शहरं
Join us  
Trending Stories
1
Uddhav Thackeray : ​​​​​​​"...तर उपमुख्यमंत्रीपद रद्द करा", उद्धव ठाकरे यांची सरकारकडे मोठी मागणी
2
एलॉन मस्क यांच्या 'X' ला तब्बल १०८० कोटींचा दंड ! 'ब्लू टीक' संदर्भातील प्रकरणात बसला दणका
3
IND VS SA 3rd ODI : कुलदीप यादवसह प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! दक्षिण आफ्रिकेचा संघ २७० धावांत आटोपला
4
Aaditya Thackeray : "साधुग्राम, तपोवन हवा पण भाजपाच्या बिल्डर मित्रांची दादागिरी नाही", आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
5
महामानवाला अभिवादन! CM फडणवीसांनी केली सरणत्तयं प्रार्थना; PM मोदींनीही वाहिली आदरांजली
6
मार्गशीर्ष संकष्ट चतुर्थी २०२५: ‘या’ ५ गोष्टी अवश्य अर्पण करा; गणपतीची कायम कृपा मिळवा!
7
America Visa : सोशल मीडियावर एक चूक कराल, तर तुमच्यासाठी बंद होतील अमेरिकेचे दरवाजे! काय आहे नियम?
8
Video - "मी नवरदेव आहे, पण स्वतःच्या लग्नालाच..."; इंडिगोमुळे अडकले प्रवासी, मांडली व्यथा
9
"आमच्या बॅगा कुठायत? घराची चावी त्यात आहे, भिकारी वाटलो का..."; मुंबई एअरपोर्टवर तुफान राडा
10
२०२६ला ६ महिन्यातच सगळी संकटे समस्या दूर होतील; संकष्ट चतुर्थीपासून ‘ही’ उपासना सुरू करा!
11
समस्या संपत नाहीत, पैसा राहत नाही? गणेशाचे प्रभावी स्तोत्र ११ वेळा म्हणा; अद्भूत अनुभव घ्या!
12
'रुपयाबद्दल जास्त काळजी करण्याची गरज नाही..,' घसरत्या चलनावर निर्मला सीतारमण काय म्हणाल्या?
13
२०२५ ची शेवटची संकष्ट चतुर्थी: ५ उपाय अवश्य करा, चिंतामुक्त व्हा; बाप्पाची अपार कृपा लाभेल!
14
हुमायूं कबीर यांनी मुर्शिदाबादमध्ये केली बाबरी मशिदीची पायाभरणी, भाजपा-तृणमूलचे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप  
15
IND vs SA : जड्डूच्या गोलंदाजीवर फसला बावुमा! कॅच घेतल्यावर कोहलीनं अशी घेतली मजा (VIDEO)
16
मार्गशीर्ष संकष्ट चतुर्थी २०२५: विशेष व्रत करा; वर्षभर पुण्य-लाभ, विनायक कल्याण-मंगल करेल!
17
सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; कॅन्सरसह 'या' आजारांचा धोका, आताच बदला सवय
18
अमेरिका सोडून भारतात परत का आली माधुरी दीक्षित? म्हणाली, "बऱ्याच गोष्टी घडल्या..."
19
'कल्कि'च्या सीक्वेलमध्ये दीपिका पादुकोणच्या जागी प्रियंका चोप्रा?, 'देसी गर्ल'नेही ठेवली 'ही' अट
20
Video - गेमर नवरा! विधी राहिल्या बाजुला 'तो' फोनमध्ये मग्न: लग्नमंडपात खेळत होता फ्री फायर
Daily Top 2Weekly Top 5

नंदीग्राम एक्स्प्रेस कधी सुरू होणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:02 IST

औरंगाबाद : औरंगाबादमार्गे बहुतांश एक्स्प्रेस रेल्वे सुरू झाल्या आहेत. मात्र, मुंबई आणि नागपूरला जाण्यासाठी महत्त्वपूर्ण असलेली नंदीग्राम एक्स्प्रेस ...

औरंगाबाद : औरंगाबादमार्गे बहुतांश एक्स्प्रेस रेल्वे सुरू झाल्या आहेत. मात्र, मुंबई आणि नागपूरला जाण्यासाठी महत्त्वपूर्ण असलेली नंदीग्राम एक्स्प्रेस अजूनही सुरू झालेली नाही. हैदराबाद पॅसेंजरवगळता अन्य पॅसेंजर रेल्वेही अजूनही यार्डातच आहेत. त्यामुळे नोकरी, व्यवसायानिमित्त रोज ये-जा करणाऱ्या प्रवाशांचे हाल होत आहेत. नंदीग्राम एक्स्प्रेससह पॅसेंजर कधी सुरू होणार, असा सवाल प्रवाशांतून उपस्थित होत आहे.

