शहरं
Join us  
Trending Stories
1
उड्डाण करताच ब्रिटनमध्ये विमान कोसळले; एअर इंडिया अपघातासारखेच आगीचे लोळ... 
2
निमिषा प्रियाचा जीव वाचू शकेल? फाशीला उरलेत अवघे २ दिवस! सुप्रीम कोर्टात आज होणार मोठी सुनावणी 
3
कराड 'आरटीओ'ला मुंबई उच्च न्यायालयाचा दणका, 'त्या' बुलेटचे रजिस्टर करण्याचे आदेश; नेमकं प्रकरण काय?
4
Air India Plane Crash : क्रॅश झालेल्या एअर इंडियाच्या विमानाचे टीसीएम दोनदा बदलले होते; इंधन नियंत्रण स्विच याचाच एक भाग
5
दुबई अन् नेपाळपर्यंत पसरलं होतं छांगुर बाबाचं जाळं; 'नीतू' करायची डील! कोण आहे 'ही' व्यक्ती?   
6
'दुआ में जरुर याद रखना' मृत्यूपूर्वी अभिनेत्रीचे अखेरचे शब्द; Voice Note पहिल्यांदाच समोर
7
...मग तेव्हा उद्धव ठाकरे २५ मिनिटं मोदीजींचे बूट चाटत होते का?; रामदास कदमांचा राऊतांवर हल्ला
8
बंगालच्या उपसागरात १६ दिवस चिनी जहाज लपून बसलेले; ओळख सांगणारी यंत्रणा चालू-बंद करत होते...
9
आजचे राशीभविष्य, १४ जुलै २०२५: नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल, भविष्यात लाभ होतील
10
इकडे चौकशी सुरू; तिकडे बाळाने मिटले डोळे, अंत्यसंस्काराची तयारी सुरू असतानाच रडलेले...
11
संपादकीय: गूढ उकलले की वाढले? एअर इंडियाच्या पायलटांवर संशय, बोईंगला वाचविण्याचे प्रयत्न...
12
पुढील महिन्यापासून संपूर्ण देशात मतदार याद्यांचे सखोल पुनरीक्षण
13
उम्र का तू तमाशा न दिखा, तकाजा कुछ और हैं...; काळाबरोबर खूप काही बदलले...
14
धक्कादायक : बिहारच्या मतदार याद्यांत म्यानमार, नेपाळी, बांगलादेशींचा भरणा
15
नागरिकांना ४ लाखांचे विमा संरक्षण मिळणार? पीएमजेजेबीवाय अंतर्गत विमा संरक्षण दुप्पट करणार
16
विधिज्ञ उज्ज्वल निकम, आणखी तिघे राज्यसभेवर; श्रुंगला, सदानंदन, मीनाक्षी जैन यांचाही समावेश
17
बिहारमध्ये गुंडाराज: १३ दिवसांत ३० हत्या; नेते, अधिकाऱ्यांनाही सोडले नाही
18
उत्तर कोरियाच्या विरोधात जाऊ नका, रशियाचा अमेरिका-जपानला इशारा
19
शनैश्वर बनावट ॲप तयार करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल
20
आंदोलने मजेसाठी नसतात, लोकांचे हक्क महत्वाचे; मद्रास हायकोर्ट : पक्षाची मनमानी चालू शकत नाही

ंकर्जमाफीची योग्य वेळ येणार तरी कधी?

By admin | Updated: April 2, 2017 23:39 IST

उस्मानाबाद :आणखी किती शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची हे सरकार वाट बघत आहेत? असा खडा सवाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केला.

उस्मानाबाद : सलग चार वर्षे दुष्काळाशी दोनहात केल्यानंतर गतवर्षी समाधानकारक पाऊस झाला. शेतमालही चांगला पिकला; मात्र बाजारपेठेत दाखल होताच दर घसरले. त्यामुळे पीक चांगले येऊनही हा व्यवसाय आतबट्ट्याचा ठरला. त्यामुळे साधा उत्पादन खर्चही हाती न लागल्याने आर्थिक परिस्थिती सुधारली नाही. शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढण्यासाठी कर्जमाफीशिवाय दुसरा पर्याय नाही. याच मागणीसाठी विधिमंडळात संवैधानिक मार्गाने लढा दिल्यानंतर शासनाकडून ‘योग्य वेळी कर्जमाफी देऊ’ असे सांगण्यात येत आहे. मात्र ही योग्य वेळ येणार तरी कधी? आणखी किती शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची हे सरकार वाट बघत आहेत? असा खडा सवाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केला.चंद्रपूर येथून सुरू झालेल्या संघर्ष यात्रेचे रविवारी दुपारी जिल्ह्यात आगमन होताच तालुक्यातील बेंबळी येथे शेतकऱ्यांनी सर्वांचे स्वागत केले. यानंतर उस्मानाबाद येथे आयोजित सभेत ते बोलत होते. मंचावर माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, धनंजय मुंडे, समाजवादी पार्टीचे अबु आझमी, आ. जितेंद्र आव्हाड, दिलीप सोपल, राणाजगजितसिंह पाटील, पतंगराव कदम, विद्या चव्हाण, भारत भालके, राहुल मोटे, विक्रम काळे, शेकापचे भाई धनंजय पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष नेताजी पाटील आदी उपस्थित होते. खा. चव्हाण म्हणाले की, भाजपा सरकार केवळ घोषणा करण्यात पटाईत आहेत. मागील अडीच वर्षात केलेल्या घोषणा पाहिल्या असता अंमलबजावणीच्या नावाने बोंबाबोंब असल्याचे दिसून येते. एकीकडे शेतकरी हिताच्या गप्पा मारायच्या आणि दुसरीकडे पीकविम्यातून कर्जाची रक्कम कपात करण्याचे आदेश काढायचे. अशा प्रकारे दुटप्पी भूमिका असणाऱ्या शासनाकडून मदतीची अपेक्षा बाळगणे चुकीचे असल्याचेही ते म्हणाले. त्यामुळे आता बघ्याची भूमिका घेण्यापेक्षा सर्वांनी संघर्ष करण्याची गरज आहे. त्याखेरीज शेती आणि शेतकऱ्यांना न्याय मिळणार नाही. मतदान यंत्राच्या चुकीमुळे हे सत्तेवर आले आहेत. त्याची निवडणूक आयोगाकडे आपण तक्रार करणार असल्याचे खा. चव्हाण यांनी सांगितले. येथील सभेनंतर ही यात्रा तुळजाभवानीचे दर्शन घेऊन सोलापूरच्या दिशेने मार्गस्थ झाली. या सभेसाठी जिल्हाभरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.‘जलयुक्तमध्ये प्रचंड भ्रष्टाचार’मुख्यमंत्र्यांसह भाजपाचे सर्वच मंत्री जलयुक्त शिवार योजनेचे गोडवे गात आहेत. मात्र ही योजना राबविताना कुठलेही निकष पाळले जात नसून, प्रचंड भ्रष्टाचार होत आहे. गोरगरिबांचे पैसे कंत्राटदारांच्या घशात घालण्याचे काम सध्या सुरू असल्याचा आरोप खासदार अशोक चव्हाण यांनी केला. (प्रतिनिधी)