शहरं
Join us  
Trending Stories
1
Iran Israel ceasefire: इराण-इस्रायलमधील १२ दिवसांचे युद्ध संपले; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा, काय म्हणाले?
2
Rashi Bhavishya: स्त्रीमुळे अडचणीत याल, अपघाताचीही शक्यता; आज 'या' राशीच्या लोकांनी काळजी घेणं आवश्यक
3
Election 2025: प्रभाग रचनेचा प्रस्ताव देणार आता निवडणूक आयोगाला, सरकारचा सुधारित आदेश
4
खोटे जात प्रमाणपत्र ही घटनात्मक फसवणूक, सरपंचाला हायकोर्टाने ठोठावला ५ लाखांचा दंड
5
भारताला तेलाची नाही चिंता; मित्र येतो कामी! इराणकडून आयात शून्य, पण...
6
पहिलीपासून तिसरी भाषा हिंदीचा निर्णय रद्द करा; मराठी भाषक अभ्यासकांनी मुख्यमंत्र्यांना पाठवले पत्र
7
MSRTC: एसटी गेली 'खड्ड्यात'; ३७ वर्षे तोट्याचा प्रवास, एसटी महामंडळाची श्वेतपत्रिका जाहीर
8
रतन टाटा यांचे उरलेले शेअर्स 'त्या' दोन संस्थांनाच; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा निकाल
9
अग्रलेख: युद्ध थांबेल की अधिक पेटेल? परिणाम लवकरच जाणवू शकतात 
10
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
11
विशेष लेख: शेतकऱ्याला AI चार जास्तीचे पैसे मिळवून देईल?
12
स्पर्धा परीक्षेप्रमाणे सरळसेवा भरती परीक्षेसाठीही 'पर्सेटाइल' पद्धत; 'क' गट नोकर भरतीसाठी एमपीएससीचा निर्णय
13
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
14
लेख: गोव्यात चालणाऱ्या पार्ट्यांची 'धुंदी' वाढतेच आहे, कारण...
15
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
16
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
17
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
18
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
19
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
20
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार

आधुनिक मालधक्का, उड्डाणपूल होणार कधी?

By admin | Updated: December 7, 2015 01:05 IST

जालना: व्यापाराच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या मालधक्क्याचे आधुनिकीकरण व रेल्वेस्थानक परिसरातून पुढील वसाहतींकडे जाण्यासाठी उड्डाणपूल कधी होणार

जालना: व्यापाराच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या मालधक्क्याचे आधुनिकीकरण व रेल्वेस्थानक परिसरातून पुढील वसाहतींकडे जाण्यासाठी उड्डाणपूल कधी होणार , याची प्रतीक्षा सर्वांनाच आहे. गत अनेक वर्षांपासून रेल्वे प्रशासन केवळ आश्वासनांवरच बोळवण करीत आहे. दक्षिण मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक रवींद्र गुप्ता जालना स्थानकाची तपासणी करणार आहेत. त्यांनी हे दोन्ही मु्द्दे निकाली काढावेत यासाठी प्रवासी संघटना तसेच रहिवासी सरसावले आहेत.रेल्वे डब्याने धान्यासह येथे विविध प्रकराचा माल येतो. मात्र सुसज्ज व आधुनिक माल धक्क्याअभावी मालाची माती होते. धान्याचे रॅक लागल्यास धान्याची अतोनात नासाडी होते. धान्यासाठी असणारे गोदामही अपुरे पडते. यामुळे उघड्यावरच सर्व माल ठेवावा लागतो. मालधक्का परिसरात जाणाऱ्या रस्त्यांची अवस्था वाईट झालेली आहे. मालधक्का परिसरात सोयीसुविधा नाहीत. या मालधक्क्याचे आधुनिकीकरण झाल्यास व्यापार वाढीस चालना मिळेल, असा दावा व्यापाऱ्यांनी केला. रेल्वेतून माल वाहतूक तुलनेने स्वस्त तुलनेने स्वस्त आहे. रेल्वेच्या विस्तीर्ण अशा जागेवर सुसज्ज असा मालधक्का उभारावा, अशी मागणी होत आहे. रेल्वेस्थानकात पिण्याच्या पाण्याची सोय नाही. टँकरच्या पाण्यावर तहान भागवावी लागते. मोठे रेल्वेस्थानक पाहता सुरक्षा व्यवस्थाही तोकडी आहे. पोलीस ठाणे औरंगाबाद येथे हालविण्यात आल्याने सुरक्षा व्यवस्था ढेपाळल्याचे चित्र दिसून येते. या सर्व बाबींचा विचार महाव्यवस्थापक गुप्ता यांनी करावा, अशी मागणी होत आहे.