कोरोना प्रतिबंधाच्या पहिल्या लाटेत रेल्वे काही दिवस पूर्ण ठप्प होती. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर एक्स्प्रेस रेल्वे धावण्यास सुरुवात झाली; परंतु पॅसेंजर बंदच ठेवण्यात आल्या. दुसऱ्या लाटेतील निर्बंधांमुळेही प्रवासी संख्या घटली. त्यामुळे काही रेल्वे तात्पुरत्या स्वरूपात रद्द करण्यात आल्या. दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर रद्द केलेल्या रेल्वे पुन्हा रुळावर आल्या. मुंबईला जाण्यासाठी जनशताब्दी, तपोवन, देवगिरी, राज्यराणी एक्स्प्रेस आहे; परंतु नंदीग्राम एक्स्प्रेस अजूनही सुरू झालेली नाही. याशिवाय काही रेल्वे अजूनही बंदच आहेत. यात पॅसेंजर रेल्वेंची संख्या सर्वाधिक आहे. पॅसेंजर रेल्वे बंद असल्याने अप-डाऊन करणाऱ्या प्रवाशांना बस, खाजगी वाहन अथवा दुचाकीवरून ये-जा करावी लागत आहे. त्यात बराच वेळ आणि पैसा जातो. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने पॅसेंजर तात्काळ सुरू कराव्यात, अशी मागणी प्रवाशांतून जोर धरत आहे.

सध्या सुरू असलेल्या रेल्वे

- सचखंड एक्स्प्रेस

- देवगिरी एक्स्प्रेस

- जनशताब्दी एक्स्प्रेस

- तपोवन एक्स्प्रेस

-अंजता एक्स्प्रेस

- रेणिगगुंठा एक्स्प्रेस

- मराठवाडा एक्स्प्रेस

-----

या रेल्वे कधी सुरू होणार?

- नंदीग्राम एक्स्प्रेस

- काचीगुडा - नगरसोल पॅसेंजर

- निजामाबाद - पुणे पॅसेंजर

- नांदेड - दौंड पॅसेंजर

- जालना - नगरसोल डेमू पॅसेंजर

- नांदेड - नगरसोल पॅसेंजर

-------

पॅसेंजर गाड्यांचे घोडे कुठे अडले?

- औरंगाबाद-हैदराबाद ही पॅसेंजर रेल्वेही विशेष रेल्वे म्हणून सध्या धावत आहे; परंतु अन्य पॅसेंजर रेल्वे अद्यापही बंदच आहेत. नाेकरी, व्यवसायानिमित्त रोज अप-डाऊन करणाऱ्या प्रवाशांसाठी पॅसेंजर महत्त्वपूर्ण ठरतात.

- अन्य विभागात, इतर राज्यांत पॅसेंजर रेल्वे सुरू करण्यात आल्या आहेत. मग केवळ नांदेड विभागातीलच पॅसेंजर का सुरू केल्या जात नाहीत, असा सवाल प्रवासी उपस्थित करीत आहेत.

- रस्ते मार्गाने ये-जा करताना अनेक गैरसोयीला सामोरे जावे लागते. त्यामुळे पॅसेंजर रेल्वे लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी प्रवाशांतून होत आहे.

---

प्रवासी संघटना काय म्हणतात?

प्रवाशांची गैरसोय

पॅसेंजर बंद असल्याने दररोज ये-जा करणाऱ्या प्रवाशांचे हाल होत आहेत. मध्य रेल्वेच्या विभागात रेल्वे सुरू होतात; पण नांदेड विभागातून पॅसेंजर का सुरू केल्या जात नाहीत, असा प्रश्न आहे. नंदीग्राम एक्स्प्रेसही बंद असल्याने मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होत आहे.

-संतोषकुमार सोमाणी, अध्यक्ष, रेल्वे प्रवासी सेना

---

नंदीग्राम, पॅसेंजर सुरू करा

नंदीग्राम एक्स्प्रेस आणि बंद असलेल्या पॅसेंजर लवकरात लवकर सुरू केल्या पाहिजेत. अन्य राज्यांतही पॅसेंजर सुरू करण्यात आल्या आहेत. आपल्याकडेच दुर्लक्ष केले जात आहे. लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष दिले पाहिजे.

- गौतम नाहाटा, अध्यक्ष, नमो रेल्वे संघटना

-----

एक्स्प्रेस आणि पॅसेंजर सुरू करण्याबाबतचे निर्णय वरिष्ठ पातळीवरून होतील, असे रेल्वे प्रशासनातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

फोटो ओळ...

औरंगाबाद रेल्वेस्टेशनवर सध्या प्रवाशांची अशी गर्दी पाहायला मिळत आहे.