शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

मदत वाऱ्यावरच, रिक्षाचालकांच्या खात्यावर दीड हजार रुपये कधी जमा होणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:02 IST

स. सो. खंडाळकर औरंगाबाद: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आलेल्या कडक निर्बंधांनंतर राज्य शासनाने रिक्षाचालकांना त्यांच्या खात्यावर दीड हजार रुपये ...

स. सो. खंडाळकर

औरंगाबाद: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आलेल्या कडक निर्बंधांनंतर राज्य शासनाने रिक्षाचालकांना त्यांच्या खात्यावर दीड हजार रुपये जमा करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, अद्याप तरी हे आश्वासन पूर्ण झाले नसून रिक्षाचालक या मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. ऑनलाइन पद्धतीने ही मदत मिळणार असल्याने ती वेगाने होण्याऐवजी त्यातल्या दिरंगाईमुळे रिक्षाचालक त्रस्त झाले आहेत.

................

आणखी पंधरा ते वीस दिवस लागतील....

एनआयसी सॉफ्टवेअर सिस्टमने हे पैसे उपलब्ध करून द्यावयाचे आहेत. यासाठी आणखी पंधरा ते वीस दिवस लागतील. डाटा भरल्यानंतर रिक्षाचालकांच्या थेट खात्यात दीड हजार रुपये जमा होतील.

संजय मैत्रेवार, प्रादेशिक परिवहन अधिकारी

....................

परवानाधारकांची संख्या: औरंगाबाद जिल्ह्यात २६०००

परवाना नसलेले रिक्षाचालक : १०,००० ते १५,०००

.........................

दीड हजारांत काय होईल?

दीड हजारांत काय? होणार आहे. आता ५००० रुपये आणि नंतर दरमहा अडीच हजार रुपये रिक्षाचालकांच्या खात्यात जमा व्हायला पाहिजेत. भूक आत्ता लागलेली आहे आणि सरकार कधीतरी आणि अर्धवट जेवू घालत आहे, अशी सध्याची परिस्थिती आहे. त्यातही या योजनेचा लाभ १५ ते २० टक्के रिक्षाचालकांना मिळणार आहे. उर्वरित रिक्षाचालक या लाभापासून वंचित राहणार आहेत. गेल्या दीड-दोन वर्षांपासून नूतनीकरणही थांबलेले आहे. मग त्यांचे काय?

- कॉ. बुध्दीनाथ फराळ, अध्यक्ष, औरंगाबाद जिल्हा लाल बावटा रिक्षाचालक कामगार युनियन.

.....................

स्मरणपत्र दिले...

परमिटधारक रिक्षाचालकांसहित लायसन्स, बॅच असलेल्या रिक्षाचालकांना दरमहा १० हजार रुपये अर्थसहाय्य तातडीने द्या, अशी आमची मागणी आहे. दिवस-दिवस वाट पाहूनही रिक्षाचालकांचे पेट्रोलचे पैसेही निघत नाहीत, अशी अवस्था आहे. उधार-पाधार करून किंवा उपासमारीने आजपर्यंत दिवस काढलेत. माणसाला २ वेळेस भूक लागते आणि भूक काही सरकारी निर्णय, प्रक्रिया यासाठी थांबत नसते. त्यामुळे तत्काळ युद्धपातळीवर प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश दिले पाहिजेत.

-कॉ.अभय टाकसाळ,

सरचिटणीस,लालबावटा रिक्षाचालक युनियन, आयटक संलग्न.

................

पेट्रोलचा खर्चही निघत नाही

रिक्षात बसणाऱ्या मध्यमवर्गीय व निम्नमध्यमवर्गीय लोकांची आमदनीच या काळात कमी झाल्याने लोक रिक्षात बसण्याचेही टाळत आहेत. परिणामी दिवसभर रिक्षास्टॅण्डवर प्रवाशांची वाट पाहत बसूनही पेट्रोलचा खर्चही निघत नाही.

राजू हिवराळे, रिक्षाचालक

............................

दंड तरी लावू नका

रिक्षाचा बँक हप्ता, विमा नूतनीकरण, परमिट नूतनीकरण आदी रक्कम ही खिशातूनच भरावी लागत आहे. यातच पोलीस वेगवेगळ्या कारणांमुळे दंड लावत असल्यामुळे रिक्षाचालक मेटाकुटीला आलेला आहे. जाहीर केलेल्या १५०० रु. ची रक्कम वाढवून किमान ५ हजार रुपये करावी, रिक्षाचालकांचे लसीकरण करण्यात यावे. लसीकरण केलेल्या व मास्क लावलेल्या तीन प्रवाशांना रिक्षात प्रवास करण्याची परवानगी द्यावी,असे आम्हाला वाटते.

संदीप सुराशे,रिक्षाचालक

....................