शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित साटम मुंबई भाजपाचे नवे अध्यक्ष; महापालिकेत नवा रेकॉर्ड करणार, CM देवेंद्र फडणवीसांचा दावा
2
सरकारच्या एक निर्णयाने अडचणीत आली ₹6,98,44,77,87,200 ची कंपनी; कोण आहेत ड्रीम-11 चे मालक हर्ष जैन? अंबानी कुटुंबाशी खास नातं!
3
एक मुलगा छातीवर बसला, दुसऱ्याने हात-पाय बांधले; रिटायर्ड DSP ना मारहाण; हिसकावलं ATM
4
Prithvi Shaw : संघ बदलला अन् फार्मात आला! पृथ्वी शॉच्या भात्यातून आली आणखी एक कडक खेळी
5
Nikki Murder Case : हुंड्यासाठी निक्कीला जाळून मारलं; पती, सासूनंतर आता दीर आणि सासऱ्यालाही अटक
6
जगदीप धनखड यांनी अचानक राजीनामा का दिला? अमित शाह म्हणाले, 'जास्त ताणून काहीतरी...'
7
हरितालिका व्रत २०२५: ‘हे’ नियम अवश्य पाळावेत; व्रत पूजनानंतर म्हणावी हरितालिका आरती
8
Latur Crime: लातूर हादरले! नदीत सापडलेल्या सुटकेसमध्ये महिलेचा मृतदेह; घटना समोर कशी आली?
9
१० वेळा बॉयफ्रेंडसोबत पळाली, आता विवाहित महिलेने ठेवला १५-१५ चा अजब फॉर्म्युला; ऐकून सगळेच हैराण
10
TCS ते इन्फोसिस-विप्रोपर्यंत IT कंपन्यांचे शेअर्स रॉकेट; निफ्टी-सेन्सेक्सही वधारले; का आली अचानक तेजी?
11
"रीलस्टार म्हणजे अभिनेते नाहीत", हास्यजत्रेत प्रसाद ओकचं वक्तव्य; धनंजय पोवार म्हणाला...
12
भाजपा राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी 'बडा' मंत्री शर्यतीत, दोन वर्षांनी घेतली मोहन भागवतांची भेट
13
जगद्गुरू रामभद्राचार्यांनी प्रेमानंद महाराजांना दिले खुले आव्हान; 'संस्कृताचा एक श्लोक तरी...'
14
Bigg Boss 19 : "वाटलं नव्हतं बिग बॉसची ऑफर येईल...", मराठमोळ्या प्रणित मोरेला अजूनही बसत नाहीये विश्वास
15
हरितालिका २०२५: हरितालिकेचे व्रत कुणी करू नये? पाहा, महती, महात्म्य, महत्त्व अन् मान्यता
16
'बिग बॉस १९' मध्ये काही आठवड्यांसाठीच दिसणार सलमान खान? चाहत्यांमध्ये निराशा
17
महालक्ष्मी योगात हरितालिका व्रत २०२५: पूजनाची सोपी पद्धत, शुभ मुहूर्त; स्वर्णगौरीची कहाणी
18
तीन महत्त्वपूर्ण निर्णयांमुळे सर्वोच्च न्यायालय अडचणीत, अलाहाबाद प्रकरणी सरन्यायाधीश भूषण गवई यांनी अखेर केला हस्तक्षेप
19
ड्रीम-11ने भारतीय संघाची स्पॉन्सरशिप सोडली! आशिया कपपूर्वीच BCCI ला मोठा धक्का; किती पैसा मिळायचा?
20
म्हणे, परमेश्वराचे बोलावणे आले, आम्ही ८ सप्टेंबरला देहत्याग करणार, अनंतपुरात २० भाविकांच्या निर्णयाने प्रशासनात खळबळ

फुले मार्केट कधी होणार?

By admin | Updated: April 4, 2016 00:38 IST

जालना : शहरातील केंद्रस्थानी असलेल्या महात्मा फुले मार्केट पुनर्बांधणीची प्रक्रिया कधी पूर्ण होणार, असा सवाल उपस्थित होत आहे.

