शहरं
Join us  
Trending Stories
1
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
2
Nashik Hit and Run: भावासमोरच जयश्रीने सोडला जीव, नाशिकमध्ये पिकअपने तीन वाहनांना उडवले
3
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
4
Delhi Rains : पावसाचे थैमान! दिल्ली-NCR मध्ये रस्ते पाण्याखाली, १०० फ्लाइट्स लेट; ४ जणांनी गमावला जीव
5
Ganga Saptami 2025: गंगा सप्तमीला केले जाते पितृतर्पण; कसे आणि का? सविस्तर जाणून घ्या!
6
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
7
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
8
Adani Enterprises Q4 Results: जबरदस्त तिमाही निकालानंतर Adani Enterprises चे शेअर्स सुस्साट.., चौथ्या तिमाहीत नफा ७५२% वाढला
9
एचडीएफसी बँकेकडून केवायसी अपडेट, APK चा मेसेज आला, पाठविणाऱ्याला ब्लॉक करताच ठेवली स्माईली...
10
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
11
वर्षभरात होणार तब्बल ८०० टन सोन्याची खरेदी; ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने अहवालात व्यक्त केला अंदाज
12
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
13
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
14
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक
15
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
16
वर्षाला ८४ लाख पगार, 'या' एजन्सीनं काढली 'हाऊसमेड'ची नोकरी; काय काम करावं लागणार?
17
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
18
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
19
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
20
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?

फुले मार्केट कधी होणार?

By admin | Updated: April 4, 2016 00:38 IST

जालना : शहरातील केंद्रस्थानी असलेल्या महात्मा फुले मार्केट पुनर्बांधणीची प्रक्रिया कधी पूर्ण होणार, असा सवाल उपस्थित होत आहे.

जालना : शहरातील केंद्रस्थानी असलेल्या महात्मा फुले मार्केट पुनर्बांधणीची प्रक्रिया कधी पूर्ण होणार, असा सवाल उपस्थित होत आहे. गत पाच वर्षांपूर्वी धोकादायक इमारत पाडून त्या जागी उत्कृष्ट व्यापारी संकुल उभारण्याचे स्वप्न पालिकेने दाखविले होते. प्रत्यक्षात हे स्वप्न अद्यापही कागदावरच आहे. पाच वर्षांनंतरही साधी निविदा पूर्ण करण्याचे धाडसही पालिकेने दाखविले नाही. जुनी इमारत पाडल्याने अनेक व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले. चालू व्यवसाय बंद करावा लागला. काहींना नवीन दुकाने खरेदी करावी लागली. व्यापाऱ्यांचे हाल होत असले तरी पालिका लालफितीचा कारभार सोडण्यास तयार नाही. विशेष म्हणजे दोनदा निविदा काढूनही उपयोग झालेला नाही. सिंधी बाजार परिसरात दोनशेपेक्षा अधिक दुकाने असलेली महात्मा फुले मार्केटच्या इमारतीस साठ वर्षे झाले होते. ही इमारत जीर्ण झाल्याने ती कोसळण्याचा धोका होता. व्यापारी व पालिका यांच्यातील दीर्घ चर्चेनंतर पाच वर्षांपूर्वी ही इमारत जमीनदोस्त करण्यात आली. इमारत तयार न झाल्याने पालिकेला मिळणारे वार्षिक उत्पन्नही बुडत आहे. या उत्पन्नातून पालिका शहर विकास साधू शकते. राजकीय आणि प्रशासकीय वादात हा मुद्दा रखडत आहे. सदर इमारतीच्या बांधकामासाठी ई-टेंडर निघणार आहे. पाच मजल्यांची ही नवीन इमारत असेल असे सांगितले जाते. सुमारे २८ ते ३० कोटी रुपयांची निविदा प्रक्रिया असेल असा अंदाज नगरपालिकेतील सूत्र व्यक्त करतात. जून व जुलै २०१५ या महिन्यात यासाठी निविदा काढण्यात आल्या. मात्र दोन्ही वेळेस कंत्राटदाराचा प्रतिसाद मिळाला नाही.आज रोजी दीड एकरचा हा परिसर आहे. या परिसरात पाच मजली सुसज्ज मार्केट असेल. यातून २८३ दुकाने निघतील असा पालिकेतील बांधकाम तज्ज्ञांचा अंदाज आहे. यातील काही दुकाने व्यापाऱ्यांना द्यावी लागणार आहेत. त्यामुळे व्यापाऱांना किती, कंत्राटदराचा हिस्सा किती, वाहनतळाची व्यवस्था काय आदी विविध मुद्यांवरून ही निविदा प्रक्रिया दर वेळेस रखडत आहे. शहरातील मध्यभागी ही जागा आहे. पालिकेच्या दुर्लक्षामुळे काही जागेवर उकिरडा तर काही ठिकाणी छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांनी आपले बस्तान मांडले आहे. छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांकडून किती रक्कम घेतली जाते हा संशोधनाचा विषय आहे. एकूणच या जागेवर सुसज्ज इमारत कधी उभारणार असा प्रश्न व्यापाऱ्यांसोबतच नागरिकांनाही पडला आहे.काही दिवसांपूर्वी मुंबईत मुले मार्केटच्या विकासा संदर्भात चर्चा झाली होती. परंतु ही चर्चा चर्चाच राहिली. यातून काहीच निष्कर्ष निघू शकला नाही. पालिकेचे मुख्याधिकारी दीपक पुजारी यांच्याशी वारंवार संपर्क साधूनही त्यांनी भ्रमणध्वनी उचलला नाही.