शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
3
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
4
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
5
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
6
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
7
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
8
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
9
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
10
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
11
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
12
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
13
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
14
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
15
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल
16
भारताने दाखवले मोठे मन; पाकिस्तानला पुराबाबत केले सतर्क, ऑपरेशन सिंदूर नंतर पहिल्यांदाच चर्चा
17
गाझातील रुग्णालयावर इस्त्रायलचा हल्ला, ४ पत्रकारांसह १४ लोक ठार; जगभरातून होतोय निषेध 
18
पाकिस्तान हेरगिरी प्रकरणी यूट्यूबर ज्योती मल्होत्राला केलं कोर्टात हजर; ९५ दिवसांनी तुरुंगाबाहेर!
19
ईडीने छापा टाकला,आमदार भिंतीवरून उडी मारून पळून गेले, फोनही नाल्यात फेकला; अधिकाऱ्यांनी केली अटक
20
Shakib Al Hasan World Record : ५०० विकेट्स अन् ७००० धावा! पठ्ठ्यानं वर्ल्ड रेकॉर्डसह केली हवा

शेतकरी कर्जमाफी गेली कुठे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2017 00:41 IST

विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी काँग्रेस- राष्टÑवादी काँग्रेससह अन्य विरोधी पक्षांचा प्रचंड मोर्चा अधिवेशनावर धडकणार आहे. त्याची जोरदार तयारी सध्या चालू आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : राज्यात सर्वच क्षेत्रांत विविध प्रश्न निर्माण झाले आहेत. विशेषत: शेतक-यांचे अनेक प्रश्न जटिल होत चालले आहेत. सरकारच्या उदासीन धोरणांमुळे रोज शेतक-यांवर आत्महत्या करण्याची वेळ आलेली आहे. या सर्व प्रश्नांचा जाब नाकर्त्या राज्य सरकारला विचारण्यात येणार आहे. यासाठी ११ डिसेंबरपासून नागपुरात सुरू होणा-या विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी काँग्रेस- राष्टÑवादी काँग्रेससह अन्य विरोधी पक्षांचा प्रचंड मोर्चा अधिवेशनावर धडकणार आहे. त्याची जोरदार तयारी सध्या चालू आहे, अशी माहिती आज येथे प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष व माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी दिली.या मोर्चाच्या पूर्वतयारीची मराठवाडा विभागाची बैठक आज चव्हाण यांनी औरंगाबादेत घेतली. बैठकीनंतर ते पत्रकारांशी वार्तालाप करीत होते. त्यांनी सांगितले की, आज राज्यात अनेक प्रश्न बिकट होत चालले आहेत. त्याचा जाब आम्ही सरकारला विचारल्याशिवाय राहणार नाही. जाब विचारण्यासाठी काढण्यात येत असलेल्या मोर्चाच्या तयारीच्या बैठका सध्या सुरू आहेत. काल मुंबईत उत्तर महाराष्टÑाची बैठक झाली. लवकरच विदर्भ व पश्चिम महाराष्टÑाच्या बैठका होतील.सरकारकडून अनेक प्रश्नांची उत्तरे अपेक्षित आहेत. कुठे गेली ३४ हजार कोटींची व ८९ लाख शेतक-यांची कर्जमाफी? केवळ तारीख पे तारीख व टाळाटाळ सुरू आहे.सोयाबीन व कापसाची खरेदी आॅनलाइन सुरू करून शेतकºयांची मोठी अडचण निर्माण झाली आहे. ही आॅनलाइन प्रक्रिया बंद करण्यात यावी, अशी आमची मागणी आहे. हमी भाव कायदा कुठे आहे. तो नसल्यामुळे शेतक-यांचे दुहेरी नुकसान होत आहे.शेतकºयांच्या रोज आत्महत्या होत असतानाही सरकार संवेदनशून्य पद्धतीने वागत आहे. राज्यातले रस्ते खड्डेमुक्त करण्याच्या तारखा जाहीर होत आहेत; पण खड्डे बुजताना दिसत नाहीत, याकडे चव्हाण यांनी लक्ष वेधले.