शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
3
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
4
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
5
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
6
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
7
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
8
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
9
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
10
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
11
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
12
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
13
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण
14
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
15
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
16
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
17
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
18
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
19
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
20
Simhastha Kumbh Mela Nashik: नाशिकमधील रस्ते होणार चकाचक; २२७० कोटी रुपयांची कामे, कोणत्या रस्त्यांचा समावेश?  

ंकर्जमाफीची योग्य वेळ येणार तरी कधी?

By admin | Updated: April 2, 2017 23:39 IST

उस्मानाबाद :आणखी किती शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची हे सरकार वाट बघत आहेत? असा खडा सवाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केला.

उस्मानाबाद : सलग चार वर्षे दुष्काळाशी दोनहात केल्यानंतर गतवर्षी समाधानकारक पाऊस झाला. शेतमालही चांगला पिकला; मात्र बाजारपेठेत दाखल होताच दर घसरले. त्यामुळे पीक चांगले येऊनही हा व्यवसाय आतबट्ट्याचा ठरला. त्यामुळे साधा उत्पादन खर्चही हाती न लागल्याने आर्थिक परिस्थिती सुधारली नाही. शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढण्यासाठी कर्जमाफीशिवाय दुसरा पर्याय नाही. याच मागणीसाठी विधिमंडळात संवैधानिक मार्गाने लढा दिल्यानंतर शासनाकडून ‘योग्य वेळी कर्जमाफी देऊ’ असे सांगण्यात येत आहे. मात्र ही योग्य वेळ येणार तरी कधी? आणखी किती शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची हे सरकार वाट बघत आहेत? असा खडा सवाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केला.चंद्रपूर येथून सुरू झालेल्या संघर्ष यात्रेचे रविवारी दुपारी जिल्ह्यात आगमन होताच तालुक्यातील बेंबळी येथे शेतकऱ्यांनी सर्वांचे स्वागत केले. यानंतर उस्मानाबाद येथे आयोजित सभेत ते बोलत होते. मंचावर माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, धनंजय मुंडे, समाजवादी पार्टीचे अबु आझमी, आ. जितेंद्र आव्हाड, दिलीप सोपल, राणाजगजितसिंह पाटील, पतंगराव कदम, विद्या चव्हाण, भारत भालके, राहुल मोटे, विक्रम काळे, शेकापचे भाई धनंजय पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष नेताजी पाटील आदी उपस्थित होते. खा. चव्हाण म्हणाले की, भाजपा सरकार केवळ घोषणा करण्यात पटाईत आहेत. मागील अडीच वर्षात केलेल्या घोषणा पाहिल्या असता अंमलबजावणीच्या नावाने बोंबाबोंब असल्याचे दिसून येते. एकीकडे शेतकरी हिताच्या गप्पा मारायच्या आणि दुसरीकडे पीकविम्यातून कर्जाची रक्कम कपात करण्याचे आदेश काढायचे. अशा प्रकारे दुटप्पी भूमिका असणाऱ्या शासनाकडून मदतीची अपेक्षा बाळगणे चुकीचे असल्याचेही ते म्हणाले. त्यामुळे आता बघ्याची भूमिका घेण्यापेक्षा सर्वांनी संघर्ष करण्याची गरज आहे. त्याखेरीज शेती आणि शेतकऱ्यांना न्याय मिळणार नाही. मतदान यंत्राच्या चुकीमुळे हे सत्तेवर आले आहेत. त्याची निवडणूक आयोगाकडे आपण तक्रार करणार असल्याचे खा. चव्हाण यांनी सांगितले. येथील सभेनंतर ही यात्रा तुळजाभवानीचे दर्शन घेऊन सोलापूरच्या दिशेने मार्गस्थ झाली. या सभेसाठी जिल्हाभरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.‘जलयुक्तमध्ये प्रचंड भ्रष्टाचार’मुख्यमंत्र्यांसह भाजपाचे सर्वच मंत्री जलयुक्त शिवार योजनेचे गोडवे गात आहेत. मात्र ही योजना राबविताना कुठलेही निकष पाळले जात नसून, प्रचंड भ्रष्टाचार होत आहे. गोरगरिबांचे पैसे कंत्राटदारांच्या घशात घालण्याचे काम सध्या सुरू असल्याचा आरोप खासदार अशोक चव्हाण यांनी केला. (प्रतिनिधी)