शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदार याद्यांचा घोळ कायम, बिहारच्या उपमुख्यमंत्र्यांच्याच नावे २ व्होटर कार्ड; तेजस्वी यादव यांनी केली पोलखोल
2
ना अमेरिकन F-35, ना रशियन Su-57...; या मित्र देशाकडून लढाऊ विमाने खरेदी करून आणखी ताकद वाढवणार भारत! IAF ची मोठी मागणी
3
FD-RD सर्व विसराल; हा आहे LIC चा ‘तरुण’ प्लान; आयुष्यभर पडेल पैशांचा पाऊस, टेन्शचा होईल The End
4
आजचे राशीभविष्य, ११ ऑगस्ट २०२५: विविध लाभ, मान-सन्मानाचा दिवस; संयम राखा, शांत राहा
5
नेत्यांना घेऊन जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचे आपत्कालीन लँडिंग; खासदार म्हणाले - आम्ही थोडक्यात बचावलो!
6
मंगळवारी श्रावण अंगारक संकष्ट चतुर्थी: ६ राशींना कल्याण काळ, अनपेक्षित लाभ; आर्थिक भरभराट!
7
१८७७ गावांमध्ये पूर, घराघरांत शिरलं पाणी, ६ लाख बाधित; 'या' राज्यात पावसाचा कहर सुरूच!
8
श्रावण संकष्ट चतुर्थी: यशोदामातेने केले होते व्रत, इच्छा होतील पूर्ण; यंदा विशेष अंगारक योग
9
भारत जगात सर्वांत वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था; ट्रम्प यांच्या 'डेड इकॉनॉमी'ला अप्रत्यक्ष उत्तर
10
शरद पवारांनी निवडणूक आयोग-पोलिसांकडे तक्रार का केली नाही? : फडणवीस
11
गरज पडल्यास कबुतरखान्यासाठी शस्त्र उचलणार; जैन मुनी नीलेशचंद्र विजय यांच्या वक्तव्याने नवा वाद
12
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
13
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
14
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
15
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
16
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
17
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
18
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
19
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
20
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं

शिवाजीनगर भुयारी मार्गाचा‘संग्राम’ केव्हा संपणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:03 IST

औरंगाबाद : रेल्वे येताच फाटक बंद होते आणि रेल्वे रुळांच्या दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांब रांगा लागतात. रेल्वे काही मिनिटांत ...

औरंगाबाद : रेल्वे येताच फाटक बंद होते आणि रेल्वे रुळांच्या दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांब रांगा लागतात. रेल्वे काही मिनिटांत निघून जाते, पण वाहनांच्या गर्दीतून मार्ग काढताना वाहनचालकांना रोज ‘संग्राम’ करावा लागतो आहे. येथील प्रस्तावित भुयारी मार्ग अद्याप कागदावरही अवतरला नाही. त्यामुळे प्रत्यक्षात भुयारी मार्ग कधी होणार, असा सवाल नागरिकांकडून विचारला जात आहे.

सातारा आणि देवळाईमध्ये मोठ्या प्रमाणात वस्ती वाढलेली आहे. या भागातील नागरिकांनी शिवाजीनगर रेल्वे गेट ( क्रमांक ५५) येथून जावे लागते. या गेटवर रेल्वे जाण्याच्या वेळी मोठी वाहतूक कोंडी होते. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात. सर्वसामान्य नागरिकांना त्याचा रोज मोठा त्रास सहन करावा लागत आहे. रेल्वे प्रशासनाने भुयारी मार्गासाठी ३८.६० कोटी रुपयांच्या प्रस्तावास राज्य शासनासोबत भागीदारी तत्त्वावर मान्यता दिली. अनेक महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर राज्य शासनाने निधीला मंजुरी दिली. परंतु जिल्हाधिकारी कार्यालयाची एनओसी, निविदाप्रक्रिया अशा कागदोपत्री प्रक्रियात हा मार्ग प्रत्यक्षात तयार होण्यासाठी आणखी किती कालावधी लागतो याचा अंदाजच नाही.

अनेक वर्षांपासून प्रतीक्षा

अनेक वर्षांपासून शिवाजीनगर येथील भुयारी मार्गाची प्रतीक्षा केली जात आहे. या

मार्गासाठी मनपा, सार्वजनिक बांधकाम विभाग (जागतिक बँक प्रकल्प) आणि उपविभागीय अधिकाऱ्याकडून एनओसी मिळाली आहे. आता जिल्हाधिकारी कार्यालयाची एनओसी बाकी आहे. ही एनओसी मिळाल्यानंतर महिनाभरात रेल्वे प्रशासनाने काम सुरू केले पाहिजे. या मुदतीत काम सुरू झाले नाही, तर आंदोलन केले जाईल.

-बद्रीनाथ थोरात, अध्यक्ष, सातारा-देवळाई जनसेवा कृती समिती

...तर रेल्वे रोको

न्यायालयात याचिका दाखल करून शिवाजीनगर येथे उड्डाणपूल अथवा भुयारी मार्ग करण्यासंदर्भात पाठपुरावा केला. राज्य शासनाने आता निधीला मंजुरी दिली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या एनओसीनंतरही उशीर झाला तर रेल्वे रोको केला जाईल.

- ॲड. शिवराज कडू पाटील

लवकरच भुयारी मार्ग

भुयारी मार्गासाठी महाराष्ट्र शासनाच्या भागीदारी तत्त्वावरील हिश्याचे २२.०५ कोटी रुपयांच्या निधीला साेमवारी मंजुरी मिळाली आहे. रेल्वेकडून निविदाप्रक्रिया राबवून काम केले जाईल. त्यामुळे लवकरच हा मार्ग होईल. त्यासाठी पाठपुरावा केला जाईल.

- खा. इम्तियाज जलील