले आहे. लोकांनी याचा लाभ घ्यावा.

दरम्यान, लोकांच्या पैशावर तृणमूलने निवडणूक प्रचार मोहीम सुरू केली आहे, असा आरोप भाजप प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी केला आहे. १० वर्षे राज्यावर सत्ता गाजवल्यानंतरही या सरकारला अशा प्रकारची मोहीम राबवावी लागत आहे, यातच सर्व काही आले, असा टोलाही त्यांनी लगावला.