शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
2
धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक
3
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
4
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
5
ब्राझीलच्या माजी राष्ट्रपतींना सुनावली २७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा, निवडणूक हरल्यानंतर केलेली ती कृती भोवली
6
Python Hunting: अजगर मारून त्याचं मांस शिजवलं, दोन जणांना अटक! 
7
सिक्कीममध्ये निसर्गाचा कोप! भूस्खलनात ४ जणांचा मृत्यू, ३ जण बेपत्ता, बचावकार्य सुरू
8
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
9
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
10
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
11
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
12
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
13
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
14
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
15
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
16
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
17
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
18
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
19
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
20
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल

ंकर्जमाफीची योग्य वेळ येणार तरी कधी?

By admin | Updated: April 2, 2017 23:39 IST

उस्मानाबाद :आणखी किती शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची हे सरकार वाट बघत आहेत? असा खडा सवाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केला.

उस्मानाबाद : सलग चार वर्षे दुष्काळाशी दोनहात केल्यानंतर गतवर्षी समाधानकारक पाऊस झाला. शेतमालही चांगला पिकला; मात्र बाजारपेठेत दाखल होताच दर घसरले. त्यामुळे पीक चांगले येऊनही हा व्यवसाय आतबट्ट्याचा ठरला. त्यामुळे साधा उत्पादन खर्चही हाती न लागल्याने आर्थिक परिस्थिती सुधारली नाही. शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढण्यासाठी कर्जमाफीशिवाय दुसरा पर्याय नाही. याच मागणीसाठी विधिमंडळात संवैधानिक मार्गाने लढा दिल्यानंतर शासनाकडून ‘योग्य वेळी कर्जमाफी देऊ’ असे सांगण्यात येत आहे. मात्र ही योग्य वेळ येणार तरी कधी? आणखी किती शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची हे सरकार वाट बघत आहेत? असा खडा सवाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केला.चंद्रपूर येथून सुरू झालेल्या संघर्ष यात्रेचे रविवारी दुपारी जिल्ह्यात आगमन होताच तालुक्यातील बेंबळी येथे शेतकऱ्यांनी सर्वांचे स्वागत केले. यानंतर उस्मानाबाद येथे आयोजित सभेत ते बोलत होते. मंचावर माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, धनंजय मुंडे, समाजवादी पार्टीचे अबु आझमी, आ. जितेंद्र आव्हाड, दिलीप सोपल, राणाजगजितसिंह पाटील, पतंगराव कदम, विद्या चव्हाण, भारत भालके, राहुल मोटे, विक्रम काळे, शेकापचे भाई धनंजय पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष नेताजी पाटील आदी उपस्थित होते. खा. चव्हाण म्हणाले की, भाजपा सरकार केवळ घोषणा करण्यात पटाईत आहेत. मागील अडीच वर्षात केलेल्या घोषणा पाहिल्या असता अंमलबजावणीच्या नावाने बोंबाबोंब असल्याचे दिसून येते. एकीकडे शेतकरी हिताच्या गप्पा मारायच्या आणि दुसरीकडे पीकविम्यातून कर्जाची रक्कम कपात करण्याचे आदेश काढायचे. अशा प्रकारे दुटप्पी भूमिका असणाऱ्या शासनाकडून मदतीची अपेक्षा बाळगणे चुकीचे असल्याचेही ते म्हणाले. त्यामुळे आता बघ्याची भूमिका घेण्यापेक्षा सर्वांनी संघर्ष करण्याची गरज आहे. त्याखेरीज शेती आणि शेतकऱ्यांना न्याय मिळणार नाही. मतदान यंत्राच्या चुकीमुळे हे सत्तेवर आले आहेत. त्याची निवडणूक आयोगाकडे आपण तक्रार करणार असल्याचे खा. चव्हाण यांनी सांगितले. येथील सभेनंतर ही यात्रा तुळजाभवानीचे दर्शन घेऊन सोलापूरच्या दिशेने मार्गस्थ झाली. या सभेसाठी जिल्हाभरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.‘जलयुक्तमध्ये प्रचंड भ्रष्टाचार’मुख्यमंत्र्यांसह भाजपाचे सर्वच मंत्री जलयुक्त शिवार योजनेचे गोडवे गात आहेत. मात्र ही योजना राबविताना कुठलेही निकष पाळले जात नसून, प्रचंड भ्रष्टाचार होत आहे. गोरगरिबांचे पैसे कंत्राटदारांच्या घशात घालण्याचे काम सध्या सुरू असल्याचा आरोप खासदार अशोक चव्हाण यांनी केला. (प्रतिनिधी)