जालना : शहरातील केंद्रस्थानी असलेल्या महात्मा फुले मार्केट पुनर्बांधणीची प्रक्रिया कधी पूर्ण होणार, असा सवाल उपस्थित होत आहे. गत पाच वर्षांपूर्वी धोकादायक इमारत पाडून त्या जागी उत्कृष्ट व्यापारी संकुल उभारण्याचे स्वप्न पालिकेने दाखविले होते. प्रत्यक्षात हे स्वप्न अद्यापही कागदावरच आहे. पाच वर्षांनंतरही साधी निविदा पूर्ण करण्याचे धाडसही पालिकेने दाखविले नाही. जुनी इमारत पाडल्याने अनेक व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले. चालू व्यवसाय बंद करावा लागला. काहींना नवीन दुकाने खरेदी करावी लागली. व्यापाऱ्यांचे हाल होत असले तरी पालिका लालफितीचा कारभार सोडण्यास तयार नाही. विशेष म्हणजे दोनदा निविदा काढूनही उपयोग झालेला नाही. सिंधी बाजार परिसरात दोनशेपेक्षा अधिक दुकाने असलेली महात्मा फुले मार्केटच्या इमारतीस साठ वर्षे झाले होते. ही इमारत जीर्ण झाल्याने ती कोसळण्याचा धोका होता. व्यापारी व पालिका यांच्यातील दीर्घ चर्चेनंतर पाच वर्षांपूर्वी ही इमारत जमीनदोस्त करण्यात आली. इमारत तयार न झाल्याने पालिकेला मिळणारे वार्षिक उत्पन्नही बुडत आहे. या उत्पन्नातून पालिका शहर विकास साधू शकते. राजकीय आणि प्रशासकीय वादात हा मुद्दा रखडत आहे. सदर इमारतीच्या बांधकामासाठी ई-टेंडर निघणार आहे. पाच मजल्यांची ही नवीन इमारत असेल असे सांगितले जाते. सुमारे २८ ते ३० कोटी रुपयांची निविदा प्रक्रिया असेल असा अंदाज नगरपालिकेतील सूत्र व्यक्त करतात. जून व जुलै २०१५ या महिन्यात यासाठी निविदा काढण्यात आल्या. मात्र दोन्ही वेळेस कंत्राटदाराचा प्रतिसाद मिळाला नाही.आज रोजी दीड एकरचा हा परिसर आहे. या परिसरात पाच मजली सुसज्ज मार्केट असेल. यातून २८३ दुकाने निघतील असा पालिकेतील बांधकाम तज्ज्ञांचा अंदाज आहे. यातील काही दुकाने व्यापाऱ्यांना द्यावी लागणार आहेत. त्यामुळे व्यापाऱांना किती, कंत्राटदराचा हिस्सा किती, वाहनतळाची व्यवस्था काय आदी विविध मुद्यांवरून ही निविदा प्रक्रिया दर वेळेस रखडत आहे. शहरातील मध्यभागी ही जागा आहे. पालिकेच्या दुर्लक्षामुळे काही जागेवर उकिरडा तर काही ठिकाणी छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांनी आपले बस्तान मांडले आहे. छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांकडून किती रक्कम घेतली जाते हा संशोधनाचा विषय आहे. एकूणच या जागेवर सुसज्ज इमारत कधी उभारणार असा प्रश्न व्यापाऱ्यांसोबतच नागरिकांनाही पडला आहे.काही दिवसांपूर्वी मुंबईत मुले मार्केटच्या विकासा संदर्भात चर्चा झाली होती. परंतु ही चर्चा चर्चाच राहिली. यातून काहीच निष्कर्ष निघू शकला नाही. पालिकेचे मुख्याधिकारी दीपक पुजारी यांच्याशी वारंवार संपर्क साधूनही त्यांनी भ्रमणध्वनी उचलला नाही.